शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:29 IST

अंबाजोगाई : शासनाच्या विविध योजना या विकासासाठी राबविल्या पाहिजेत. चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर सर्वांनी एकत्र येत शहराच्या विकासासाठी ...

अंबाजोगाई : शासनाच्या विविध योजना या विकासासाठी राबविल्या पाहिजेत. चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर सर्वांनी एकत्र येत शहराच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे. राज्यात जिथे जिथे चांगले व आदर्श काम झाले आहे अशा ठिकाणी भेटी देऊन ते प्रकल्प अन् योजना अंबाजोगाई शहरात राबवाव्यात, असे प्रतिपादन बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले.

अंबाजोगाई नगरपरिषदेच्यावतीने ‘माझी वसुंधरा अभियान-२०२०-२१’ अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन केंद्रात घन वृक्ष लागवड कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार विपिन पाटील तसेच वनपाल कस्तुरे, शहर विकास संघ प्रमुख रोहिणी कडेकर, महिला आर्थिक विकासच्या व्यवस्थापक मीरा जाधव, वर्षा सूर्यवंशी, पाळवदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी रवींद्र जगताप म्हणाले, पर्यावरणाची हानी झाल्याने त्याचे परिणाम पुढील काळात दिसून येणार आहेत. पर्यावरणाला आपण जपले पाहिजे. शासनाच्या माझी वसुंधरा अभियानातून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर म्हणाल्या, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पंधरा दिवसांत सहा हजार रोपे लावली. आपण झाड लावले त्याची फळे आपणास मिळतात. तसेच ऑक्सिजन मिळतो. ज्यांना शक्य होईल त्यांनी पाणवठे बनवावेत. ज्यामुळे मोकाट जनावरांकरिता पाण्याची व्यवस्था होईल. जपानच्या धर्तीवर मियावाकी पद्धतीनुसार वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी प्रास्ताविक केले. या अभियानांतर्गत वृक्षारोपण, जलसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, रेनवॉटर हार्वेस्टिंग, प्रदूषण कमी करणे, हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा, जलस्त्रोतांचे संरक्षण, संवर्धन, ऊर्जा बचतीसाठी प्रयत्न, सौरऊर्जा वापरासाठी प्रोत्साहन या माध्यामतून निसर्ग संवर्धन करण्यावर भर दिला जाणार असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन कपिल कसबे यांनी केले. अजय कस्तुरे यांनी आभार मानले.

===Photopath===

130321\avinash mudegaonkar_img-20210313-wa0086_14.jpg

===Caption===

अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन केंद्रात घन वृक्ष लागवड कार्यक्रमात  जिल्हाधिकारी  रविंद्र जगताप यांनी वृक्षारोपण केले.