शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

चातुर्मास विशेष : रोज एक अभंग, भावार्थ आणि निरूपण : आरंभी वंदीन अयोध्येचा राजा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 16:43 IST

चातुर्मासानिमित्त सुरु केलेल्या या उपक्रमात आपण संतांनी लिहिलेल्या अभंगांचे चिंतन करत आहोत. 

समर्थ रामदास स्वामींचा हा अभंग आहे. समर्थांची भाषा तशी परखड, वास्तवाचे वर्णन करणारी आणि समाज प्रबोधनासाठी प्रसंगी खडे बोल सुनावणारी! मात्र जिथे विषय येतो राम भक्तीचा, तिथे हेच समर्थ लोण्याहून मऊ शब्दात रामरायाचे गुणगान गातात. अशीच ही सुंदर रचना जी वाचता क्षणी पं. भीमसेन जोशी यांचे शब्द कानी घुमायला लागतात- 

आरंभी वंदीन अयोध्येचा राजा ।भक्तांचीया काजा पावतसे ॥१॥

पावतसे महासंकटीं निर्वाणीं ।रामनाम वाणी उच्चारितां ॥२॥

उच्चारितां राम होय पापक्षय ।पुण्याचा निश्चय पुण्यभूमी ॥३॥

पुण्यभूमी पुण्यवंतांसीं आठवे ।पापीया नाठवे कांहिं केल्यां ॥४॥

कांहिं केल्यां तुझें मन पालटेना ।दास ह्मणे जन सावधान ॥५॥

मंगल कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या पूजेने करतो, पण रामभक्तीत आकंठ बुडालेले समर्थ या कवनात म्हणतात अयोध्येचा राजा रामचंद्र याला  वंदन करेन. याचा अर्थ त्यांचा गणेश भक्तीला विरोध होता का? तर अजिबात नाही! समर्थांनी गणेशाचेही कवन लिहिले आहे. परंतु तो काळच असा होता, की लोक आपले स्वत्व गमावून बसले होते. स्वधर्म, स्वाभिमान, स्वदेश याची कोणालाही आत्मीयता राहिली नव्हती. अशा वेळी जनतेसमोर आदर्श राजा कोण हे सोदाहरण पटवून देण्यासाठी समर्थांनी रामाचा आदर्श ठेवला. तोही सीतापती राम किंवा वनवासी राम नाही, तर रघुकुलाचा राजाराम!

 श्रीरामाची थोरवी वर्णन करताना ते दुसऱ्या ओळीत म्हणतात, भक्तांच्या हाकेला तो धावून येणारा आहे. संकटात खंबीरपणे कस उभं राहावं हे त्याच्याकडून शिकावं. म्हणून संकटकाळी देखील त्याचं स्मरण करावं. राम नामाने दगड तरून गेले तर आपणही संकटातून सहज तरून जाऊ असा विश्वास ते दुसऱ्या कडव्यात देतात. 

तिसऱ्या कडव्यात समर्थांनी खोचक टोला मारला आहे, ते म्हणतात राम नामाने तरून जालही! पण ते घ्यायचं हे त्याक्षणी आठवलं तर पाहिजे ना. पापी माणसांना तेही भान उरत नाही. मात्र पुण्यवान माणूस सजग असतो आणि तो रामाला आधी हाक मारतो. थोडक्यात रामभक्त व्हायचे तर नित्य स्मरण करा, तरच संकट काळी रामाचे स्मरण राहील, असे त्यांना सुचवायचे आहे. 

रामाची एवढी थोरवी सांगूनही लोकांमध्ये सुधारणा नाही, हे पाहून समर्थ त्यांना सावधानतेचा इशारा देतात आणि म्हणतात वेळीच सावध झाला नाहीत तर नुकसान तुमचेच आहे. म्हणून आरंभी त्या रामाला वंदन करा असे ते सांगतात. 

या अभंगाचे वैशिष्ट्य असे की यात प्रत्येक कडव्यातले शेवटचे चरण घेऊन पुढच्या कडव्याची सुरुवात केली आहे. साहित्याच्या दृष्टीनेही हे कवन सुंदर आणि अर्थपुर्ण आहे असे म्हणता येईल!