शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सुशिक्षित पुन्हा बेरोजगार : कंत्राटी कोरोनायोद्धांच्या नोकरीवर ३१ ऑगस्टला कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:38 IST

सोमनाथ खताळ लोकमत न्यूज नेटवर्क बीड : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोरोनाकाळात भरती केलेल्या सर्वच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड आली ...

सोमनाथ खताळ

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोरोनाकाळात भरती केलेल्या सर्वच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अतिरिक्त संचालकांनी निधीची कमतरतेचे कारण देत सर्वच कंत्राटी कर्मचारी ३१ ऑगस्टला कार्यमुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे हजारो सुशिक्षित पुन्हा बेरोजगार हाेणार आहेत.

मागील दीड वर्षांपासून कोरोनाने राज्यात थैमान घातले आहे. पहिल्यापेक्षा दुसरी लाट अधिक धोकादायक ठरली. लाखो लोकांचा कोरोनाने जीव घेतला आहे. कोरोनाची महामारी पाहता आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी २० जुलै २०२० रोजी मनुष्यबळ वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे सर्वच जिल्ह्यांमध्ये कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये तीन महिन्याचे कंत्राट देऊन शिपाई ते डॉक्टर अशी हजारो पदे भरण्यात आली. परंतु आता अपवादात्मक जिल्हेवगळता इतरत्र रुग्णसंख्या कमी झाल्याचा दावा करत आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत हे सर्व कंत्राटी मनुष्यबळ कमी करण्याच्या सूचना अतिरिक्त संचालकांनी १७ ऑगस्ट रोजी सर्वच जिल्ह्यांना व्हिसीद्वारे दिल्या आहेत. त्यामुळे राज्यातील हजारो सुशिक्षितांना पुन्हा बेरोजगार व्हावे लागणार आहे.

..

नियमित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सेवेची जबाबदारी

कंत्राटी कर्मचारी कार्यमुक्त केल्यानंतर रुग्णसेवेची जबाबदारी ही नियमित व एनएचएमअंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात येणार आहे. शिपाई ते डॉक्टर या सर्वांना कोरोना महामारीत सेवा द्यावी लागणार आहे. या सेवेबरोबरच नियमित सेवेकडेही दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घेण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता कामाचा आणि सेवेचा ताण आणखीनच वाढणार आहे.

....

बीडमध्ये सीईओंनी काढले पत्र

संचालकांच्या सूचनेप्रमाणे मनुष्यबळ कमी करण्यासंदर्भात बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी आरोग्य संस्थांच्या प्रमुखांना पत्र काढले आहे. दक्षता घेऊन नियोजन करावे, अशा सूचनाही कुंभार यांनी सर्वांनाच दिल्या आहेत.

...

...तर यंत्रणा कोलमडेल

राज्यात जवळपास सीसीसी, डीसीएचसी, डीसीएच हे कंत्राटी मनुष्यबळावरच सुरू आहे. त्यांना कमी केल्यावर रुग्णसेवेवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. एनएचएमने निधी देण्यास नकार दिला असला तरी जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन अथवा इतर योजनांमधून निधी जमा करत कंत्राटी लोकांचा पगार देता येऊ शकतो. हे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. असे झाल्यास ज्या ठिकाणी रुग्णसंख्या जास्त आहे, तेथे मनुष्यबळ कायम राहू शकते.

---

निधीची कमतरता आणि काढलेले पत्र बरोबर आहे. ज्या ठिकाणी कोविड आहे, ज्याठिकाणी खरोखरच गरज आहे, त्याच ठिकाणी कंत्राटी मनुष्यबळ ठेवणार. इतरांना काढणार.

-एन. रामास्वामी, आयुक्त, आरोग्यसेवा महाराष्ट्र