शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

अहंकार असो कितीही मोठा, नम्रतेपुढे दिसतो छोटा; वाचा आम्रवृक्षाचे व गवताच्या पातीचे भांडण

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 25, 2021 12:52 IST

विश्वातील सर्वोच्च शक्तीपुढे प्रत्येकाने नम्र असायला हवे. नम्रता हा सद्गुण आहे.

आम्रवृक्ष मोठ्या डौलदारपणे उभा होता. वाऱ्याची एक लहानशी झुळूक येताच बाजूचे गवताचे पाते हलले. त्याबरोबर आम्रवृक्षाला हसू फुटले.  ते हसू छद्मीपणाचे होते. त्याला अहंकाराचा वास तर भरपूर होता. आपल्याला कोण हसले म्हणून गवताने मान उंचावून पाहिले. आम्रवृक्ष त्याला म्हणाला, 'किती नाजूक रे तू? मी मात्र लहानपणापासून कणखर बरं का! नमणं, वाकणं, घाबरणं मला ठाऊक नाही!' 

त्यावर गवताचे पाते हळू आवाजात म्हणाले, 'भीती वाटत नाही, हे ठीक आहे. परंतु विश्वातील सर्वोच्च शक्तीपुढे प्रत्येकाने नम्र असायला हवे. नम्रता हा सद्गुण आहे.' यावर तो आम्रवृक्ष खदाखदा हसून म्हणाला, `कसला देव आणि कसले काय? काही खरं नसतं. सगळं काही मीच. आता हेच बघ ना! माझी इच्छा नव्हती म्हणून नाही हललो मी, आता मी तुला हलून दाखवतो बघ!' असे म्हणून तो गदागदा हलू लागला.

परंतु गवताच्या पात्याच्या लक्षात आले, केवळ अचानक सुटलेल्या वादळामुळेच तो हलत होता. परंतु अहंभावामुळे त्याला त्याची जाणीव नव्हती. पाहता पाहता वादळवारा वाढला. सगळ्या वातावरणाला घाबरवणारा, थरकाप उडवणारा विचित्र वेग आला. पाहता पाहता आंब्याचे झाड उन्मळून पडले आणि परमेश्वरावर विसंबून असलेले नाजूक, छोटे गवताचे पाते मात्र नम्रतेने तसेच तग धरून उभे होते. तेही वंदनीय होऊन.

म्हणून तुकाराम महाराजांनी वर्णन केले आहे, 'महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती.' तसेच,समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात म्हणतात, 

जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेधी,तया भोजनाची रुचि प्राप्त कैची,अहंभाव ज्या मानसीचा विरेना,तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना।। श्रीराम।।