शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

१०३१ ग्रामपंचायतींपैकी ४८९ गावांमध्ये शून्य खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:29 IST

बीड : ग्रामीण भागातील विकसाकामांमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी (मनरेगा) योजना महत्त्वाची आहे. मात्र, मागील वर्षभरात मनुष्यबळ कमी असल्यामुळे ...

बीड : ग्रामीण भागातील विकसाकामांमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी (मनरेगा) योजना महत्त्वाची आहे. मात्र, मागील वर्षभरात मनुष्यबळ कमी असल्यामुळे योजना राबवताना अनेक संमस्या निर्माण झाल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मजुरांची कामासाठी मागणी असूनदेखील त्यांना काम मिळाले नाही, तर १०३१ ग्रामपंचायतींपैकी ४७९ ग्रामपंचायतींमध्ये एकही काम झाले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासदेखील खुंटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यात पंचायत समिती, कृषी, रेशीम, तहसील यासह इतर काही विभांकडून नरेगाच्या माध्यमातून विविध कामे केले जातात. मात्र, अनेक विभागांतील कामे ठप्प झालेली आहेत. कोरोना संकटात पुणे, मुंबई सांरख्या शहरातून गावी आलेल्यांची संख्या मोठी होती. त्यांच्या हाताला काम देणे गरजेचे होते. मात्र, यंत्रणेमध्ये सुसूत्रता नसल्यामुळे रोजगार हमी योजनेची कामे बहुतांश ठिकाणी सुरू झाले नाहीत. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून २०१९-२० या आर्थिक वर्षात जवळपास २५ कोटी ८५ लाख रुपये कुशल व ६६ कोटी ४२ लाख रुपयांचे अकुशल इतक्या मोठ्या प्रमाणात कामे झाली होती. मात्र, २०२१ या आर्थिक वर्षात फक्त १ कोटी ५० लाख रुपये कुशल व जवळपास १९ कोटी अकुशल इतका कमी खर्च कामांवर झाला आहे. तसेच कृषी, पंचायत समिती व इतर विभागात नरेगा कक्षात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनादेखील कमी करण्यात आले होते. त्यामुळे अनेक विभागांत नरेगा कक्षात काम करणारी पदे रिक्त असल्याने कामे खोळंबत आहेत. पुढील काळात रोजागर हमी योजना सुरळीत करून ग्रामीण भागातील विकास कामांना गती द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

कर्मचाऱ्यांवर ताण

तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रोजगार हमी योजना विभागातील कंत्राटी ऑपरेटर व इतर कर्मचाऱ्यांची भरतीप्रक्रिया खासगी संस्थेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पूर्वीप्रमाणे सेतू संस्थेमार्फत कंत्राटींची कामगारांची भरती कारवी यासाठी संघटना न्यायालयात गेली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया रखडली आहे. जवळपास ४० कंत्राटी कर्मचारी कमी आहेत. त्यामुळे आहे त्यांच्यावर कामाचा ताण येत आहे.

२०२०-२१ वर्षात ४७९ गावांमध्ये शून्य खर्च

जिल्ह्यात १०३१ ग्रापंचायती आहेत, त्यापैकी ४७९ गावांमध्ये कोणत्याही प्रकरची योजना २०२०-२१मध्ये राबवली नाही. विशेष म्हणजे अनेक गावांतील नागरिकांनी कामासाठी मागणीदेखील केलेली होती.

४३० कोटींचे लेबर बजेट

४३० कोटी रुपयांचे लेबर बजेट या वर्षासाठी तयार झाले आहेत. नरेगाची कामे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून संबंधित सर्व यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. मागणी आल्यानंतर कामाची पूर्तता केली जाईल. कामगार भरणाच्या प्रक्रियेचा निर्णय मंत्रालय स्तरावरून होईल.

संतोष राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड