शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

आरणवाडी तलावाचा सांडवा फोडताना सर्वच पुढारी मूग गिळून गप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:35 IST

अनिल महाजन धारूर : धारूर तालुक्यात तब्बल सतरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूर्ण झालेला आरणवाडी तलाव पहिल्याच वर्षी चांगल्या पावसाने दीड ...

अनिल महाजन

धारूर

: धारूर तालुक्यात तब्बल सतरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूर्ण झालेला आरणवाडी तलाव पहिल्याच वर्षी चांगल्या पावसाने दीड महिन्यातच तुडुंब भरला. या तलावामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. मात्र, नियमबाह्यपणे कुठेही तसे नमूद नसताना लघु पाटबंधारे विभागाने दोन महिन्यांपूर्वी केलेला सांडवा चक्क फोडून लाखो लिटर पाणी नदीपात्रात सोडले.

या भागातील चार ते पाच गावचे नागरिक फोडण्याला कडाडून विरोध करीत होते. दोन दिवस तो फोडू दिला नाही. मात्र, लोकप्रतिनिधी व राजकारण्यांनी अधिकारशाहीपुढे नांगी टाकल्याने अधिकाऱ्यांनी एक होऊन कायद्याचा बडगा दाखवीत पहिल्याच वर्षी सांडवा फोडला. यावर एकाही राजकारण्याने ब्र शब्दही काढला नाही. याबद्दल मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या तलावामुळे आरणवाडी, चोरांबा, पहाडीपारगाव, थेटेगव्हाण, ढगेवाडी येथील डोंगराळ भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी सिंचनाखाली होऊन डोंगरपट्ट्यात हरितक्रांती होणार होती. या परिसरातील शेतकरी हा तलाव पूर्ण झाल्यावर आनंदी होता.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पर्यायी रस्त्याचे काम अर्धवट केल्याने त्यांनी रस्ता सुरक्षिततेच्या नावाखाली २० जुलैला पाटबंधारे विभागाला पत्र दिले व तलावात ८० ते ८५ टक्के पाणी ठेवण्यास सांगितले होते. या तलावाखालील गावांनी विरोध केला, तर महसूल, पोलीस, पाटबंधारे सर्व विभागाने एक होऊन कायद्याचा बडगा उगारला. कारवाईचा इशारा दिला. सर्व यंत्रणेचा वापर केल्याने कोणाचेच पाठबळ आंदोलनास न मिळाल्याने अधिकारशाहीचा विजय झाला आणि सांडवा फोडला.

या भागातील एकाही लोकप्रतिनिधीने या गंभीर प्रश्नावर चकार शब्दही काढला नाही. एक प्रकारे अधिकाऱ्यांची पाठराखण करण्याचे काम केले. पाच गावचे ग्रामस्थ आंदोलन करीत असताना साधे तलावाकडे फिरकले नाहीत. याबाबत त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला असता प्रमुख नेते उपलब्ध होऊ शकले नाहीत. मात्र, या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी होऊन या दोषींवर कारवाई करणे आवश्यक आहे.

गुन्हे दाखल करा

दोन महिन्यांपूर्वी या साठवण तलावाचा सांडवा केला व कुठलाही नियम नसताना स्वतःचे निकृष्ट काम लपविण्यासाठी नियमबाह्यपणे सांडवा फोडण्यात आला. याप्रकरणी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.

- सादेक इनामदार, सामाजिक कार्यकर्ते

गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतःचे गैरकृत्य झाकण्यासाठी नियमबाह्यपणे सांडवा फोडून लाखो लिटर पाणी वाया घालविले. या भागातील लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांनी जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न लक्षात घेऊन याकडे लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

-विजय शिनगारे, जलदूत

270721\img_20210725_115330_14.jpg