शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

उच्छाद मांडणारे २६ माकड जेरबंद

By admin | Updated: January 22, 2017 00:30 IST

तालुक्यातील सिल्ली गावात मागील काही दिवसांपासून माकडांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे.

सिल्ली येथे धरपकड : पुरकाबोडी जंगलात सोडले भंडारा : तालुक्यातील सिल्ली गावात मागील काही दिवसांपासून माकडांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. त्यांनी पकडून जंगलात सोडण्याचा प्रकार महिनाभरापासून सुरु आहे. या धरपकड कार्यक्रमात आज २६ माकडांना पकडून पुरकाबोडीच्या जंगलात सोडण्यात आले. सिल्ली येथे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग वास्तव्य करतात. जंगल परिसरालगत असलेल्या सिल्ली येथे माकडांचा नेहमीच उच्छाद असतो. या माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून ग्रामस्थांनी वनविभागाकडे लावून धरली होती. मात्र मर्कटलिलांपुढे वनविभागही हतबल झाले होते. दरम्यान माकडांवर नियंत्रण मिळविता यावे यासाठी वनविभागाने काही ग्रामस्थांना नागझिरा येथे प्रशिक्षणासाठी पाठविले होते. मात्र माकडांवर नियंत्रण मिळविण्यात त्याला यश आले नाही. दरम्यान सिल्लीचे ग्रामविकास अधिकारी एस.टी. भाजीपाले यांच्या संपर्कातून हैद्राबाद येथील हैदर खान यांना माकडांना पकडण्याकरिता बोलाविण्यात आले. सिल्ली येथे कौलारू व मातीची घरे आहेत. या घरांवर उड्या मारून माकडांच्या जत्थ्याने नागरिकांना अक्षरश: जेरीस आणले. कित्येक घरांचे कौले फोडली. त्यामुळे मागील महिनाभरापासून हैदरखान यांच्या माध्यमातून सिल्लीत माकडांना पकडण्याची मोहीम सुरु आहे. हैदर खान यांच्याकडे माकडांना ताब्यात घेण्यासाठी पिंजरे आहेत. या पिंजऱ्यांमध्ये माकडांना पकडण्याची मोहीम सुरु आहे. आज सकाळी एकनाथ साखरवाडे यांच्या शेतात पिंजरे लावून २६ माकडांना पकडण्यात आले. त्यानंतर वनविभागाला याची माहिती देवून वनाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचनामा करण्यात आला व जेरबंद करण्यात आलेल्या सर्व माकडांना पुरकाबोडीच्या जंगलात सोडण्यात आले. (शहर प्रतिनिधी)अशी पकडली माकडेरात्रीच्या वेळेस माकडांचा कळप साखरवाडे यांच्या शेतातील झाडावर झोपी गेले. त्यांना सकाळी उठल्यावर भूक लागते, ही बाब हैदर खान यांना माहिती होती. त्याप्रमाणे त्यांनी झाडाखाली पिंजरे लावले. या पिंजऱ्याला दोन कप्पे आहेत. त्यात सुमारे ४० ते ५० किलो भाजीपाला ठेवण्यात आला. तो खाण्यासाठी माकडांचा कळप त्यात शिरल्यानंतर जेरबंद करण्यात आले. अशा प्रकारे मागील महिनाभरापासून १२५ ते १५० माडांना जेरबंद करण्यात आले. माकडांच्या उच्छादामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. त्यामुळे वनविभाग व हैदर खानच्या मदतीने माकडांना पकडण्याची मोहीम सुरु आहे. अनेक घरांची व कौलांची तोडफोड झाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. आता ग्रामस्थ काही प्रमाणात का होईना समाधानी झाले आहे. - दुलीचंद देशमुख, सरपंच, ग्रामपंचायत, सिल्ली