शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

५ कोटींचा उपसा सिंचन प्रकल्प धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:25 IST

तुमसर : तुमसर तालुक्यात तलावांची संख्या मोठी असून, शेती सिंचनाकरिता आंतरराज्य बावनथडी प्रकल्पही अस्तित्वात आहे; परंतु प्रकल्प स्थळापासून काही ...

तुमसर : तुमसर तालुक्यात तलावांची संख्या मोठी असून, शेती सिंचनाकरिता आंतरराज्य बावनथडी प्रकल्पही अस्तित्वात आहे; परंतु प्रकल्प स्थळापासून काही अंतरावर असलेली आठ गावे सिंचनापासून अद्यापही वंचितच आहेत. या गावांना सिंचनाचा लाभ व्हावा, याकरिता ३५ कोटींचा उपसा सिंचन प्रकल्प प्रस्तावित आहे; परंतु अद्यापही या सिंचन प्रकल्पाच्या कामाला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे हा प्रकल्प अद्यापही धूळखात पडून आहे.

तुमसर तालुक्यातील गोबरवाही परिसरातील आठ गावे सिंचनापासून वंचित आहेत. यात गोबरवाही, सीता सावंगी, सुंदर टोला, येदरबुची, पवनार खारी, गणेशपूर, हेटी टोला येथील शेतकऱ्यांना बावनथडी प्रकल्पाचे पाणी सिंचनाकरिता उपलब्ध होत नाही. पवनार खारी येथे पाटबंधारे विभागाचा मोठा तलाव आहे. तसेच येदरबुची येथे जिल्हा परिषदेचा तलाव आहे. या दोन्ही तलावांत पावसाळ्यात पाणीसाठा पूर्ण क्षमतेने होत नाही. त्यामुळे बराच तलाव कोरडाच राहतो.

भाजप-सेनेच्या कार्यकाळात राज्य शासनाने दोन्ही तलावांना बावनथडी प्रकल्पाच्या राजापूर वितरिकेला तलाव भरण्याचा प्रस्ताव विदर्भ पाटबंधारे विभागाकडे पाठविला होता. त्यामुळे उपसा सिंचन प्रकल्प येथे अस्तित्वात आल्यास पिण्याचे पाणी व सिंचनाची समस्या सुटली असती; परंतु या प्रस्तावाला अजूनपर्यंत राज्य शासनाने मंजुरी दिलेली नाही. गोबरवाही परिसरातील आठ गावांकरिता ३५ कोटींच्या उपसा सिंचन प्रकल्प तयार करण्याकरता विदर्भ पाटबंधारे विभागाकडे पाठविण्यात आला आहे; परंतु अद्याप या प्रकल्पाला मंजुरी मिळाली नाही. हा प्रस्ताव अद्यापही धूळखात पडून असल्याची माहिती आहे. सदर प्रकल्प पूर्ण व्हावा याकरिता बावनथडी प्रकल्प संघर्ष समिती गठित करण्यात आली होती. या समितीतर्फे अनेकदा निवेदने दिली व धरणे आंदोलन करण्यात आले; परंतु अद्यापही या प्रकल्पाला शासन आणि प्रशासनाचे मान्यता मिळाली नाही.

बाॅक्स

शेतकऱ्यांत प्रशासनाच्या विरोधात तीव्र असंतोष

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवर या परिसरातील शेतकऱ्यांनी बहिष्कार घातला होता. बावनथडी प्रकल्पापासून सदर आठही गावे ही २० ते २२ किलोमीटर अंतरावर असून या गावांना अद्यापही सिंचनाचा लाभ मिळाला नाही. ही गावे उंचावर असल्याचे कारण संबंधित विभागाचे वरिष्ठ अभियंते देत आहेत. त्यामुळे या गावाना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध होत नाही. त्याकरिता उपसा सिंचन प्रकल्प उभारण्याची गरज आहे. पवनार खारी येथे मोठे तलाव उपलब्ध आहेत. या तलावांची पाणी साठवणूक क्षमता मोठी आहे. त्यामुळे कायमस्वरूपी येथे उपसा सिंचन प्रकल्प अस्तित्वात आल्यास शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होऊ शकते; परंतु राजकीय इच्छाशक्ती येथे कमी दिसत आहे.

बावनथडी प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाकरिता कोट्यवधी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आला; परंतु हाकेच्या अंतरावर असलेल्या या आठ गावांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये शासन व प्रशासनाच्या विरोधात तीव्र असंतोष आहे.