शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

वर्षभरात १७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

By admin | Updated: August 13, 2014 23:38 IST

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून यावर्षी भंडारा जिल्ह्यातील १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येते.

संजय साठवणे - साकोली नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून यावर्षी भंडारा जिल्ह्यातील १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येते. परंतु जिल्हा प्रशासनाने १७ पैकी नऊ प्रकरणे अपात्र ठरविली असून सात प्रकरणे प्रलंबित ठरविण्यात आलेली आहेत. मागीलवर्षी अतिवृष्टी तर यावर्षी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस नसल्यामुळे रोवणी अजूनही शिल्लक आहेत. अगोदरच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा कर्ज घेतले आहे. मात्र यावर्षीच्या पिकाची हमी नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. साकोली तालुक्यात सिंचनाची पुरेशी सुविधा नाही. १७ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये कुमोद कांबळे (४५) रा.धर्मापुरी (साकोली), यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. दर्याव बिसने (६५) केसलवाडा (लाखनी) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. नामदेव पचारे (५०) रा.लाखनी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सखाराम दोनोडे (४२), परसटोला (साकोली) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. यशवंत झिंगरे (३२) रा.पालांदूर (लाखनी) पाण्यात मृतावस्थेत आढळून आले. महादेव पराते (३८) रा.उमरझरी (साकोली) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. दयाराम कोळे (४५) रा.पळसगाव (साकोली) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. यशवंत मेश्राम (५२) रा.खेडेपार (लाखनी) यांनी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. माधोराव लांजेवार (६८) रा.निलागोंदी (लाखनी) यांनी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. राजेंद्र विठोले (४०) रा.तामसवाडी (तुमसर) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. रमेश रहांगडाले (३६) रा.एकोडी (किन्ही) साकोली हे मृतावस्थेत आढळून आले. हरिहर गहेरवार (३५) रा. मेंढा (लाखनी) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सीताराम भागडकर (५५) रा.करांडला हे शेतात मृतावस्थेत आढळून आले. रामचंद्र चौधरी (६७) रा.लाखांदूर हे मृतावस्थेत आढळून आले. ज्ञानेश्वर मिसार (४०) रा.डोकेसरांडी (लाखांदूर) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. बिसन गिरीपुंजे (६५) रा.किन्ही (साकोली) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. बळीराम उईके (७७) रा.पवनारा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद आहे. यात साकोली व लाखनी तालुक्यातील सर्वाधिक आहेत.मृतकांच्या वारसांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या मदतीसाठी घेण्यात आलेल्या बैठकीत यशवंत मेश्राम रा.खेडेपार या एकाच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे प्रकरण पात्र ठरले. ७ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांच्या वारसांना शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. दरवर्षी नापिकी व कर्जबाजारी पणामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या आत्महत्या थांबविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.