शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

भूतकाळात घडलेल्या चुकांवर हसायला शिका! - व्याख्याता संदीप माहेश्वरी

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 14, 2021 09:00 IST

आपल्याला आपल्या चुकांमधून शिकायचे तर आहेच, परंतु त्याच चुकांकडे बघून हसायलाही शिकायचे आहे. अन्यथा झालेल्या चुकांची सल आयुष्य आनंदाने जगू देणार नाही.

ज्योत्स्ना गाडगीळ 

तुम्हाला फेंगुशुईचा लाफिंग बुढ्ढा माहितीये का? तोच जो, या कानापासून त्या कानापर्यंत हसताना दिसतो. ती केवळ मूर्ती नाही, तर असेच दिलखुलासपणे जगणारे लोक आपल्या सभोवताली आहेत. त्यांना पाहता आपल्याला त्यांचे आयुष्य परिपूर्ण आहे की काय, असा प्रश्न पडतो. परंतु, समोरच्याच्या मनात हा संभ्रम निर्माण होण्याची स्थिती तयार करणे, हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. सुख, दु:ख, उद्विग्न, चिंता प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त प्रमाणात असतात. परंतु, कोणी त्याचा फार विचार करतात, तर कोणी दुर्लक्ष! म्हणून लाफिंग बुढ्ढा हा आपला आदर्श हवा. आपल्याला आपल्या चुकांमधून शिकायचे तर आहेच, परंतु त्याच चुकांकडे बघून हसायलाही शिकायचे आहे. अन्यथा झालेल्या चुकांची सल आयुष्य आनंदाने जगू देणार नाही.

हेही वाचा : एखाद्या घावाने तुम्हीही दुखावले आहात का?; खचू नका, कारण...

एका साधूंच्या आश्रमात एक युवक संन्यस्त जीवनाची दीक्षा घेण्यासाठी आला. साधूंच्या सभेत त्याने आपल्या गतकाळातील चुकांची कबुली दिली. साधू आपल्याला चुकांचे प्रायश्चित्त सुचवतील असे त्याला वाटले. परंतु झाले उलटेच. सगळे साधू त्याच्या चुका ऐकून हसू लागले. युवक खजिल झाला. त्यानंतर बराच काळ लोटला. परंतु, सगळे आपल्याला हसले, ही खंत मनातून जात नव्हती. एकदा धीर करून त्याऐकून ने आपल्या गुरुंना विचारले. `त्यादिवशी माझ्या चुकांची कबुली ऐकून सगळे मला का हसले?'

त्यावर गुरुजी उत्तरले, `बाळा, हीच सन्यस्त जीवनाची पहिली दिक्षा आहे. दुसऱ्यांच्या चुकांवर हसण्याआधी आपल्या चुकांवर हसायला शिका, म्हणजे आपल्या चुकांवर कोणी हसले, याचा राग येणार नाही. संन्याशाला राग, लोभ शोभत नाही. सामान्य मनुष्यालाही या गोष्टींचा त्याग करायचा असेल, तर त्यानेही आधी गत चुकांकडे एक अपघात म्हणून पाहिले पाहिजे आणि भूतकाळ विसरून पुढे गेले पाहिजे. तरच, भविष्य घडवता येईल. भूतकाळात अडकलेले लोक वर्तमान आणि भविष्य दोन्हीही गमावतात. म्हणून हसा आणि आयुष्य सहजतेने बघायला शिका.'

या कथेतून पुन्हा डोळ्यासमोर येतो, तो लाफिंग बुढ्ढा! ज्याचे दोन्ही हात वर, ढेरपोटे पोट, तुळतुळीत टक्कल आणि मनमोकळे हास्य आपल्याला हसायला आणि आपले प्रश्न विसरायला भाग पाडते. 

आपण आयुष्याकडे जेवढ्या गांभीर्याने पाहतो, तेवढ्या गांभीर्याने पाहण्याची खरंच गरज आहे का? आपण नुसता विचार करत राहतो, त्याने खरंच काही बदल घडणार आहे का? भूतकाळ निसटून गेला आहे, त्यातल्या वाईट आठवणी उगाळून हाती काही लागणार आहे? मग का आपण स्वत:ला त्रास करून घेत आहोत? ज्या गोष्टी बदलणार नाहीत, त्यांचा विचार न करता, ज्या गोष्टी आपण बदलवू शकू, त्याचा विचार केला, तर आयुष्य आपोआपच लाफिंग बुढ्ढासारखे आनंदी होईल. 

चुका प्रत्येकाकडून घडतात आणि त्या घडायलाही हव्यात. त्याशिवाय आपण शिकणारच नाही. दर वेळी वेगवेगळ्या चुका घडल्या तरी चालेल, पण एकच चूक वारंवार न होत नाहीये ना, हे लक्षात घेतले पाहिजे. वर्तमानात हव्या तेवढ्या चुका होऊदेत, त्यातून शिकत आपल्याला भविष्य घडवायचे आहे आणि भविष्यात भूतकाळातील आपल्याच चुका आठवून हसायचे आहे, अगदी लाफिंग बुढ्ढासारखे!

हेही वाचा : मनाचा कोपरा दररोज आवरा.