शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

संगतीचा परिणाम किती खोलवर रुजतो हे शिकवतात रामायण-महाभारतातील 'या' दोन व्यक्तिरेखा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 17:36 IST

वाईट गोष्टी शिकवाव्या लागत नाहीत, पण चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी संगत सोबत चांगलीच असावी लागते!

आपला जन्म कुठे व्हावा, हे आपल्या हातात नाही, परंतु आपण संगत कोणाशी ठेवू शकतो, हे आपल्या हातात आहे. कारण, आपण ज्या व्यक्तींच्या, विचारांच्या सान्निध्यात राहतो, तसे आपले विचार घडत जातात. आपल्याही नकळत दुसऱ्यांच्या लकबी, शब्द आत्मसात होतात. विशेषत: वाईट गोष्टी चटकन अंगवळणी पडतात. उदाहरण द्यायचे, तर अपशब्द किंवा शिव्या मुलांना शिकवाव्या लागत नाही. कुठून तरी ऐकून ते शिकतात आणि प्रसंगी पद्धतशीरपणे त्याचा प्रयोगही करतात. मात्र चांगले श्लोक, सुविचार त्यांना शिकवावे लागतात. नव्हे तर घोकून घ्यावे लागतात. तरी ऐनवेळेवर त्यांना ते सुचतील, आठवतील असे नाही. म्हणून तर शालेय जीवनात आपली अधोगती दिसू लागली, की शिक्षिका आपल्या रोजनिशीत शेरा लिहून देत, 'आपल्या पाल्याची संगत बदला.' हा नियम शाळेपुरता नाही, तर आयुष्यभराचा आहे.

बालपणी आपल्याला छान श्लोक शिकवला होता, तो आठवतोय का? चला उजळणी करू.सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो,कलंक मतीचा घडो, विषय सर्वथा नावडो,सदंध्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो,वियोग घडता रडो, मन भवत्चरित्री जडो!

याची आणखीही कडवी आहेत. परंतु, इथे पाहूया, या श्लोकाची पहिली ओळ. नेहमी चांगली संगतच हवी. कानावर सतत चांगल्याच गोष्टी पडल्या पाहिजेत.  एवढा एकच नियम जरी पाळला, तरी आपले आयुष्य खूप सोपे होईल. पण नाही. आपण सतत नकारात्मक गोष्टींच्या छायेत असतो आणि तसाच विचार करू लागतो. यासाठी रामायण आणि महाभारतातील दोन उदाहरणे पाहू.

'कैकयी' या नावाभोवती नकारात्मक छटा आहे. कारण, तिने रामाला वनवासाला पाठवून, आपला पूत्र भरत याच्यासाठी राज्यसिंहासन मागून घेतले होते. परंतु, तुम्हाला माहित आहे का? कैकयी आधी तशी नव्हती. कौसल्येपेक्षा रामावर ती जास्त प्रेम करत होती. एवढेच नाही, तर भरतापेक्षाही जास्त, ती रामाचे लाड करत असे. मग असे असतानाही ती एकाएक रामाच्या बाबतीत एवढी कठोर का झाली? तर उत्तर आहे, संगत! मंथरा नावाची दासी तिच्या सान्निध्यात आली. तिने तिचे वाईट आणि कुत्सित विचार कैकयीच्या डोक्यात भरले आणि कैकयी तिच्या विचाराने विचार करू लागली, मग तिलाही सगळे वाईटच दिसू लागले. अशी मंथरा केवळ कैकयीच्या नाही तर आपल्याही अवती भोवती असते. तिला वेळीच ओळखून पळवून लावले पाहिजे. कलियुगात मंथरेची रूपे अनेक आहेत. टीव्ही, इंटरनेट, महामालिका, चित्रपट, सोशल मीडिया इ. गोष्टी ज्ञानाबरोबर वाईट गोष्टींचाही प्रसार करत आहेत. त्यांचा पुरेसा वापर करून त्यांना चार हात लांब ठेवणे उत्तम!

दुसरे उदाहरण कृष्णाचे. युद्धाचा प्रसंग जवळ आलेला असताना दुर्योधन आणि अर्जुन कृष्णाजवळ आले. कृष्णाने विचारले, तुम्हाला मी हवा आहे की माझे सैन्य? दुर्योधनाने सैन्य तर अर्जुनाने कृष्णाला मागून घेतले. याचा परिणाम असा झाला, की कुरुक्षेत्रावर लढण्याऐवजी अर्जुनाला नकारात्मक विचारांनी घेरले, तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला मार्गदर्शन केले. त्याच्या मनातील वाईट गोष्टी बाजूला करून चांगल्या गोष्टींसाठी, ध्येयासाठी, अधर्माविरुद्ध लढण्यासाठी प्रोत्साहित केले. आपल्याही आयुष्यात अर्जुनावर आली तशी वेळ वारंवार येत असते. तेव्हा आपल्याबरोबर कृष्णासारखी व्यक्ती असायला हवी. जी आपले विचार बदलून चांगल्या कामासाठी आपल्याला प्रवृत्त करेल.

म्हणून आजपासून डोळसपणे पहा. आपण कोणाच्या सहवासात आहोत? मंथरेच्या, की कृष्णाच्या? 

टॅग्स :ramayanरामायणMahabharatमहाभारत