शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

शहराच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:29 IST

अंबाजोगाई : शासनाच्या विविध योजना या विकासासाठी राबविल्या पाहिजेत. चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर सर्वांनी एकत्र येत शहराच्या विकासासाठी ...

अंबाजोगाई : शासनाच्या विविध योजना या विकासासाठी राबविल्या पाहिजेत. चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर सर्वांनी एकत्र येत शहराच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे. राज्यात जिथे जिथे चांगले व आदर्श काम झाले आहे अशा ठिकाणी भेटी देऊन ते प्रकल्प अन् योजना अंबाजोगाई शहरात राबवाव्यात, असे प्रतिपादन बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले.

अंबाजोगाई नगरपरिषदेच्यावतीने ‘माझी वसुंधरा अभियान-२०२०-२१’ अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन केंद्रात घन वृक्ष लागवड कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार विपिन पाटील तसेच वनपाल कस्तुरे, शहर विकास संघ प्रमुख रोहिणी कडेकर, महिला आर्थिक विकासच्या व्यवस्थापक मीरा जाधव, वर्षा सूर्यवंशी, पाळवदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी रवींद्र जगताप म्हणाले, पर्यावरणाची हानी झाल्याने त्याचे परिणाम पुढील काळात दिसून येणार आहेत. पर्यावरणाला आपण जपले पाहिजे. शासनाच्या माझी वसुंधरा अभियानातून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर म्हणाल्या, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पंधरा दिवसांत सहा हजार रोपे लावली. आपण झाड लावले त्याची फळे आपणास मिळतात. तसेच ऑक्सिजन मिळतो. ज्यांना शक्य होईल त्यांनी पाणवठे बनवावेत. ज्यामुळे मोकाट जनावरांकरिता पाण्याची व्यवस्था होईल. जपानच्या धर्तीवर मियावाकी पद्धतीनुसार वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी प्रास्ताविक केले. या अभियानांतर्गत वृक्षारोपण, जलसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, रेनवॉटर हार्वेस्टिंग, प्रदूषण कमी करणे, हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा, जलस्त्रोतांचे संरक्षण, संवर्धन, ऊर्जा बचतीसाठी प्रयत्न, सौरऊर्जा वापरासाठी प्रोत्साहन या माध्यामतून निसर्ग संवर्धन करण्यावर भर दिला जाणार असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन कपिल कसबे यांनी केले. अजय कस्तुरे यांनी आभार मानले.

===Photopath===

130321\avinash mudegaonkar_img-20210313-wa0086_14.jpg

===Caption===

अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन केंद्रात घन वृक्ष लागवड कार्यक्रमात  जिल्हाधिकारी  रविंद्र जगताप यांनी वृक्षारोपण केले.