शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत दिवसाला दोन घागरी पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:26 IST

अंबाजोगाई (जि. बीड) : अंबाजोगाई शहरात दहा दिवसांनी वीस घागरी पाणी सोडण्यात येते. म्हणजेच दिवसाकाठी दोन घागरी पाणीपुरवठा ...

अंबाजोगाई (जि. बीड) : अंबाजोगाई शहरात दहा दिवसांनी वीस घागरी पाणी सोडण्यात येते. म्हणजेच

दिवसाकाठी दोन घागरी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सामान्य नागरिक अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झाले. अपुऱ्या पाणीपुरवठ्याकडे लोकप्रतिनिधींनी कानाडोळा केला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण आणि काळविटी तलावही पूर्ण क्षमतेने भरला आहे. शहरात आठ ते दहा दिवसांनी एक वेळ पाणीपुरवठा केला जातो. अपुऱ्या पाणीपुरवठ्याकडे लोकप्रतिनिधीही कानाडोळा करताना दिसतात. शहरात पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. विविध ठिकाणी जलवाहिन्या फुटल्याचे सांगण्यात येते. पाणीटंचाईच्या काळात पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात आला. आता भरपूर पाऊस झाला. त्यामुळे जलसाठा मुबलक आहे. नगरपालिकेचे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन ढासळल्यामुळे आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येतो. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. बुधवारी येथील समर्थनगर परिसरात दहा दिवसांनंतर एक तास पाणी सोडण्यात आले. पाणीटंचाईमुळे नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दहा दिवसांनी एक तास म्हणजे सरासरी दररोज सहा मिनिटे पाणी सोडण्यात आले. सहा मिनिटांत केवळ दोन घागरी भरतात. आता दोन घागरी पाणी दिवसभर पुरवायचे कसे? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. चार दिवसांनी एक वेळा पाणीपुरवठा करण्याची मागणी अनेक दिवसांपासून नागरिक करीत आहेत; परंतु नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात.

नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी जाऊन नवीन मुख्याधिकारी साबळे यांनी पदभार स्वीकारला असून, नवीन मुख्याधिकारी नागरिकांची तहान भागवून मुबलक पाणी पुरवण्याची सोय करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.