शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्यासाठी राज्यात ५६ लाख ८७ हजार शेतकऱ्यांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:23 IST

भंडारा : पावसाने अद्यापही जोर धरला नसल्याने राज्यातील काही भागात शेतकऱ्यांवर संकट घोघावत आहे. अशा स्थितीत शेतकरी पीकविमा काढण्याकडे ...

भंडारा : पावसाने अद्यापही जोर धरला नसल्याने राज्यातील काही भागात शेतकऱ्यांवर संकट घोघावत आहे. अशा स्थितीत शेतकरी पीकविमा काढण्याकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्यातील ३४ जिल्ह्यातील ५६ लाख ८७ हजार ४५७ शेतकऱ्यांनी खरीप पिकाचा विमा उतरविला आहे. ३२ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचा विमा काढण्यात आला असून त्या पोटी २८३ काेटी रुपये भरण्यात आले आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी धान, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भुईमूग, कांदा, तीळ पिकांचा विमा उतरवला आहे. पीकविमा योजनेत कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी व्हायचे असल्यास नोंदणीच्या अंतिम दिनांकाच्या सात दिवस आधी बँकेत स्वतःचे घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. राज्यात सर्वाधिक लातूर विभागातील २५ लाख ४३ हजार २९४ शेतकऱ्यांनी १४ लाख ९८ हजार ४८५ हेक्टरसाठी तर औरंगाबाद विभागात १६ लाख ९३,६४२ शेतकऱ्यांनी ६ लाख ७९ हजार ४९८ हेक्टरसाठी विमा काढला आहे. त्याखालोखाल अमरावती विभागात ७ लाख ७४४७ शेतकऱ्यांनी ६ लाख २० हजार ८२४ हेक्टरसाठी तर पुणे विभागात ३ लाख २४,३०२ शेतकऱ्यांनी २ लाख २० हजार ३६६ हेक्टर, नाशिक विभागात १ लाख ६५ हजार २७९ शेतकऱ्यांनी १ लाख २९ हजार ३४१ हेक्टर, नागपूर विभागातील ९८ हजार ८८९ शेतकऱ्यांनी ५९ हजार ५६५ हेक्टर, तर कोकण विभागात ७०, ७८५ शेतकऱ्यांनी २८ हजार ६८१ हेक्टर, तर सर्वाधिक कमी कोल्हापूर विभागात केवळ २० हजार ८१९ शेतकऱ्यांनी ११ हजार १२१ हेक्टरसाठी पीक विमा उतरवला आहे. ही आकडेवारी १६ जुलैपर्यंतची आहे. प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत २३ जुलै २०२१ पर्यंत वाढवल्याने राज्यातील हा आकडा आणखी आठ दिवसात वाढणार आहे. विमा हप्त्याची रक्कम ७६० रुपये प्रति हेक्‍टर असून विमासंरक्षण ३८ हजार रुपये प्रति हेक्‍टर आहे. सोयाबीन पिकासाठी विमा हप्त्याची रक्कम प्रति हेक्‍टर ५५० रुपये असून विमा संरक्षण २७ हजार ५०० रुपये प्रति हेक्‍टर आहे.

बॉक्स

नागपूर विभागात भंडारा आघाडीवर

नागपूर विभागात खरीप हंगामातील पीक विमा योजनेत भंडारा जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यातील ४६ हजार ३९ शेतकऱ्यांनी २० हजार ६५५ हेक्टरसाठी पीक विमा उतरवला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील २१ हजार १० शेतकरी, चंद्रपूर जिल्ह्यातील १७ हजार ५८५ शेतकरी, गोंदिया जिल्ह्यातील ५ हजार ९२५, नागपूरमधील ४ हजार ८०६ आणि वर्धा जिल्ह्यातील ३५२४ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे.

कोट

भंडारा जिल्हा धान पिकासाठी प्रसिद्ध आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे. शासनाने २३ जुलैपर्यंतची मुदतवाढ दिली आहे आहे. ज्या शेतकऱ्यांना विमा योजनेत यापूर्वी सहभागी होता आले नाही, त्यांनी २३ जुलैपर्यंत पीकविमा योजनेचे अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा.

‌- हिंदुराव चव्हाण, जिल्हा कृषी अधीक्षक, भंडारा