शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

२३,३९३ शेतकरी मदतीपासून वंचित

By admin | Updated: January 24, 2015 22:48 IST

सन २०१३ मध्ये अतिवृष्टीने खरीप पिकांची नुकसान झाल्यानंतर राज्य शासनाने भंडारा जिल्ह्यातील २ लाख २२ हजार ६८३ शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र केले़ शासनाने पाठविलेल्या निधीतून

देवानंद नंदेश्वर - भंडारासन २०१३ मध्ये अतिवृष्टीने खरीप पिकांची नुकसान झाल्यानंतर राज्य शासनाने भंडारा जिल्ह्यातील २ लाख २२ हजार ६८३ शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र केले़ शासनाने पाठविलेल्या निधीतून गत डिसेंबर महिन्यापर्यत १ लाख ९९ हजार २९० शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात ४४ कोटी ८५ लाख ५५ हजार रुपयांची रक्कम जमा केली. त्या रक्कमेची शेतकऱ्यांना प्रत्यक्षात वाटप केलेले आहे़ अद्यापही २३ हजार ३९३ अतिवृष्टी बाधित शेतकरी मदतीपासून वंचीत आहेत़सन २०१३ मध्ये जिल्ह्यात खरीपाचे २ लाख १७ हजार १०४ हेक्टर क्षेत्र होते़ त्यापैकी १ लाख ९३ हजार ०४ हेक्टरमध्ये धानाचे उत्पादन घेण्यात आले़ कृषी विभागाच्या अहवालानुसार ९६ टक्के क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली होती़ यात सर्वाधिक १ लाख ८७ हजार २६७ हेक्टरमध्ये धानपिकाची लागवड करण्यात आली होती. जून व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचेही नुकसान झाले होते. पिकांची नुकसान झाल्यानंतर राज्य शासनाने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना भात पिकाकरीता सात हजार ५०० रूपये हेक्टरी (२ हेक्टरपर्यंत मर्यादित) तर इतर पिकांकरीता पाच हजार रूपये हेक्टरी (२ हेक्टरपर्यंत मर्यादित) मदत देण्याचे देऊ केले़ त्यानुसार राज्य शासनाने भंडारा जिल्ह्यासाठी ४७ कोटी ७७ लाख ७७ हजार रुपयांचे अनुदान जिल्हा प्रशासनाकडे पाठविले. त्यानुसार जिल्ह्यातील २ लाख २२ हजार ६८३ शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने दोन टप्प्यात ४७ कोटी ५० लाख २९ हजार रुपयांचा निधी तालुकस्तरावर पाठविला. गत डिसेंबर महिन्यापर्यत १ लाख ९९ हजार २९० शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात ४४ कोटी ८५ लाख ५५ हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. त्या रक्कमेची शेतकऱ्यांना प्रत्यक्षात वाटप केलेले आहे़ परंतु अद्यापही २३ हजार ३९३ अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी पुरता बेजार झाला आहे. अजूनपर्यंत या मदतीचा थांगपत्ता नाही.