लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार :
शेतातील पिके निघाल्यानंतर मेंढ्या चारण्यासाठी मेंढपाळ आल्याचे चित्र ग्रामीण भागात दरवर्षीच दिसत असते. शिरूर कासार तालुक्यातही रस्त्यावर आणि शेतामध्ये मेंढपाळ आल्याचे दिसत आहे. या मेंढपाळांची वर्षातून आठ महिने भटकंती सुरू असते. तर फक्त पावसाळ्यात चारच महिने त्यांना हक्काच्या घराचा सहवास लाभतो.
फिरतीच्या काळात घोड्यावर संसार व संरक्षणासाठी प्रामाणिक कुत्रे सोबतीला असते.
शेतकऱ्यांनी शेतातील पिके काढल्यानंतर त्या जमिनीत मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारण्यासाठी आणत असतात. पिके निघाल्यानंतर काही दिवसांनी शेतकरी आपली जमीन नांगरतात. त्याठिकाणी जनावरांना खाण्यासाठी कोणताही चारा राहत नाही. त्यामुळे मेंढपाळांना स्थलांतर केल्याशिवाय पर्याय राहात नाही. आठ दिवस, पंधरा दिवस, तर कधी महिन्यानंतर त्यांना आपला गाव बदलावा लागतो. याकाळात मेंढ्यांच्या लेंड्या व मूत्र शेतासाठी चांगले खत म्हणून कामी येत असल्याने स्थानिक शेतकरी शेतात सहारा देतात. प्रसंगी खानपानाची सोयसुध्दा करीत असतात. दिवाळीनंतर सुरू झालेली भटकंती जूनमध्ये पाऊस आल्यानंतरच थांबते.
पावसाळ्यातील चार महिने आपल्या गावी राहिल्यानंतर पुन्हा भटकंती सुरू होते.
===Photopath===
240521\vijaykumar gadekar_img-20210524-wa0030_14.jpg
===Caption===
शिरूरकासार तालुक्यात रस्त्यावर आणि शेतामध्ये मेंढपाळ आपली मेंढरे चारताना दिसत आहेत.