शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

भारनियमनाचा कहर २५ गावे अंधारात

By admin | Updated: May 25, 2014 23:20 IST

महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य भारनियमन मुक्त झाल्याची घोषणा केली असली तरी भंडारा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर जिवघेणे भारनियमन सुरु केले आहे. परिणामी ऊन्हाच्या चटक्यासोबत

भंडारा : महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य भारनियमन मुक्त झाल्याची घोषणा केली असली तरी भंडारा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर जिवघेणे भारनियमन सुरु केले आहे. परिणामी ऊन्हाच्या चटक्यासोबत भारनियमनाची झळ नागरिकांच्या मानगुटीवर बसली आहे. त्यामुळे राज्यशासनाच्या भारनियमन मुक्तीचा फज्जा उडाला आहे.

मागील चार-पाच दिवसांपासून जिल्हावासीयांना भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात १८ ते २0 तास भारनियमन केले जात असल्याने नागरिक भर उन्हाळ्यात होरपळून निघत आहे. धारगाव फिडर अंतर्गत येणारी २५ गांवे दोन दिवस अंधारात होती.

शहरी विभागासोबत ग्रामीण विभागामध्ये भारनियमनाचा तडाखा सुरु आहे. मात्र भारनियमनाच्या वेळा कंपनीने ठरवून दिलेल्या नाहीत. तसे वेळापत्रक नागरिकांसाठी प्रसिध्द करण्यात आलेले नाही. परीणामी भारनियमन नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. धारगाव फिडरअंतर्गत एमआयडीसी राजेगाव, खुटसावरी, पिंपळगाव, माडगी, टेकेपार, खुर्शिपार, वाघबोडी, धारगाव, गुंथारा, डव्वा, आमगाव/दिघोरी, पलाडी, सिंगोरी आदी २५ गावांचा समावेश आहे.

उन्हाचा तडाखा सुरु झाला असून तापमान ४५.0५ अंश सेल्सीअसपर्यंत पोहचला आहे. या उष्णतेसोबतच भारनियमनात वाढ झाल्याने त्याचा फटका ग्रामीण भागात राहणार्‍या नागरिकांना सोसावा लागत आहे. एकीकडे पाणी टंचाई उग्र रुप धारण करीत आहे.

जिल्हा टँकरमुक्त असल्याचा गाजावाजा जिल्हा प्रशासन करीत असले तरी या वर्षीच्या तापमानाची दाहकता बघता पाण्यासाठी टँकरचा उपयोग करावा लागणार असल्याचे चित्र आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दररोज खोल जात असल्याने गावातील विहीर, बोअरवेल आटू लागल्या आहेत.

त्यातच मे व जून हे दोन महिने भीषण उष्णतेचे असतात. तेव्हा दररोज वाढत जाणारा भारनियमन व ग्रामीण नागरिकांसाठी अतिसंकटमय होत चालला आहे. शहरी भागापेक्षा ग्रमीण भागात भारनिमनाचा फटका अधिक सोसावा लागत आहे. भारनियमनाची झळ अशीच कायम राहिली तर येत्या काही दिवसात भारनियमन पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राजकिय षडयंत्राचा आरोप

राज्यशासनाने भारनियमन मुक्त राज्य असा आदेश काढला होता. तेव्हापासून जिल्हयात भारनियमन केले जात नव्हते.

परंतु अचानक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर जिवघेणे भारनियमन सुरु करण्यात आले. याचा फटका अनेकांना बसत आहे. परिणामी नागरिकांमध्ये भारनियमन करणे हे राजकिय षडयंत्र असल्याचा आरोप गांवागावामध्ये चर्चीला जात आहे. (नगर प्रतिनिधी)