शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

शहराच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:29 IST

अंबाजोगाई : शासनाच्या विविध योजना या विकासासाठी राबविल्या पाहिजेत. चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर सर्वांनी एकत्र येत शहराच्या विकासासाठी ...

अंबाजोगाई : शासनाच्या विविध योजना या विकासासाठी राबविल्या पाहिजेत. चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर सर्वांनी एकत्र येत शहराच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे. राज्यात जिथे जिथे चांगले व आदर्श काम झाले आहे अशा ठिकाणी भेटी देऊन ते प्रकल्प अन् योजना अंबाजोगाई शहरात राबवाव्यात, असे प्रतिपादन बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले.

अंबाजोगाई नगरपरिषदेच्यावतीने ‘माझी वसुंधरा अभियान-२०२०-२१’ अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन केंद्रात घन वृक्ष लागवड कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार विपिन पाटील तसेच वनपाल कस्तुरे, शहर विकास संघ प्रमुख रोहिणी कडेकर, महिला आर्थिक विकासच्या व्यवस्थापक मीरा जाधव, वर्षा सूर्यवंशी, पाळवदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी रवींद्र जगताप म्हणाले, पर्यावरणाची हानी झाल्याने त्याचे परिणाम पुढील काळात दिसून येणार आहेत. पर्यावरणाला आपण जपले पाहिजे. शासनाच्या माझी वसुंधरा अभियानातून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर म्हणाल्या, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पंधरा दिवसांत सहा हजार रोपे लावली. आपण झाड लावले त्याची फळे आपणास मिळतात. तसेच ऑक्सिजन मिळतो. ज्यांना शक्य होईल त्यांनी पाणवठे बनवावेत. ज्यामुळे मोकाट जनावरांकरिता पाण्याची व्यवस्था होईल. जपानच्या धर्तीवर मियावाकी पद्धतीनुसार वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी प्रास्ताविक केले. या अभियानांतर्गत वृक्षारोपण, जलसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, रेनवॉटर हार्वेस्टिंग, प्रदूषण कमी करणे, हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा, जलस्त्रोतांचे संरक्षण, संवर्धन, ऊर्जा बचतीसाठी प्रयत्न, सौरऊर्जा वापरासाठी प्रोत्साहन या माध्यामतून निसर्ग संवर्धन करण्यावर भर दिला जाणार असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन कपिल कसबे यांनी केले. अजय कस्तुरे यांनी आभार मानले.

===Photopath===

130321\avinash mudegaonkar_img-20210313-wa0086_14.jpg

===Caption===

अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन केंद्रात घन वृक्ष लागवड कार्यक्रमात  जिल्हाधिकारी  रविंद्र जगताप यांनी वृक्षारोपण केले.