शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात १७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

By admin | Updated: August 13, 2014 23:38 IST

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून यावर्षी भंडारा जिल्ह्यातील १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येते.

संजय साठवणे - साकोली नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून यावर्षी भंडारा जिल्ह्यातील १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येते. परंतु जिल्हा प्रशासनाने १७ पैकी नऊ प्रकरणे अपात्र ठरविली असून सात प्रकरणे प्रलंबित ठरविण्यात आलेली आहेत. मागीलवर्षी अतिवृष्टी तर यावर्षी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस नसल्यामुळे रोवणी अजूनही शिल्लक आहेत. अगोदरच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा कर्ज घेतले आहे. मात्र यावर्षीच्या पिकाची हमी नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. साकोली तालुक्यात सिंचनाची पुरेशी सुविधा नाही. १७ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये कुमोद कांबळे (४५) रा.धर्मापुरी (साकोली), यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. दर्याव बिसने (६५) केसलवाडा (लाखनी) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. नामदेव पचारे (५०) रा.लाखनी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सखाराम दोनोडे (४२), परसटोला (साकोली) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. यशवंत झिंगरे (३२) रा.पालांदूर (लाखनी) पाण्यात मृतावस्थेत आढळून आले. महादेव पराते (३८) रा.उमरझरी (साकोली) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. दयाराम कोळे (४५) रा.पळसगाव (साकोली) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. यशवंत मेश्राम (५२) रा.खेडेपार (लाखनी) यांनी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. माधोराव लांजेवार (६८) रा.निलागोंदी (लाखनी) यांनी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. राजेंद्र विठोले (४०) रा.तामसवाडी (तुमसर) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. रमेश रहांगडाले (३६) रा.एकोडी (किन्ही) साकोली हे मृतावस्थेत आढळून आले. हरिहर गहेरवार (३५) रा. मेंढा (लाखनी) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सीताराम भागडकर (५५) रा.करांडला हे शेतात मृतावस्थेत आढळून आले. रामचंद्र चौधरी (६७) रा.लाखांदूर हे मृतावस्थेत आढळून आले. ज्ञानेश्वर मिसार (४०) रा.डोकेसरांडी (लाखांदूर) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. बिसन गिरीपुंजे (६५) रा.किन्ही (साकोली) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. बळीराम उईके (७७) रा.पवनारा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद आहे. यात साकोली व लाखनी तालुक्यातील सर्वाधिक आहेत.मृतकांच्या वारसांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या मदतीसाठी घेण्यात आलेल्या बैठकीत यशवंत मेश्राम रा.खेडेपार या एकाच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे प्रकरण पात्र ठरले. ७ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांच्या वारसांना शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. दरवर्षी नापिकी व कर्जबाजारी पणामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या आत्महत्या थांबविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.