शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

अंबाजोगाईत दिवसाला दोन घागरी पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:26 IST

अंबाजोगाई (जि. बीड) : अंबाजोगाई शहरात दहा दिवसांनी वीस घागरी पाणी सोडण्यात येते. म्हणजेच दिवसाकाठी दोन घागरी पाणीपुरवठा ...

अंबाजोगाई (जि. बीड) : अंबाजोगाई शहरात दहा दिवसांनी वीस घागरी पाणी सोडण्यात येते. म्हणजेच

दिवसाकाठी दोन घागरी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सामान्य नागरिक अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झाले. अपुऱ्या पाणीपुरवठ्याकडे लोकप्रतिनिधींनी कानाडोळा केला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण आणि काळविटी तलावही पूर्ण क्षमतेने भरला आहे. शहरात आठ ते दहा दिवसांनी एक वेळ पाणीपुरवठा केला जातो. अपुऱ्या पाणीपुरवठ्याकडे लोकप्रतिनिधीही कानाडोळा करताना दिसतात. शहरात पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. विविध ठिकाणी जलवाहिन्या फुटल्याचे सांगण्यात येते. पाणीटंचाईच्या काळात पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात आला. आता भरपूर पाऊस झाला. त्यामुळे जलसाठा मुबलक आहे. नगरपालिकेचे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन ढासळल्यामुळे आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येतो. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. बुधवारी येथील समर्थनगर परिसरात दहा दिवसांनंतर एक तास पाणी सोडण्यात आले. पाणीटंचाईमुळे नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दहा दिवसांनी एक तास म्हणजे सरासरी दररोज सहा मिनिटे पाणी सोडण्यात आले. सहा मिनिटांत केवळ दोन घागरी भरतात. आता दोन घागरी पाणी दिवसभर पुरवायचे कसे? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. चार दिवसांनी एक वेळा पाणीपुरवठा करण्याची मागणी अनेक दिवसांपासून नागरिक करीत आहेत; परंतु नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात.

नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी जाऊन नवीन मुख्याधिकारी साबळे यांनी पदभार स्वीकारला असून, नवीन मुख्याधिकारी नागरिकांची तहान भागवून मुबलक पाणी पुरवण्याची सोय करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.