शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यात दोनच अशा गोष्टी आहेत, ज्या दिल्याने वाढतात!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: April 8, 2021 12:28 IST

या दोन्ही गोष्टी आपल्याकडे असतात पण आपण त्याचा वापर करत नाही. या दोन्ही गोष्टीची जगाला गरज आहे. कधी देऊन तर बघा, मोबदल्यात किती आनंद मिळतो ते कळेल!

आपण केवळ कुठून काय, कधी मिळेल याचा सतत विचार करत असतो. त्यामुळे कुठे, कधी, काय द्यायचे हा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. कारण आपल्याला घेण्याची सवय लागलेली आहे, देण्याची नाही. दिल्याने गोष्टी कमी होतात आणि घेतल्याने वाढतात, एवढाच हिशोब आपल्याला माहित असतो. परंतु अशा दोन गोष्टी आहेत, ज्या दिल्याने वाढतात. त्याचा वापर आपण कधी केलाय का? त्या दोन गोष्टी म्हणजे सुहास्य आणि सदिच्छा! या दोन्ही गोष्टी आपल्याकडे असतात पण आपण त्याचा वापर करत नाही. या दोन्ही गोष्टीची जगाला गरज आहे. कधी देऊन तर बघा, मोबदल्यात किती आनंद मिळतो ते कळेल!

एकदा एका बांधकामाच्या ठिकाणी अभियंता देखरेख ठेवत होता. काम सुरळीत चालले होते. अशातच त्या धुळीने माखलेल्या परिसरात एक बालमूर्ती डोक्यावर वीटांचा भार वाहून नेत होती. अभियंत्याने हाक मारून त्या मुलाला जवळ बोलावले. त्याला कोणी कामावर ठेवले म्हणून विचारणा केली. मुलगा घाबरला, तो हात जोडून म्हणाला, `मीच ठेकेदाराच्या हातापाया पडून हे काम मिळवले आहे, माझे काम काढून घेऊ नका.'

अभियंता म्हणाला, `बालमजरांकडून काम करून घेणे हा गुन्हा आहे. तुझे वय काम करण्याचे नाही, शाळेत जाण्याचे आहे. तू शाळेत जात नाहीस का? तुझ्या वडिलांनी तुला कामाला जा सांगितले का?'

मुलगा म्हणाला, `नाही, माझ्या आई वडिलांनी मला शाळेत पाठवले होते. तिथे खिचडी मिळते म्हणून. पण त्याने फक्त माझे एकट्याचे पोट भरले असते. ते दोघे उपाशी राहिले असते. म्हणून शाळेत न जाता मी इथे कामाला आलो. रोजंदारी मिळाली, तर आई वडिलांचेही पोट भरू शकेन.''तुझे वडील काम करत नाहीत का?'- अभियंता म्हणाला.'करतात ना, इथे तेच काम करत होते. परंतु गेल्या आठवड्यात सामानाची ने आण करताना अपघात झाला आणि त्यांचा पाय जखमी झाला. त्यामुळे ते कामाला येऊ शकले नाहीत आणि आमच्या घराचे अन्न पाणी बंद झाले. म्हणून मी कामावर आलो.'

मुलाचे बोल ऐकून अभियंत्याला आपले बालपण आठवले आणि कष्ट करून इथवर केलेला प्रवास आठवला. अभियंता म्हणाला, `तुला पाढे पाठ आहेत? कितीपर्यंत येतात? मला लिहून दाखवशील?' 

मुलगा हुशार होता. हो म्हणत लगेच त्याने कागद पेन्सिल घेऊन पंधरा पर्यंतचे पाढे स्वच्छ हस्ताक्षरात लिहून दाखवले. ते पाहून अभियंत्याने त्याची पाठ थोपटली आणि ठेकेदाराला बोलावून घेत पंधरा दिवसांचा पगार मुलाला द्यायला लावला. तसेच त्याच्या वडिलांच्या उपचाराची जबाबदारीही घ्यायला सांगितली. अभियंता मुलाला म्हणाला, 'बाळा, ही तुझी रोजंदारी नाही, तर हा पगार आहे. जो शिक्षण पूर्ण करून नोकरी केल्यावर मिळतो. तू इमानदारीने आणि हुशारीने पंधरा पाढे लिहिले, त्याचा पंधरा दिवसांचा पगार. पुढच्या पंधरा दिवसात १६-३० पाढे पाठ करून ये आणि आणखी पंधरा दिवसांचा पगार घेऊन जा. तोवर तुझे वडील बरे होतील आणि तुला मजुरी न करता शाळेत जाता येईल. तुझी खरी जागा शाळेत आहे. मेहनत घ्यायची तर शिक्षणात घे, बाकी गोष्टी आपोआप मिळतील. भविष्यात तूही माझ्यासारखा अभियंता होशील आणि दुसऱ्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व समजवून सांगशील.'

मुलगा आनंदाने घरी गेला. त्याचे आयुष्य सावरता आले, याचा अभियंत्याला आनंद झाला. त्याने एकाच वेळी सुहास्य आणि सदिच्छा यांची भेट देऊन मुलाला सन्मार्गाला लावले. तेच काम आपल्यालाही कोणाच्या बाबतीत करता आले तर किती बरे होईल ना?