शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

बागपिंपळगाव फाटा ते तलवाडा रस्त्यावरील पुलाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:30 IST

गेवराई : तालुक्यातील महत्त्वाचा व नेहमी वर्दळ असलेला बागपिंपळगाव फाटा ते तलवाडा हा सोळा किलोमीटर अंतराचा रस्ता अत्यंत खराब ...

गेवराई : तालुक्यातील महत्त्वाचा व नेहमी वर्दळ असलेला बागपिंपळगाव फाटा ते तलवाडा हा सोळा किलोमीटर अंतराचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. आता हा रस्ता अत्यंत चांगला झाला आहे. मात्र रस्त्यावरील पुलाचे काम अर्धवट रखडले आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होत आहे. या अर्धवट पुलामुळे रात्रीच्या वेळेला अपघात होण्याची भीती असून हे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंगेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार,जयसिंग माने,शेख मोहसिन यांनी केली आहे.

तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा असलेला व नेहमी वर्दळ असलेला बागपिंपळगाव फाटा ते तलवाडा या सोळा किलोमीटर अंतराच्या राज्य मार्ग हा गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब झाला होता. त्यात या रस्त्याला दोन वर्षापूर्वी निधी मिळून चांगले कामपण झाले आहे. मात्र याच रस्त्यावर दोन ते तीन ठिकाणी मोठ्या पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे. हे सर्व पूल अर्धवट अवस्थेत असून याचे काम देखील बंद पडले आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर मोठी गावे असल्याने नेहमी मोठ्या प्रमाणात वाहनांची ये -जा चालू असते. त्यामुळे या अर्धवट रखडलेल्या पुलाचे काम त्वरित सुरू करून पूर्ण करावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंगेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार,जयसिंग माने,शेख मोहसिन सह अनेकांनी केली आहे.

तीन पुलांचे काम

या रस्त्यावर तीन पुलाचे काम चालू आहे.

रस्त्यावर नेहमी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

अर्धवट पुलामुळे रात्रीच्या वेळेला पुलाचे खड्डे दिसत नसल्याने अपघाताचा धोका होऊ शकतो.

त्यामुळे हे रखडलेल्या पुलाची कामे त्वरित करावीत अशी मागणी होत आहे.

===Photopath===

020421\20210402_151614_14.jpg