शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

आयुष्यात दोनच अशा गोष्टी आहेत, ज्या दिल्याने वाढतात!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: April 8, 2021 12:28 IST

या दोन्ही गोष्टी आपल्याकडे असतात पण आपण त्याचा वापर करत नाही. या दोन्ही गोष्टीची जगाला गरज आहे. कधी देऊन तर बघा, मोबदल्यात किती आनंद मिळतो ते कळेल!

आपण केवळ कुठून काय, कधी मिळेल याचा सतत विचार करत असतो. त्यामुळे कुठे, कधी, काय द्यायचे हा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. कारण आपल्याला घेण्याची सवय लागलेली आहे, देण्याची नाही. दिल्याने गोष्टी कमी होतात आणि घेतल्याने वाढतात, एवढाच हिशोब आपल्याला माहित असतो. परंतु अशा दोन गोष्टी आहेत, ज्या दिल्याने वाढतात. त्याचा वापर आपण कधी केलाय का? त्या दोन गोष्टी म्हणजे सुहास्य आणि सदिच्छा! या दोन्ही गोष्टी आपल्याकडे असतात पण आपण त्याचा वापर करत नाही. या दोन्ही गोष्टीची जगाला गरज आहे. कधी देऊन तर बघा, मोबदल्यात किती आनंद मिळतो ते कळेल!

एकदा एका बांधकामाच्या ठिकाणी अभियंता देखरेख ठेवत होता. काम सुरळीत चालले होते. अशातच त्या धुळीने माखलेल्या परिसरात एक बालमूर्ती डोक्यावर वीटांचा भार वाहून नेत होती. अभियंत्याने हाक मारून त्या मुलाला जवळ बोलावले. त्याला कोणी कामावर ठेवले म्हणून विचारणा केली. मुलगा घाबरला, तो हात जोडून म्हणाला, `मीच ठेकेदाराच्या हातापाया पडून हे काम मिळवले आहे, माझे काम काढून घेऊ नका.'

अभियंता म्हणाला, `बालमजरांकडून काम करून घेणे हा गुन्हा आहे. तुझे वय काम करण्याचे नाही, शाळेत जाण्याचे आहे. तू शाळेत जात नाहीस का? तुझ्या वडिलांनी तुला कामाला जा सांगितले का?'

मुलगा म्हणाला, `नाही, माझ्या आई वडिलांनी मला शाळेत पाठवले होते. तिथे खिचडी मिळते म्हणून. पण त्याने फक्त माझे एकट्याचे पोट भरले असते. ते दोघे उपाशी राहिले असते. म्हणून शाळेत न जाता मी इथे कामाला आलो. रोजंदारी मिळाली, तर आई वडिलांचेही पोट भरू शकेन.''तुझे वडील काम करत नाहीत का?'- अभियंता म्हणाला.'करतात ना, इथे तेच काम करत होते. परंतु गेल्या आठवड्यात सामानाची ने आण करताना अपघात झाला आणि त्यांचा पाय जखमी झाला. त्यामुळे ते कामाला येऊ शकले नाहीत आणि आमच्या घराचे अन्न पाणी बंद झाले. म्हणून मी कामावर आलो.'

मुलाचे बोल ऐकून अभियंत्याला आपले बालपण आठवले आणि कष्ट करून इथवर केलेला प्रवास आठवला. अभियंता म्हणाला, `तुला पाढे पाठ आहेत? कितीपर्यंत येतात? मला लिहून दाखवशील?' 

मुलगा हुशार होता. हो म्हणत लगेच त्याने कागद पेन्सिल घेऊन पंधरा पर्यंतचे पाढे स्वच्छ हस्ताक्षरात लिहून दाखवले. ते पाहून अभियंत्याने त्याची पाठ थोपटली आणि ठेकेदाराला बोलावून घेत पंधरा दिवसांचा पगार मुलाला द्यायला लावला. तसेच त्याच्या वडिलांच्या उपचाराची जबाबदारीही घ्यायला सांगितली. अभियंता मुलाला म्हणाला, 'बाळा, ही तुझी रोजंदारी नाही, तर हा पगार आहे. जो शिक्षण पूर्ण करून नोकरी केल्यावर मिळतो. तू इमानदारीने आणि हुशारीने पंधरा पाढे लिहिले, त्याचा पंधरा दिवसांचा पगार. पुढच्या पंधरा दिवसात १६-३० पाढे पाठ करून ये आणि आणखी पंधरा दिवसांचा पगार घेऊन जा. तोवर तुझे वडील बरे होतील आणि तुला मजुरी न करता शाळेत जाता येईल. तुझी खरी जागा शाळेत आहे. मेहनत घ्यायची तर शिक्षणात घे, बाकी गोष्टी आपोआप मिळतील. भविष्यात तूही माझ्यासारखा अभियंता होशील आणि दुसऱ्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व समजवून सांगशील.'

मुलगा आनंदाने घरी गेला. त्याचे आयुष्य सावरता आले, याचा अभियंत्याला आनंद झाला. त्याने एकाच वेळी सुहास्य आणि सदिच्छा यांची भेट देऊन मुलाला सन्मार्गाला लावले. तेच काम आपल्यालाही कोणाच्या बाबतीत करता आले तर किती बरे होईल ना?