शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शेतकरी अपघात विमा योजनेची ५४ प्रकरणे अडकली त्रुटीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:07 IST

राज्य शासनाची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकरी कुटुंबांसाठी दिलासा देणारी आहे. शेतकऱ्याचा मृत्यू ओढावल्यास किंवा अपंगत्व आल्यास ...

राज्य शासनाची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकरी कुटुंबांसाठी दिलासा देणारी आहे. शेतकऱ्याचा मृत्यू ओढावल्यास किंवा अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयांपर्यंत विमा मिळण्याची यात सोय आहे. योजनेत पूर्वी फक्त खातेदार शेतकरी होते; मात्र शासनाने त्याची व्याप्ती वाढवून शेतकरी कुटुंबालाही विमाछत्र दिले आहे. जिल्ह्यात २०१६ ते १७ पासून आतापर्यंत ३४५ प्रस्ताव आलेले आहेत. त्यापैकी अनेकांना मदतीची प्रतीक्षा आहे.

कोणाला किती मिळते मदत?

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत वेगवेगळ्या अपघातात वेगवेगळ्या पद्धतीने मदत मिळते. अपघातामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये मदत देण्यात येते. दोन डोळे, दोन हात, दोन पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येते.

प्रस्ताव प्रलंबित का?

विविध त्रुटींमुळे हे प्रस्ताव प्रलंबित राहात आहेत. सातबारा उतारा, मृत्यू दाखला, प्रथम माहिती अहवाल, घटनास्थळ पंचनामा, वयाचा दाखला यासह विविध कागदपत्रे अर्जासोबत आवश्यक असतात; परंतु कागदपत्रामध्ये त्रुटी आढळून येत असल्याने प्रस्ताव प्रलंबित राहतात.

सर्वाधिक प्रकरणे

शेतकरी अपघात विमा योजनेत सर्वाधिक प्रकरणे ही विजेचा धक्का, सर्पदंशाची आहेत. त्यानंतर रस्ता अपघात व वाहन अपघाताची प्रकरणेही मोठ्या प्रमाणावर येत आहेत.

२०१६-१७ ते २०१९-२० या वर्षातील आढावा

दाखल प्रस्ताव ३४५

मंजूर १७८

नामंजूर ५४

प्रक्रियेत ८५