शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

शहराच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:29 IST

अंबाजोगाई : शासनाच्या विविध योजना या विकासासाठी राबविल्या पाहिजेत. चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर सर्वांनी एकत्र येत शहराच्या विकासासाठी ...

अंबाजोगाई : शासनाच्या विविध योजना या विकासासाठी राबविल्या पाहिजेत. चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर सर्वांनी एकत्र येत शहराच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे. राज्यात जिथे जिथे चांगले व आदर्श काम झाले आहे अशा ठिकाणी भेटी देऊन ते प्रकल्प अन् योजना अंबाजोगाई शहरात राबवाव्यात, असे प्रतिपादन बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले.

अंबाजोगाई नगरपरिषदेच्यावतीने ‘माझी वसुंधरा अभियान-२०२०-२१’ अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन केंद्रात घन वृक्ष लागवड कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार विपिन पाटील तसेच वनपाल कस्तुरे, शहर विकास संघ प्रमुख रोहिणी कडेकर, महिला आर्थिक विकासच्या व्यवस्थापक मीरा जाधव, वर्षा सूर्यवंशी, पाळवदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी रवींद्र जगताप म्हणाले, पर्यावरणाची हानी झाल्याने त्याचे परिणाम पुढील काळात दिसून येणार आहेत. पर्यावरणाला आपण जपले पाहिजे. शासनाच्या माझी वसुंधरा अभियानातून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर म्हणाल्या, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पंधरा दिवसांत सहा हजार रोपे लावली. आपण झाड लावले त्याची फळे आपणास मिळतात. तसेच ऑक्सिजन मिळतो. ज्यांना शक्य होईल त्यांनी पाणवठे बनवावेत. ज्यामुळे मोकाट जनावरांकरिता पाण्याची व्यवस्था होईल. जपानच्या धर्तीवर मियावाकी पद्धतीनुसार वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी प्रास्ताविक केले. या अभियानांतर्गत वृक्षारोपण, जलसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, रेनवॉटर हार्वेस्टिंग, प्रदूषण कमी करणे, हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा, जलस्त्रोतांचे संरक्षण, संवर्धन, ऊर्जा बचतीसाठी प्रयत्न, सौरऊर्जा वापरासाठी प्रोत्साहन या माध्यामतून निसर्ग संवर्धन करण्यावर भर दिला जाणार असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन कपिल कसबे यांनी केले. अजय कस्तुरे यांनी आभार मानले.

===Photopath===

130321\avinash mudegaonkar_img-20210313-wa0086_14.jpg

===Caption===

अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन केंद्रात घन वृक्ष लागवड कार्यक्रमात  जिल्हाधिकारी  रविंद्र जगताप यांनी वृक्षारोपण केले.