शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

२५० कोटींचे वीज बिल थकीत

By admin | Updated: June 23, 2014 23:41 IST

तुमसरजवळील मॅग्नीज शुद्ध करणारा युनिव्हर्सल फेरो कारखाना मागील ११ वर्षापासून कायम बंद आहे. १२०० कामगारांना बेरोजगार करणाऱ्या कारखान्यावर सुमारे २५० कोटींचे वीज बिल थकीत आहे.

१,२०० कामगारांना न्यायाची उमेद : संसदीय समिती कारवाई करण्याची शक्यतामोहन भोयर - तुमसरतुमसरजवळील मॅग्नीज शुद्ध करणारा युनिव्हर्सल फेरो कारखाना मागील ११ वर्षापासून कायम बंद आहे. १२०० कामगारांना बेरोजगार करणाऱ्या कारखान्यावर सुमारे २५० कोटींचे वीज बिल थकीत आहे. केंद्रात सत्ताबदल झाल्याने कामगारांना न्याय मिळण्याची उमेद निर्माण झालेली आहे.वैनगंगा नदी काठावर माडगी येथे सुमारे ४० वर्षापूर्वी युनिव्हर्सल फेरो अलाईड अ‍ॅन्ड केमिकल्स लिमिटेड हा मॅग्नीज शुद्ध करणारा कारखाना सुरू झाला होता. येथील शुद्ध मॅग्नीजला देश व विदेशात मोठी मागणी होती. केंद्र शासनाने या कारखान्याला सवलतीच्या दरात वीज पुरवठा मागील अनेक वर्षापासून करीत होते, परंतु देशातच मॅग्नीज विक्री करणे अशी अट होती. एनटीपीसी येथे वीज पुरवठा करीत होती. सर्वप्रथम १९ सप्टेंबर १९९६ ला कराराचा भंग अंतर्गत भाजप सेनेच्या शासनकाळात या कारखान्याचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. राज्य शासन व कंपनी व्यवस्थापनात समझोत्यानंतर ६ फेब्रुवारी १९९९ ला कारखान्याला १८ मेगॉवॅट वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. त्यानंतर २०१३ मध्ये पुन्हा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत हा कारखाना बंद आहे. या कारखान्यावर २५० कोटींचा विज बिल थकीत आहे. येथील सुमारे १२०० कामगार बेरोजगार झाले. कारखाना बंद झाल्यावर काही कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. तर सुमारे ८० कामगारांची न्यायालयात लढाई सुरू आहे.सध्या महावितरण कंपनी व कंपनी व्यवस्थापनाचा वाद दिल्ली येथील बीआयएफ आर मंडळापुढे सुरू आहे. या बोर्डाने महावितरणला कराराची कागदोपत्री पूरखे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. येथे या बोर्डाची निकालाची प्रतिक्षा आहे. महावितरणने आजारी वीज बिल थकीत कारखान्याकरीता अभय योजनेत ५० टक्के सुट देण्याची घोषणा केली होती. या योजनेत येथे कंपनी व्यवस्थापनाला केवळ १२५ कोटी भरणे होते, परंतु कंपनी व्यवस्थापन सुरूवातीचे सवलतीच्या दरातील ५५ कोटीच भरण्यास तयार आहे, अशी माहिती आहे.या कारखान्याकडे सुमारे ३०० एकर जागा रिकामी पडून असून सध्या कारखाना भंगार अवस्थेत आहे. येथे कारखान्याचे दोन युनिट होते. त्यापैकी जूने एक युनिटचा सांगाडा काढण्यात आला आहे. या कारखान्याला वाईन्डीग आॅर्डर लिला करण्याचा आदेश मिळाला होता, परंतु कंपनी व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने याकरिता स्थगनादेश दिला आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या बोर्ड आॅफ इंडस्ट्रीयल फायनांस अ‍ॅन्ड रिकंस्ट्रशनची या कारखान्यावर करडी नजर आहे.