शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अहंकार असो कितीही मोठा, नम्रतेपुढे दिसतो छोटा; वाचा आम्रवृक्षाचे व गवताच्या पातीचे भांडण

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 25, 2021 12:52 IST

विश्वातील सर्वोच्च शक्तीपुढे प्रत्येकाने नम्र असायला हवे. नम्रता हा सद्गुण आहे.

आम्रवृक्ष मोठ्या डौलदारपणे उभा होता. वाऱ्याची एक लहानशी झुळूक येताच बाजूचे गवताचे पाते हलले. त्याबरोबर आम्रवृक्षाला हसू फुटले.  ते हसू छद्मीपणाचे होते. त्याला अहंकाराचा वास तर भरपूर होता. आपल्याला कोण हसले म्हणून गवताने मान उंचावून पाहिले. आम्रवृक्ष त्याला म्हणाला, 'किती नाजूक रे तू? मी मात्र लहानपणापासून कणखर बरं का! नमणं, वाकणं, घाबरणं मला ठाऊक नाही!' 

त्यावर गवताचे पाते हळू आवाजात म्हणाले, 'भीती वाटत नाही, हे ठीक आहे. परंतु विश्वातील सर्वोच्च शक्तीपुढे प्रत्येकाने नम्र असायला हवे. नम्रता हा सद्गुण आहे.' यावर तो आम्रवृक्ष खदाखदा हसून म्हणाला, `कसला देव आणि कसले काय? काही खरं नसतं. सगळं काही मीच. आता हेच बघ ना! माझी इच्छा नव्हती म्हणून नाही हललो मी, आता मी तुला हलून दाखवतो बघ!' असे म्हणून तो गदागदा हलू लागला.

परंतु गवताच्या पात्याच्या लक्षात आले, केवळ अचानक सुटलेल्या वादळामुळेच तो हलत होता. परंतु अहंभावामुळे त्याला त्याची जाणीव नव्हती. पाहता पाहता वादळवारा वाढला. सगळ्या वातावरणाला घाबरवणारा, थरकाप उडवणारा विचित्र वेग आला. पाहता पाहता आंब्याचे झाड उन्मळून पडले आणि परमेश्वरावर विसंबून असलेले नाजूक, छोटे गवताचे पाते मात्र नम्रतेने तसेच तग धरून उभे होते. तेही वंदनीय होऊन.

म्हणून तुकाराम महाराजांनी वर्णन केले आहे, 'महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती.' तसेच,समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात म्हणतात, 

जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेधी,तया भोजनाची रुचि प्राप्त कैची,अहंभाव ज्या मानसीचा विरेना,तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना।। श्रीराम।।