शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

५६ हजार शेतकऱ्यांना २४३ कोटींचे पीक कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 22:40 IST

शासनाने जिल्हा बँकेला २८० कोटी रूपये पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले होते. आतापर्यंत बँकेने ५६ हजार २४३.७० कोटी रूपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. सर्व कर्ज बँकेने स्वनिधीतून केले असून शेतकरी सभासदांना निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी दिली.

ठळक मुद्देसुनील फुंडे : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आमसभा, ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाने जिल्हा बँकेला २८० कोटी रूपये पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले होते. आतापर्यंत बँकेने ५६ हजार २४३.७० कोटी रूपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. सर्व कर्ज बँकेने स्वनिधीतून केले असून शेतकरी सभासदांना निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी दिली.भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आमसभा येथील लक्ष्मी सभागृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. आमसभेला आमदार चरण वाघमारे, अर्बन बँकेचे अध्यक्ष महेश जैन, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, संचालक कैलास नशिने, रामलाल चौधरी, रामराव कारेमोरे, रामदयाल पारधी, होमराज कापगते, विलास वाघाये, सत्यवान हुकरे, प्रशांत पवार, डॉ. श्रीकांत वैरागडे, वासुदेव तितीरमारे, अंजिराबाई चुटे, कवलजिंतसिंह चढ्ढा, नरेंद्र बुरडे, विनायक बुरडे, योगेश हेडावू, जि. प. अध्यक्ष रमेश डोंगरे, सभापती धनेंद्र तुरकर, आनंदराव वंजारी, तुमसर बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे उपस्थित होते.सुनील फुंडे म्हणाले, २००५-०६ पासून जिल्हा बँक निव्वळ नफ्यात आहे. चालू वर्षात बँकेला १०.२८ कोटी रूपयांचा नफा झाला असून २.०४ लाख निव्वळ नफा आहे. भंडारा, साकोली, पवनी, तुमसर येथे शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी आर्थिक साक्षरता केंद्र स्थापन करण्यात आले आहे. एटीएम, नेट बँकेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शेती क्षेत्र जास्तीत जास्त ओलीताखाली आणण्यासाठी कर्ज पुरवठा करणे सुरू आहे. प्रधानमंत्री मुद्रालोन, सोनेतारण, पगार तारण, पेंन्शन तारण आदी कर्जाची सोय असल्याचे त्यांनी सांगितले.२०१५-१६ व २०१६-१७ चे केंद्र शासनाकडून ५७०.४४ लाख रूपये व्याजाची रक्कम अद्याप प्राप्त झाली नाही. २०१७-१८ चा व्याज प्रस्ताव संस्थांकडून बँकेला प्राप्त झाला नाही. २००७-२००८ ते २०१६-१७ पर्यंत मार्केटिंग फेडरेशनकडून खड्या हुंड्यावरील एकूण ५६१.१० लाख मिळाले नाही. यामुळे शासनाचा योजना राबविताना बँकेने हित कसे सांभाळावे हा प्रश्न संचालक मंडळापुढे येत असल्याची खंत सुनील फुंडे यांनी व्यक्त केली. कर्मचाºयांनी ग्राहकांना वेळेवर उत्तम सेवा द्यावी, असा दमही या आमसभेत भरला. या आमसभेत विविध ठराव पारित करण्यात आले.११०० कोटींचा ठेवीची अपेक्षाभंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २००६ मध्ये विभाजन झाले. त्यावेळी एकूण भाग भांडवल १०.४१ कोटी व २६३.१७ कोटी ठेवी होत्या. मात्र आमसभेशी संबंधीत वर्षाअखेर बँकेत एकूण भाग भांडवल ३६.७० कोटी व एकूण ठेवी ९८६.५८ कोटी आहे. पुढील वर्षी किमान ११०० कोटी रूपयांचा ठेवी बँकेत असतील अशी अपेक्षा फुंडे यांनी व्यक्त केली.