शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

५ कोटींचा उपसा सिंचन प्रकल्प धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:25 IST

तुमसर : तुमसर तालुक्यात तलावांची संख्या मोठी असून, शेती सिंचनाकरिता आंतरराज्य बावनथडी प्रकल्पही अस्तित्वात आहे; परंतु प्रकल्प स्थळापासून काही ...

तुमसर : तुमसर तालुक्यात तलावांची संख्या मोठी असून, शेती सिंचनाकरिता आंतरराज्य बावनथडी प्रकल्पही अस्तित्वात आहे; परंतु प्रकल्प स्थळापासून काही अंतरावर असलेली आठ गावे सिंचनापासून अद्यापही वंचितच आहेत. या गावांना सिंचनाचा लाभ व्हावा, याकरिता ३५ कोटींचा उपसा सिंचन प्रकल्प प्रस्तावित आहे; परंतु अद्यापही या सिंचन प्रकल्पाच्या कामाला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे हा प्रकल्प अद्यापही धूळखात पडून आहे.

तुमसर तालुक्यातील गोबरवाही परिसरातील आठ गावे सिंचनापासून वंचित आहेत. यात गोबरवाही, सीता सावंगी, सुंदर टोला, येदरबुची, पवनार खारी, गणेशपूर, हेटी टोला येथील शेतकऱ्यांना बावनथडी प्रकल्पाचे पाणी सिंचनाकरिता उपलब्ध होत नाही. पवनार खारी येथे पाटबंधारे विभागाचा मोठा तलाव आहे. तसेच येदरबुची येथे जिल्हा परिषदेचा तलाव आहे. या दोन्ही तलावांत पावसाळ्यात पाणीसाठा पूर्ण क्षमतेने होत नाही. त्यामुळे बराच तलाव कोरडाच राहतो.

भाजप-सेनेच्या कार्यकाळात राज्य शासनाने दोन्ही तलावांना बावनथडी प्रकल्पाच्या राजापूर वितरिकेला तलाव भरण्याचा प्रस्ताव विदर्भ पाटबंधारे विभागाकडे पाठविला होता. त्यामुळे उपसा सिंचन प्रकल्प येथे अस्तित्वात आल्यास पिण्याचे पाणी व सिंचनाची समस्या सुटली असती; परंतु या प्रस्तावाला अजूनपर्यंत राज्य शासनाने मंजुरी दिलेली नाही. गोबरवाही परिसरातील आठ गावांकरिता ३५ कोटींच्या उपसा सिंचन प्रकल्प तयार करण्याकरता विदर्भ पाटबंधारे विभागाकडे पाठविण्यात आला आहे; परंतु अद्याप या प्रकल्पाला मंजुरी मिळाली नाही. हा प्रस्ताव अद्यापही धूळखात पडून असल्याची माहिती आहे. सदर प्रकल्प पूर्ण व्हावा याकरिता बावनथडी प्रकल्प संघर्ष समिती गठित करण्यात आली होती. या समितीतर्फे अनेकदा निवेदने दिली व धरणे आंदोलन करण्यात आले; परंतु अद्यापही या प्रकल्पाला शासन आणि प्रशासनाचे मान्यता मिळाली नाही.

बाॅक्स

शेतकऱ्यांत प्रशासनाच्या विरोधात तीव्र असंतोष

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवर या परिसरातील शेतकऱ्यांनी बहिष्कार घातला होता. बावनथडी प्रकल्पापासून सदर आठही गावे ही २० ते २२ किलोमीटर अंतरावर असून या गावांना अद्यापही सिंचनाचा लाभ मिळाला नाही. ही गावे उंचावर असल्याचे कारण संबंधित विभागाचे वरिष्ठ अभियंते देत आहेत. त्यामुळे या गावाना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध होत नाही. त्याकरिता उपसा सिंचन प्रकल्प उभारण्याची गरज आहे. पवनार खारी येथे मोठे तलाव उपलब्ध आहेत. या तलावांची पाणी साठवणूक क्षमता मोठी आहे. त्यामुळे कायमस्वरूपी येथे उपसा सिंचन प्रकल्प अस्तित्वात आल्यास शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होऊ शकते; परंतु राजकीय इच्छाशक्ती येथे कमी दिसत आहे.

बावनथडी प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाकरिता कोट्यवधी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आला; परंतु हाकेच्या अंतरावर असलेल्या या आठ गावांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये शासन व प्रशासनाच्या विरोधात तीव्र असंतोष आहे.