शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

उच्छाद मांडणारे २६ माकड जेरबंद

By admin | Updated: January 22, 2017 00:30 IST

तालुक्यातील सिल्ली गावात मागील काही दिवसांपासून माकडांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे.

सिल्ली येथे धरपकड : पुरकाबोडी जंगलात सोडले भंडारा : तालुक्यातील सिल्ली गावात मागील काही दिवसांपासून माकडांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. त्यांनी पकडून जंगलात सोडण्याचा प्रकार महिनाभरापासून सुरु आहे. या धरपकड कार्यक्रमात आज २६ माकडांना पकडून पुरकाबोडीच्या जंगलात सोडण्यात आले. सिल्ली येथे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग वास्तव्य करतात. जंगल परिसरालगत असलेल्या सिल्ली येथे माकडांचा नेहमीच उच्छाद असतो. या माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून ग्रामस्थांनी वनविभागाकडे लावून धरली होती. मात्र मर्कटलिलांपुढे वनविभागही हतबल झाले होते. दरम्यान माकडांवर नियंत्रण मिळविता यावे यासाठी वनविभागाने काही ग्रामस्थांना नागझिरा येथे प्रशिक्षणासाठी पाठविले होते. मात्र माकडांवर नियंत्रण मिळविण्यात त्याला यश आले नाही. दरम्यान सिल्लीचे ग्रामविकास अधिकारी एस.टी. भाजीपाले यांच्या संपर्कातून हैद्राबाद येथील हैदर खान यांना माकडांना पकडण्याकरिता बोलाविण्यात आले. सिल्ली येथे कौलारू व मातीची घरे आहेत. या घरांवर उड्या मारून माकडांच्या जत्थ्याने नागरिकांना अक्षरश: जेरीस आणले. कित्येक घरांचे कौले फोडली. त्यामुळे मागील महिनाभरापासून हैदरखान यांच्या माध्यमातून सिल्लीत माकडांना पकडण्याची मोहीम सुरु आहे. हैदर खान यांच्याकडे माकडांना ताब्यात घेण्यासाठी पिंजरे आहेत. या पिंजऱ्यांमध्ये माकडांना पकडण्याची मोहीम सुरु आहे. आज सकाळी एकनाथ साखरवाडे यांच्या शेतात पिंजरे लावून २६ माकडांना पकडण्यात आले. त्यानंतर वनविभागाला याची माहिती देवून वनाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचनामा करण्यात आला व जेरबंद करण्यात आलेल्या सर्व माकडांना पुरकाबोडीच्या जंगलात सोडण्यात आले. (शहर प्रतिनिधी)अशी पकडली माकडेरात्रीच्या वेळेस माकडांचा कळप साखरवाडे यांच्या शेतातील झाडावर झोपी गेले. त्यांना सकाळी उठल्यावर भूक लागते, ही बाब हैदर खान यांना माहिती होती. त्याप्रमाणे त्यांनी झाडाखाली पिंजरे लावले. या पिंजऱ्याला दोन कप्पे आहेत. त्यात सुमारे ४० ते ५० किलो भाजीपाला ठेवण्यात आला. तो खाण्यासाठी माकडांचा कळप त्यात शिरल्यानंतर जेरबंद करण्यात आले. अशा प्रकारे मागील महिनाभरापासून १२५ ते १५० माडांना जेरबंद करण्यात आले. माकडांच्या उच्छादामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. त्यामुळे वनविभाग व हैदर खानच्या मदतीने माकडांना पकडण्याची मोहीम सुरु आहे. अनेक घरांची व कौलांची तोडफोड झाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. आता ग्रामस्थ काही प्रमाणात का होईना समाधानी झाले आहे. - दुलीचंद देशमुख, सरपंच, ग्रामपंचायत, सिल्ली