शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
4
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
5
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
6
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
7
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा सणसणीत टोला
8
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
9
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
10
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
11
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
12
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
13
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
14
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
15
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
16
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
17
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
18
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
19
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
20
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

अनाथ, निराधारांनी काय खायचे? कोरोनामुळे दातृत्वाचा झरा आटतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनाचा फटका जेवढा व्यापार, अर्थव्यवस्था आदीला बसला आहे, तेवढाच सामाजिक संघटनांनाही बसला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : कोरोनाचा फटका जेवढा व्यापार, अर्थव्यवस्था आदीला बसला आहे, तेवढाच सामाजिक संघटनांनाही बसला आहे. अनाथ मुलांचा सांभाळ करताना त्यांना रोज नव्या संकंटांना तोंड द्यावे लागत आहे. रोज लागणारा किराणा, भाजीपाला, धान्य यासाठी रोज एका दात्याकडे धाव घ्यावी लागत आहे. सध्या या संचालकांसह मुलांवर उपासमारीची वेळ आली असून दात्यांनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन केले जात आहे.

जिल्ह्यात शासकीय मान्यता असलेल्या चार संस्था आहेत. आर्वीला मयूरी व दीपक नागरगाेजे यांचे शांतीवन, गेवराईत प्रीती व संतोष गर्जे यांचे सहारा अनाथालय, पाली येथे संध्या व दत्ता बारगजे यांचे इन्फंट इंडिया, शिरूर तालुक्यातील ब्रम्हनाथ येळंब येथे मयूरी व सुरेश राजहंस यांचे सेवाश्रम अशी चार अनाथालये सध्या मुलांना आधार देऊन त्यांचे पालन पोषण करीत आहेत. गतवर्षीपासून या लोकांचे हाल सुरू आहेत.

पहिल्या लॉकडाऊनमध्ये तरी काही लोकांनी माणुसकीच्या दृष्टीने धाव घेत या संस्थांना मदत केली होती. परंतु आता वर्षापासून दान करणारे लाेकच घरात आहेत. त्यामुळे त्यांचीच अडचण निर्माण झाल्याने ते दान करण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. सध्या तर या संस्थाचालकांना रोज एकाचे दार गाठावे लागत आहे. इतर मदत नाही मिळाली तरी दररोज लागणारा किराणा, भाजीपाला, धान्य हे मिळविण्यासाठी त्यांची धावपळ सुरू असते. यात मुलांवरही उपासमारीची वेळ आली असून दात्यांनी पुढे येण्याची गरज आहे.

सहारा अनाथालय, गेवराई

गेवराई शहरापासून अवघ्या तीन कि.मी.अंतरावर हे अनाथालय आहे. येथे तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची मुले, आत्महत्याग्रस्त शेतकरी, लालबत्तीमधील महिलांची मुले आणि पूर्णत: अनाथ असलेल्या मुलांचा प्रीती व संतोष गर्जे हे दाम्पत्य सांभाळ करतात.

शांतीवण, आर्वी

शिरूर तालुक्यातील आर्वी येथे ही संस्था आहे. कावेरी व दीपक नागरगाेजे येथे संचालक असून आत्महत्याग्रस्त शेतकरी, अनाथ, ऊसताेड कामगार यांच्या मुलांचा येथे सांभाळ केला जाताे. त्यांचे पालन, पोषण केले जाते.

इन्फंट इंडिया, पाली

बीडपासून अवघ्या ८ कि.मी.अंतरावर पाली येथील उंच डोंगरावर ही संस्था आहे. येथे केवळ एचआयव्हीबाधीत मुलांचा आणि नागरिकांचा सांभाळ संध्या व दत्ता बारगजे हे दाम्पत्य करतात.

सेवाश्रम, ब्रम्हनाथ येळंब, शिरूर

शिरूर तालुक्यातील ब्रह्मनाथ येळंब येथे ही संस्था कार्यान्वित आहे. मयूरी व सुरेश राजहंस हे दाम्पत्य येथे संचालक आहेत. तमाशा कलावंतांच्या मुलांचा ायेथे सांभाळ केला जातो. मागील वर्षासह चालू वर्षातही येथील मुलांचा सांभाळ करताना त्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

पहिल्या लॉकडाऊनमध्ये तरी लोक थोडीफार मदत करत होते परंतु आता तेच अडचणीत असल्याने आम्हाला मदत करताना आखडता हात घेत आहेत. किराणा, भाजीपाला, दवाखाना या गरजा भागविण्यासाठी सध्या मोठी कसरत करावी लागत आहे. आम्हाला मदत करावी, एवढीच मागणी आहे.

-संतोष गर्जे गेवराई

कोरोनामुळे खूपच हाल सुरू आहेत. संस्थेत अडचणी आहेत, पण आम्हालाही कोणाकडे जाता येत नाही आणि बाहेरच्यांनाही संसर्गाच्या भीतीने येता येत नाही. त्यामुळे सगळीकडूनच मरण आले आहे. धान्य, भाजीपाला, किराणा यासाठी थोडीफार मदत मिळते, त्यातूनच सध्या भागविले जात आहे.

-सुरेश राजहंस, ब्रह्मनाथ येळंब

===Photopath===

060421\062_bed_15_06042021_14.jpeg

===Caption===

गेवराई येथील सहारा अनाथालयातील धुलीवंदनाच्या दिवशीचे छायाचित्र.