शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

२३,३९३ शेतकरी मदतीपासून वंचित

By admin | Updated: January 24, 2015 22:48 IST

सन २०१३ मध्ये अतिवृष्टीने खरीप पिकांची नुकसान झाल्यानंतर राज्य शासनाने भंडारा जिल्ह्यातील २ लाख २२ हजार ६८३ शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र केले़ शासनाने पाठविलेल्या निधीतून

देवानंद नंदेश्वर - भंडारासन २०१३ मध्ये अतिवृष्टीने खरीप पिकांची नुकसान झाल्यानंतर राज्य शासनाने भंडारा जिल्ह्यातील २ लाख २२ हजार ६८३ शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र केले़ शासनाने पाठविलेल्या निधीतून गत डिसेंबर महिन्यापर्यत १ लाख ९९ हजार २९० शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात ४४ कोटी ८५ लाख ५५ हजार रुपयांची रक्कम जमा केली. त्या रक्कमेची शेतकऱ्यांना प्रत्यक्षात वाटप केलेले आहे़ अद्यापही २३ हजार ३९३ अतिवृष्टी बाधित शेतकरी मदतीपासून वंचीत आहेत़सन २०१३ मध्ये जिल्ह्यात खरीपाचे २ लाख १७ हजार १०४ हेक्टर क्षेत्र होते़ त्यापैकी १ लाख ९३ हजार ०४ हेक्टरमध्ये धानाचे उत्पादन घेण्यात आले़ कृषी विभागाच्या अहवालानुसार ९६ टक्के क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली होती़ यात सर्वाधिक १ लाख ८७ हजार २६७ हेक्टरमध्ये धानपिकाची लागवड करण्यात आली होती. जून व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचेही नुकसान झाले होते. पिकांची नुकसान झाल्यानंतर राज्य शासनाने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना भात पिकाकरीता सात हजार ५०० रूपये हेक्टरी (२ हेक्टरपर्यंत मर्यादित) तर इतर पिकांकरीता पाच हजार रूपये हेक्टरी (२ हेक्टरपर्यंत मर्यादित) मदत देण्याचे देऊ केले़ त्यानुसार राज्य शासनाने भंडारा जिल्ह्यासाठी ४७ कोटी ७७ लाख ७७ हजार रुपयांचे अनुदान जिल्हा प्रशासनाकडे पाठविले. त्यानुसार जिल्ह्यातील २ लाख २२ हजार ६८३ शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने दोन टप्प्यात ४७ कोटी ५० लाख २९ हजार रुपयांचा निधी तालुकस्तरावर पाठविला. गत डिसेंबर महिन्यापर्यत १ लाख ९९ हजार २९० शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात ४४ कोटी ८५ लाख ५५ हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. त्या रक्कमेची शेतकऱ्यांना प्रत्यक्षात वाटप केलेले आहे़ परंतु अद्यापही २३ हजार ३९३ अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी पुरता बेजार झाला आहे. अजूनपर्यंत या मदतीचा थांगपत्ता नाही.