शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

अनाथ, निराधारांनी काय खायचे? कोरोनामुळे दातृत्वाचा झरा आटतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनाचा फटका जेवढा व्यापार, अर्थव्यवस्था आदीला बसला आहे, तेवढाच सामाजिक संघटनांनाही बसला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : कोरोनाचा फटका जेवढा व्यापार, अर्थव्यवस्था आदीला बसला आहे, तेवढाच सामाजिक संघटनांनाही बसला आहे. अनाथ मुलांचा सांभाळ करताना त्यांना रोज नव्या संकंटांना तोंड द्यावे लागत आहे. रोज लागणारा किराणा, भाजीपाला, धान्य यासाठी रोज एका दात्याकडे धाव घ्यावी लागत आहे. सध्या या संचालकांसह मुलांवर उपासमारीची वेळ आली असून दात्यांनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन केले जात आहे.

जिल्ह्यात शासकीय मान्यता असलेल्या चार संस्था आहेत. आर्वीला मयूरी व दीपक नागरगाेजे यांचे शांतीवन, गेवराईत प्रीती व संतोष गर्जे यांचे सहारा अनाथालय, पाली येथे संध्या व दत्ता बारगजे यांचे इन्फंट इंडिया, शिरूर तालुक्यातील ब्रम्हनाथ येळंब येथे मयूरी व सुरेश राजहंस यांचे सेवाश्रम अशी चार अनाथालये सध्या मुलांना आधार देऊन त्यांचे पालन पोषण करीत आहेत. गतवर्षीपासून या लोकांचे हाल सुरू आहेत.

पहिल्या लॉकडाऊनमध्ये तरी काही लोकांनी माणुसकीच्या दृष्टीने धाव घेत या संस्थांना मदत केली होती. परंतु आता वर्षापासून दान करणारे लाेकच घरात आहेत. त्यामुळे त्यांचीच अडचण निर्माण झाल्याने ते दान करण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. सध्या तर या संस्थाचालकांना रोज एकाचे दार गाठावे लागत आहे. इतर मदत नाही मिळाली तरी दररोज लागणारा किराणा, भाजीपाला, धान्य हे मिळविण्यासाठी त्यांची धावपळ सुरू असते. यात मुलांवरही उपासमारीची वेळ आली असून दात्यांनी पुढे येण्याची गरज आहे.

सहारा अनाथालय, गेवराई

गेवराई शहरापासून अवघ्या तीन कि.मी.अंतरावर हे अनाथालय आहे. येथे तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची मुले, आत्महत्याग्रस्त शेतकरी, लालबत्तीमधील महिलांची मुले आणि पूर्णत: अनाथ असलेल्या मुलांचा प्रीती व संतोष गर्जे हे दाम्पत्य सांभाळ करतात.

शांतीवण, आर्वी

शिरूर तालुक्यातील आर्वी येथे ही संस्था आहे. कावेरी व दीपक नागरगाेजे येथे संचालक असून आत्महत्याग्रस्त शेतकरी, अनाथ, ऊसताेड कामगार यांच्या मुलांचा येथे सांभाळ केला जाताे. त्यांचे पालन, पोषण केले जाते.

इन्फंट इंडिया, पाली

बीडपासून अवघ्या ८ कि.मी.अंतरावर पाली येथील उंच डोंगरावर ही संस्था आहे. येथे केवळ एचआयव्हीबाधीत मुलांचा आणि नागरिकांचा सांभाळ संध्या व दत्ता बारगजे हे दाम्पत्य करतात.

सेवाश्रम, ब्रम्हनाथ येळंब, शिरूर

शिरूर तालुक्यातील ब्रह्मनाथ येळंब येथे ही संस्था कार्यान्वित आहे. मयूरी व सुरेश राजहंस हे दाम्पत्य येथे संचालक आहेत. तमाशा कलावंतांच्या मुलांचा ायेथे सांभाळ केला जातो. मागील वर्षासह चालू वर्षातही येथील मुलांचा सांभाळ करताना त्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

पहिल्या लॉकडाऊनमध्ये तरी लोक थोडीफार मदत करत होते परंतु आता तेच अडचणीत असल्याने आम्हाला मदत करताना आखडता हात घेत आहेत. किराणा, भाजीपाला, दवाखाना या गरजा भागविण्यासाठी सध्या मोठी कसरत करावी लागत आहे. आम्हाला मदत करावी, एवढीच मागणी आहे.

-संतोष गर्जे गेवराई

कोरोनामुळे खूपच हाल सुरू आहेत. संस्थेत अडचणी आहेत, पण आम्हालाही कोणाकडे जाता येत नाही आणि बाहेरच्यांनाही संसर्गाच्या भीतीने येता येत नाही. त्यामुळे सगळीकडूनच मरण आले आहे. धान्य, भाजीपाला, किराणा यासाठी थोडीफार मदत मिळते, त्यातूनच सध्या भागविले जात आहे.

-सुरेश राजहंस, ब्रह्मनाथ येळंब

===Photopath===

060421\062_bed_15_06042021_14.jpeg

===Caption===

गेवराई येथील सहारा अनाथालयातील धुलीवंदनाच्या दिवशीचे छायाचित्र.