शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

संगतीचा परिणाम किती खोलवर रुजतो हे शिकवतात रामायण-महाभारतातील 'या' दोन व्यक्तिरेखा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 17:36 IST

वाईट गोष्टी शिकवाव्या लागत नाहीत, पण चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी संगत सोबत चांगलीच असावी लागते!

आपला जन्म कुठे व्हावा, हे आपल्या हातात नाही, परंतु आपण संगत कोणाशी ठेवू शकतो, हे आपल्या हातात आहे. कारण, आपण ज्या व्यक्तींच्या, विचारांच्या सान्निध्यात राहतो, तसे आपले विचार घडत जातात. आपल्याही नकळत दुसऱ्यांच्या लकबी, शब्द आत्मसात होतात. विशेषत: वाईट गोष्टी चटकन अंगवळणी पडतात. उदाहरण द्यायचे, तर अपशब्द किंवा शिव्या मुलांना शिकवाव्या लागत नाही. कुठून तरी ऐकून ते शिकतात आणि प्रसंगी पद्धतशीरपणे त्याचा प्रयोगही करतात. मात्र चांगले श्लोक, सुविचार त्यांना शिकवावे लागतात. नव्हे तर घोकून घ्यावे लागतात. तरी ऐनवेळेवर त्यांना ते सुचतील, आठवतील असे नाही. म्हणून तर शालेय जीवनात आपली अधोगती दिसू लागली, की शिक्षिका आपल्या रोजनिशीत शेरा लिहून देत, 'आपल्या पाल्याची संगत बदला.' हा नियम शाळेपुरता नाही, तर आयुष्यभराचा आहे.

बालपणी आपल्याला छान श्लोक शिकवला होता, तो आठवतोय का? चला उजळणी करू.सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो,कलंक मतीचा घडो, विषय सर्वथा नावडो,सदंध्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो,वियोग घडता रडो, मन भवत्चरित्री जडो!

याची आणखीही कडवी आहेत. परंतु, इथे पाहूया, या श्लोकाची पहिली ओळ. नेहमी चांगली संगतच हवी. कानावर सतत चांगल्याच गोष्टी पडल्या पाहिजेत.  एवढा एकच नियम जरी पाळला, तरी आपले आयुष्य खूप सोपे होईल. पण नाही. आपण सतत नकारात्मक गोष्टींच्या छायेत असतो आणि तसाच विचार करू लागतो. यासाठी रामायण आणि महाभारतातील दोन उदाहरणे पाहू.

'कैकयी' या नावाभोवती नकारात्मक छटा आहे. कारण, तिने रामाला वनवासाला पाठवून, आपला पूत्र भरत याच्यासाठी राज्यसिंहासन मागून घेतले होते. परंतु, तुम्हाला माहित आहे का? कैकयी आधी तशी नव्हती. कौसल्येपेक्षा रामावर ती जास्त प्रेम करत होती. एवढेच नाही, तर भरतापेक्षाही जास्त, ती रामाचे लाड करत असे. मग असे असतानाही ती एकाएक रामाच्या बाबतीत एवढी कठोर का झाली? तर उत्तर आहे, संगत! मंथरा नावाची दासी तिच्या सान्निध्यात आली. तिने तिचे वाईट आणि कुत्सित विचार कैकयीच्या डोक्यात भरले आणि कैकयी तिच्या विचाराने विचार करू लागली, मग तिलाही सगळे वाईटच दिसू लागले. अशी मंथरा केवळ कैकयीच्या नाही तर आपल्याही अवती भोवती असते. तिला वेळीच ओळखून पळवून लावले पाहिजे. कलियुगात मंथरेची रूपे अनेक आहेत. टीव्ही, इंटरनेट, महामालिका, चित्रपट, सोशल मीडिया इ. गोष्टी ज्ञानाबरोबर वाईट गोष्टींचाही प्रसार करत आहेत. त्यांचा पुरेसा वापर करून त्यांना चार हात लांब ठेवणे उत्तम!

दुसरे उदाहरण कृष्णाचे. युद्धाचा प्रसंग जवळ आलेला असताना दुर्योधन आणि अर्जुन कृष्णाजवळ आले. कृष्णाने विचारले, तुम्हाला मी हवा आहे की माझे सैन्य? दुर्योधनाने सैन्य तर अर्जुनाने कृष्णाला मागून घेतले. याचा परिणाम असा झाला, की कुरुक्षेत्रावर लढण्याऐवजी अर्जुनाला नकारात्मक विचारांनी घेरले, तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला मार्गदर्शन केले. त्याच्या मनातील वाईट गोष्टी बाजूला करून चांगल्या गोष्टींसाठी, ध्येयासाठी, अधर्माविरुद्ध लढण्यासाठी प्रोत्साहित केले. आपल्याही आयुष्यात अर्जुनावर आली तशी वेळ वारंवार येत असते. तेव्हा आपल्याबरोबर कृष्णासारखी व्यक्ती असायला हवी. जी आपले विचार बदलून चांगल्या कामासाठी आपल्याला प्रवृत्त करेल.

म्हणून आजपासून डोळसपणे पहा. आपण कोणाच्या सहवासात आहोत? मंथरेच्या, की कृष्णाच्या? 

टॅग्स :ramayanरामायणMahabharatमहाभारत