शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
4
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
5
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
6
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
7
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
8
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
9
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
10
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
11
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
12
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
13
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
14
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
15
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
16
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
17
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
18
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
19
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
20
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई

उर्दूच्या बालवाडीताईंना सहा वर्षांपासून मानधनच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:29 IST

माजलगाव : अल्पसंख्याक समाजाला विशेष म्हणजे उर्दू भाषिक पाल्यांना राष्ट्रीय शैक्षणिक प्रवाहामध्ये सामावून घेण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न ...

माजलगाव : अल्पसंख्याक समाजाला विशेष म्हणजे उर्दू भाषिक पाल्यांना राष्ट्रीय शैक्षणिक प्रवाहामध्ये सामावून घेण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा नमुना समोर आला आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात असलेल्या ३३ उर्दू बालवाड्यांमध्ये काम करणाऱ्या ताईंना तब्बल सहा वर्षांपासून मानधनच देण्यात आले नसल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत सतत पाठपुरावा करूनदेखील प्राथमिक शिक्षण विभागाची उदासीनता दिसून येत असल्याने येत्या १ मार्च रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उर्दू ॲक्शन कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.

बीड जिल्हा परिषदेच्या वतीने २०१३ - १४ साली प्राथमिक शिक्षण विभागाकडून उर्दू प्राथमिक शाळांना संलग्न उर्दू बालवाड्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये माजलगाव तालुक्यात ३३ उर्दू बालवाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. बालवाडीमध्ये शिक्षणाचे योगदान देणाऱ्या बालवाडीताईंना २०१३-१४मध्ये मानधन देण्यात आले. परंतु त्यानंतर सहा वर्षे उलटली तरी ही या बालवाडीताईंना मानधनच देण्यात आलेले नाही. याबाबत जिल्हा उर्दू कमिटीच्या वतीने संबंधित विभागाचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांना भेटून मानधन देण्याविषयी वारंवार लेखी व तोंडी विनंती केली. परंतु आजपर्यंत केवळ आश्‍वासनाशिवाय बालवाडीताईंच्या पदरात काही पडलेले नाही. त्यामुळे आता उर्दू बालवाडी सुरू राहण्याकरिता बालवाडीताई यांचे गेल्या सहा वर्षांपासूनचे मानधन जिल्हा परिषद, बीड शिक्षण विभागाने त्वरित देण्याचे आदेशित करावे, अन्यथा १ मार्चपासून माजलगाव गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषण व धरणे आंदोलनाचा इशारा उर्दू ॲक्‍शन कमिटीचे बीड जिल्हाध्यक्ष खतीब निसार अहमद व उपाध्यक्ष सय्यद खलील अहमद यांनी दिला आहे.