शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
3
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
4
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
5
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
6
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
7
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
8
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
9
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
10
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
11
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
12
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
13
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
14
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
15
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
16
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
17
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
18
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
19
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
20
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज

सहा महिन्यांत ६.५ कोटींची कामे

By admin | Updated: October 29, 2016 03:22 IST

पावसाचे पाणी गाव शिवारात अडवून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे...

जलयुक्त शिवार अभियान : यावर्षी केली ५९ गावांची निवड इंद्रपाल कटकवार भंडारापावसाचे पाणी गाव शिवारात अडवून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे हा मुख्य उद्देश्य नजरेसमोर ठेवून सिंचन क्षमता वाढविण्यावर भर देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे मागील सहा महिन्यांत जिल्ह्यात २९२ कामे पुर्ण झाली असून त्यावर सहा कोटी ५२ लक्ष रूपये खर्च करण्यात आले आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सिंचन क्षेत्रात वाढ करणे, शेतीसाठी संरक्षीत पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांचे पुनर्रजीवन करणे, भुजल अधिनियम अंमलबजावणी करणे, जलस्त्रोतातील गाळ उपसून पाणीसाठा वाढविणे, वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देणे तसेच लोकसहभाग वाढवून जनजागृती करणे असे विविध उद्देशातून जलयुक्त शिवार अभियान मागील वर्षीपासून राबविण्यात येत आहे. यात एप्रिल २०१६ ते आॅक्टोबर महिन्यापर्यंत भंडारा जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ५९ गावांची निवड करण्यात आली आहे. यात हाती घेण्यात आलेल्या एकूण कामांपैकी २९२ कामे पुर्ण झाली असून त्यावर सहा कोटी ५२ लक्ष रूपये खर्च करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत भंडारा तालुक्यातील चोवा, रावणवाडी, खुटसावरी, गुंथारा, सालेहेटी, टेकेपार, कोका, सर्पेवाडा, दुधाळा, राजेदहेगाव. मोहाडी तालुक्यातील महालगाव, डोंगरगाव, हिवरा, चिचोली, आंधळगाव, पालडोंगरी, नवेगाव, धोप, ताळगाव, जांब. तुमसर तालुक्यातील हिंगणा, मिटेवानी, झारली, येदरबुची, राजापूर, लोभी, सौदेपुर, सोनेगाव, देव्हाडी, सुकळी तर पवनी तालुक्यातील तांबेखानी, रेंगेपार, ब्रम्ही, निलज, भुयार, आमगाव, कातुर्ली, धानोरी, शेलारी या गावांचा समावेश आहे.याशिवाय लाखनी तालुक्यातील नऊ, साकोली तालुक्यातील सहा तर लाखांदूर तालुक्यातील झरी, पारडी, तिरखुरी, दिघोरी, पेंढरी (सोनेगाव) या गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये मागील सहा महिन्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बोडी निर्माण करणे, तलावातली गाळ उपसणे, पाणी पुरवठ्याची उपलब्धतता करणे आदी कामे करण्यात आली आहे.मागीलवर्षी झाली १ हजार २४ कामेजलयुक्त शिवार अभियानांतर्गत मागीलवर्षी म्हणजे सन २०१५-१६ मध्ये एक हजार २४ कामे पूर्ण करण्यात आली आहे. या कामासाठी एकूण २८ कोटी ७१ लक्ष रूपये खर्च करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हाभरातून तालुकानिहाय ८६ गावांची निवड करण्यात आली होती. सर्व यंत्रणा मिळून ही कामे यशस्वीपणे पुर्ण करण्यात आली आहे. भंडारा तालुक्यातील गराडा (बु.), गराडा (खु.), सिल्ली, मानेगाव, मकरधोकडा, नवरगाव, ईटगाव, गोलेवाडी, माटोरा, खमारी, पलाडी, मंडनगाव, कवलेवाडा, माडगी, खुर्शीपार या गावाचा समावेश करण्यात आला होता. तसेच तुमसर तालुक्यातील १९, मोहाडी तालुक्यातील १५, पवनी तालुक्यातील १२, साकोली तालुक्यातील ११, लाखनी तालुक्यातील नऊ तर लाखांदूर तालुक्यातील सहा गावांची या योजनेअंतर्गत निवड करण्यात आली होती.