देवानंद नंदेश्वर - भंडारासन २०१३ मध्ये अतिवृष्टीने खरीप पिकांची नुकसान झाल्यानंतर राज्य शासनाने भंडारा जिल्ह्यातील २ लाख २२ हजार ६८३ शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र केले़ शासनाने पाठविलेल्या निधीतून गत डिसेंबर महिन्यापर्यत १ लाख ९९ हजार २९० शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात ४४ कोटी ८५ लाख ५५ हजार रुपयांची रक्कम जमा केली. त्या रक्कमेची शेतकऱ्यांना प्रत्यक्षात वाटप केलेले आहे़ अद्यापही २३ हजार ३९३ अतिवृष्टी बाधित शेतकरी मदतीपासून वंचीत आहेत़सन २०१३ मध्ये जिल्ह्यात खरीपाचे २ लाख १७ हजार १०४ हेक्टर क्षेत्र होते़ त्यापैकी १ लाख ९३ हजार ०४ हेक्टरमध्ये धानाचे उत्पादन घेण्यात आले़ कृषी विभागाच्या अहवालानुसार ९६ टक्के क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली होती़ यात सर्वाधिक १ लाख ८७ हजार २६७ हेक्टरमध्ये धानपिकाची लागवड करण्यात आली होती. जून व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचेही नुकसान झाले होते. पिकांची नुकसान झाल्यानंतर राज्य शासनाने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना भात पिकाकरीता सात हजार ५०० रूपये हेक्टरी (२ हेक्टरपर्यंत मर्यादित) तर इतर पिकांकरीता पाच हजार रूपये हेक्टरी (२ हेक्टरपर्यंत मर्यादित) मदत देण्याचे देऊ केले़ त्यानुसार राज्य शासनाने भंडारा जिल्ह्यासाठी ४७ कोटी ७७ लाख ७७ हजार रुपयांचे अनुदान जिल्हा प्रशासनाकडे पाठविले. त्यानुसार जिल्ह्यातील २ लाख २२ हजार ६८३ शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने दोन टप्प्यात ४७ कोटी ५० लाख २९ हजार रुपयांचा निधी तालुकस्तरावर पाठविला. गत डिसेंबर महिन्यापर्यत १ लाख ९९ हजार २९० शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात ४४ कोटी ८५ लाख ५५ हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. त्या रक्कमेची शेतकऱ्यांना प्रत्यक्षात वाटप केलेले आहे़ परंतु अद्यापही २३ हजार ३९३ अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी पुरता बेजार झाला आहे. अजूनपर्यंत या मदतीचा थांगपत्ता नाही.
२३,३९३ शेतकरी मदतीपासून वंचित
By admin | Updated: January 24, 2015 22:48 IST