लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्यावतीने सुरू असलेल्या वृक्षलागवड कार्यक्रमांमध्ये विविध ठिकाणी वनविभागाच्या जागेत असणाऱ्या रोपवाटिकेत काम करण्यासाठी परजिल्ह्यातील व राज्याच्या विविध भागातील मजुरांना आणून या ठिकाणी काम केले जात असून स्थानिक मजुरांना मात्र डावलले जात आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बंडोबा सांवत यांनी केली आहे.
धारूर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत धारूर, केज वडवणी व माजलगाव तालुक्यांतील भाग येतो. या ठिकाणी वनपरिक्षेत्र कार्यालयाची मोठ्या प्रमाणात जमीन आहे. पावसाच्या कालावधीत वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या रोपवाटिकेत वृक्ष लागवड करून त्यांची जोपासना करण्यासाठी मजुरांना कामाची संधी मिळते. मात्र, धारूर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाने धारूर, कासारी, भायजळी, धुनकवाड, देवदहिफळ, अरणवाडी, कारी आदी ठिकाणच्या कामावर भूम, परांडा व विदर्भातील मजूर आणून त्यांना काम दिले आहे. मात्र, स्थानिक मजुरांना काम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. स्वतःचे गैरव्यवहार झाकण्यासाठी फक्त वनपरिक्षेत्र या मजुरांचा वापर करीत असून या मजुरांना तत्काळ बंद करून स्थानिक मजुरांना या कामावर संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बंडोबा सावंत यांनी केली आहे. याबाबत वनपरीक्षेत्र अधिकारी यु. एच. चिटके यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.
260721\img-20210726-wa0043.jpg
परजिल्ह्ययातील येणारा मजूर