शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

उच्छाद मांडणारे २६ माकड जेरबंद

By admin | Updated: January 22, 2017 00:30 IST

तालुक्यातील सिल्ली गावात मागील काही दिवसांपासून माकडांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे.

सिल्ली येथे धरपकड : पुरकाबोडी जंगलात सोडले भंडारा : तालुक्यातील सिल्ली गावात मागील काही दिवसांपासून माकडांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. त्यांनी पकडून जंगलात सोडण्याचा प्रकार महिनाभरापासून सुरु आहे. या धरपकड कार्यक्रमात आज २६ माकडांना पकडून पुरकाबोडीच्या जंगलात सोडण्यात आले. सिल्ली येथे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग वास्तव्य करतात. जंगल परिसरालगत असलेल्या सिल्ली येथे माकडांचा नेहमीच उच्छाद असतो. या माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून ग्रामस्थांनी वनविभागाकडे लावून धरली होती. मात्र मर्कटलिलांपुढे वनविभागही हतबल झाले होते. दरम्यान माकडांवर नियंत्रण मिळविता यावे यासाठी वनविभागाने काही ग्रामस्थांना नागझिरा येथे प्रशिक्षणासाठी पाठविले होते. मात्र माकडांवर नियंत्रण मिळविण्यात त्याला यश आले नाही. दरम्यान सिल्लीचे ग्रामविकास अधिकारी एस.टी. भाजीपाले यांच्या संपर्कातून हैद्राबाद येथील हैदर खान यांना माकडांना पकडण्याकरिता बोलाविण्यात आले. सिल्ली येथे कौलारू व मातीची घरे आहेत. या घरांवर उड्या मारून माकडांच्या जत्थ्याने नागरिकांना अक्षरश: जेरीस आणले. कित्येक घरांचे कौले फोडली. त्यामुळे मागील महिनाभरापासून हैदरखान यांच्या माध्यमातून सिल्लीत माकडांना पकडण्याची मोहीम सुरु आहे. हैदर खान यांच्याकडे माकडांना ताब्यात घेण्यासाठी पिंजरे आहेत. या पिंजऱ्यांमध्ये माकडांना पकडण्याची मोहीम सुरु आहे. आज सकाळी एकनाथ साखरवाडे यांच्या शेतात पिंजरे लावून २६ माकडांना पकडण्यात आले. त्यानंतर वनविभागाला याची माहिती देवून वनाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचनामा करण्यात आला व जेरबंद करण्यात आलेल्या सर्व माकडांना पुरकाबोडीच्या जंगलात सोडण्यात आले. (शहर प्रतिनिधी)अशी पकडली माकडेरात्रीच्या वेळेस माकडांचा कळप साखरवाडे यांच्या शेतातील झाडावर झोपी गेले. त्यांना सकाळी उठल्यावर भूक लागते, ही बाब हैदर खान यांना माहिती होती. त्याप्रमाणे त्यांनी झाडाखाली पिंजरे लावले. या पिंजऱ्याला दोन कप्पे आहेत. त्यात सुमारे ४० ते ५० किलो भाजीपाला ठेवण्यात आला. तो खाण्यासाठी माकडांचा कळप त्यात शिरल्यानंतर जेरबंद करण्यात आले. अशा प्रकारे मागील महिनाभरापासून १२५ ते १५० माडांना जेरबंद करण्यात आले. माकडांच्या उच्छादामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. त्यामुळे वनविभाग व हैदर खानच्या मदतीने माकडांना पकडण्याची मोहीम सुरु आहे. अनेक घरांची व कौलांची तोडफोड झाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. आता ग्रामस्थ काही प्रमाणात का होईना समाधानी झाले आहे. - दुलीचंद देशमुख, सरपंच, ग्रामपंचायत, सिल्ली