शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

माजलगाव कोरोना सेंटरमध्ये अस्वच्छता; निकृष्ट जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:31 IST

माजलगाव : येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये जेवणाअभावी रुग्णांचे हाल होत असल्याचे दिसून येत होते. येथील रुग्णांना दर्जेदार, सकस आहार ...

माजलगाव : येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये जेवणाअभावी रुग्णांचे हाल होत असल्याचे दिसून येत होते. येथील रुग्णांना दर्जेदार, सकस आहार मिळण्याऐवजी अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण येथे दिले जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. याबाबत लोकमतने २९ मार्च रोजी वृत्त प्रकाशित करताच महसूल व आरोग्य विभाग खडबडून जागे झाले होते. सुधारणा मात्र झाली नाही.

संबंधित कोविड सेंटरमध्ये अन्न पुरवठा करणाऱ्या संस्थेची चौकशी केली असता या ठिकाणी अनागोंदी कारभार सुरू असल्याचा अहवाल तहसीलदार यांनी पाठविला असताना देखील हीच संस्था या ठिकाणी कार्यरत असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनासाथीने माागील एक वर्षापासून संपूर्ण जगामध्ये थैमान घातले असून या साथीला रोखण्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, सामाजिक संस्था आदी दिवसरात्र झटत आहेत. शासनाने लाखो रुपये खर्च करून कोविड सेंटर उभारले आहेत. मात्र, या कोविड केअर सेंटरमध्ये देण्यात येणारे जेवण, चहा, नाष्टा आदींचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे.

याबाबत लोकमतने २९ मार्च रोजी ‘कोविड सेंटर मधील रुग्णांना निकृष्ट जेवण’ , या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते.

या वृत्तानंतर येथील प्रशासन खडबडून जागे झाले. येथील केसापुरी कॅम्प येथे सुरू असलेल्या कोविड सेंटरची २९ रोजी तालुका आरोग्य अधिकारी मधुकर घुबडे, तहसीलदार वैशाली पाटील यांनी जेवण बनवित असलेल्या किचनमध्ये जाऊन प्रत्यक्ष पहाणी केली. या किचनची पूर्णपणे तपासणी केली असता त्यांना किचनमध्ये घाणच घाण असल्याचे दिसून आले. या ठिकाणी कसल्याच प्रकारचे मेनू कार्ड दिसून आले नाही. रुग्णांना देण्यात येणारी जेवणाची थाळी अत्यंत कमी प्रमाणात असल्याचे यावेळी दिसून आले. रुग्णांना देण्यात येणारे जेवण प्रमाणित नसल्याचे दिसून आले.

प्रत्येक रुग्णांबरोबर चर्चा केली असता या ठिकाणी दररोज नियमित शौचालय स्वच्छ करीत नसल्याचा तक्रारी आल्या. त्याच बरोबर दोन्ही वेळा पिण्यासाठी गरम पाणी मिळत नसल्याचे येथील रुग्ण सांगत होते.

याबाबतचा अहवाल तहसीलदार वैशाली पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ७ एप्रिल रोजी पाठविल्यानंतर वरिष्ठांकडून या अन्न पुरवठा करणाऱ्या संस्थेवर अद्याप काहीच कारवाई करण्यात आली नाही. यामुळे रुग्णांमध्ये रोष निर्माण होताना दिसत आहे.

अहवाल उशिरा का पाठवला ?

येथील तहसीलदार व आरोग्य विभागाने कोरोना रुग्णांना कोविड सेंटरमध्ये अन्न पुरवठा करणाऱ्या किचनची तपासणी केली असता त्यांना या ठिकाणी अनेक त्रुटी आढळून आल्यानंतर येथील तहसीलदार यांनी याचा अहवाल तत्काळ देण्याऐवजी हा अहवाल पाठवायला तब्बल आठ दिवस लावल्याचे दिसून येत आहे. अहवाल उशिरा का पाठवला ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.