शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

नुकसानग्रस्तांना मदत मिळेल, तशा सूचनाही दिल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:36 IST

बीड : अंबाजोगाई तालुक्यातील मांजराकाठच्या परिसरात झालेल्या अतिवृष्टीने या भागातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याच भागाची पालकमंत्री ...

बीड : अंबाजोगाई तालुक्यातील मांजराकाठच्या परिसरात झालेल्या अतिवृष्टीने या भागातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याच भागाची पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असे अश्वासन त्यांनी दिले. याबाबत संबंधित अधिकारी व विमा कंपनीला सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यांच्यासमवेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, मा.आ. पृथ्वीराज साठे, ज्येष्ठ नेते दत्ता पाटील, गोविंदराव देशमुख, राजेश्वर चव्हाण, शिवाजी सिरसाट, बबन लोमटे, विलास मोरे, आबा पांडे, प्रशांत जगताप, अरुण जगताप, ताराचंद शिंदे, रणजित लोमटे, सुधाकर शिनगारे, सत्यजित सिरसाट, बाळासाहेब देशमुख, बालासाहेब गंगणे, सतीश गंगणे, भागवत गंगणे, तहसीलदार विपीन पाटील, तालुका कृषी अधिकारी बर्वे, महावितरणचे देशपांडे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जगताप आदींची उपस्थिती होती.

कदम कुटुंबाला ४ लाखांचा धनादेश

अंबाजोगाई तालुक्यातील तडोळा येथील राम कदम यांचा मांजरा नदीच्या पात्रात वाहून गेल्याने शुक्रवारी मृत्यू झाला होता. शनिवारी सकाळी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करून मृतदेह बाहेर काढला. या कदम कुटुंबीयांची मुंडे यांनी भेट घेत सांत्वन केले. घरातील एकमेव कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या पत्नी ठकूबाई कदम यांच्यावर मुलाबाळांची जबाबदारी आली आहे. मुंडे यांच्या सूचनेवरून प्रशासनाने गतिमान प्रक्रिया राबवत राज्य सरकारच्या वतीने कदम कुटुंबीयांना ४ लाख रुपये मदतीचा धनादेश दिला.

250921\25_2_bed_32_25092021_14.jpeg

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी अंबाजोगाई तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पिकेच त्यांच्या हातात ठेवली.