शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
5
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
6
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
7
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
8
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
9
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
10
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
11
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
12
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
13
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
14
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
15
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
16
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
17
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
18
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
19
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
20
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

चातुर्मास विशेष : रोज एक अभंग, भावार्थ आणि निरूपण : आरंभी वंदीन अयोध्येचा राजा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 16:43 IST

चातुर्मासानिमित्त सुरु केलेल्या या उपक्रमात आपण संतांनी लिहिलेल्या अभंगांचे चिंतन करत आहोत. 

समर्थ रामदास स्वामींचा हा अभंग आहे. समर्थांची भाषा तशी परखड, वास्तवाचे वर्णन करणारी आणि समाज प्रबोधनासाठी प्रसंगी खडे बोल सुनावणारी! मात्र जिथे विषय येतो राम भक्तीचा, तिथे हेच समर्थ लोण्याहून मऊ शब्दात रामरायाचे गुणगान गातात. अशीच ही सुंदर रचना जी वाचता क्षणी पं. भीमसेन जोशी यांचे शब्द कानी घुमायला लागतात- 

आरंभी वंदीन अयोध्येचा राजा ।भक्तांचीया काजा पावतसे ॥१॥

पावतसे महासंकटीं निर्वाणीं ।रामनाम वाणी उच्चारितां ॥२॥

उच्चारितां राम होय पापक्षय ।पुण्याचा निश्चय पुण्यभूमी ॥३॥

पुण्यभूमी पुण्यवंतांसीं आठवे ।पापीया नाठवे कांहिं केल्यां ॥४॥

कांहिं केल्यां तुझें मन पालटेना ।दास ह्मणे जन सावधान ॥५॥

मंगल कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या पूजेने करतो, पण रामभक्तीत आकंठ बुडालेले समर्थ या कवनात म्हणतात अयोध्येचा राजा रामचंद्र याला  वंदन करेन. याचा अर्थ त्यांचा गणेश भक्तीला विरोध होता का? तर अजिबात नाही! समर्थांनी गणेशाचेही कवन लिहिले आहे. परंतु तो काळच असा होता, की लोक आपले स्वत्व गमावून बसले होते. स्वधर्म, स्वाभिमान, स्वदेश याची कोणालाही आत्मीयता राहिली नव्हती. अशा वेळी जनतेसमोर आदर्श राजा कोण हे सोदाहरण पटवून देण्यासाठी समर्थांनी रामाचा आदर्श ठेवला. तोही सीतापती राम किंवा वनवासी राम नाही, तर रघुकुलाचा राजाराम!

 श्रीरामाची थोरवी वर्णन करताना ते दुसऱ्या ओळीत म्हणतात, भक्तांच्या हाकेला तो धावून येणारा आहे. संकटात खंबीरपणे कस उभं राहावं हे त्याच्याकडून शिकावं. म्हणून संकटकाळी देखील त्याचं स्मरण करावं. राम नामाने दगड तरून गेले तर आपणही संकटातून सहज तरून जाऊ असा विश्वास ते दुसऱ्या कडव्यात देतात. 

तिसऱ्या कडव्यात समर्थांनी खोचक टोला मारला आहे, ते म्हणतात राम नामाने तरून जालही! पण ते घ्यायचं हे त्याक्षणी आठवलं तर पाहिजे ना. पापी माणसांना तेही भान उरत नाही. मात्र पुण्यवान माणूस सजग असतो आणि तो रामाला आधी हाक मारतो. थोडक्यात रामभक्त व्हायचे तर नित्य स्मरण करा, तरच संकट काळी रामाचे स्मरण राहील, असे त्यांना सुचवायचे आहे. 

रामाची एवढी थोरवी सांगूनही लोकांमध्ये सुधारणा नाही, हे पाहून समर्थ त्यांना सावधानतेचा इशारा देतात आणि म्हणतात वेळीच सावध झाला नाहीत तर नुकसान तुमचेच आहे. म्हणून आरंभी त्या रामाला वंदन करा असे ते सांगतात. 

या अभंगाचे वैशिष्ट्य असे की यात प्रत्येक कडव्यातले शेवटचे चरण घेऊन पुढच्या कडव्याची सुरुवात केली आहे. साहित्याच्या दृष्टीनेही हे कवन सुंदर आणि अर्थपुर्ण आहे असे म्हणता येईल!