शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत दिवसाला दोन घागरी पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:26 IST

अंबाजोगाई (जि. बीड) : अंबाजोगाई शहरात दहा दिवसांनी वीस घागरी पाणी सोडण्यात येते. म्हणजेच दिवसाकाठी दोन घागरी पाणीपुरवठा ...

अंबाजोगाई (जि. बीड) : अंबाजोगाई शहरात दहा दिवसांनी वीस घागरी पाणी सोडण्यात येते. म्हणजेच

दिवसाकाठी दोन घागरी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सामान्य नागरिक अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झाले. अपुऱ्या पाणीपुरवठ्याकडे लोकप्रतिनिधींनी कानाडोळा केला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण आणि काळविटी तलावही पूर्ण क्षमतेने भरला आहे. शहरात आठ ते दहा दिवसांनी एक वेळ पाणीपुरवठा केला जातो. अपुऱ्या पाणीपुरवठ्याकडे लोकप्रतिनिधीही कानाडोळा करताना दिसतात. शहरात पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. विविध ठिकाणी जलवाहिन्या फुटल्याचे सांगण्यात येते. पाणीटंचाईच्या काळात पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात आला. आता भरपूर पाऊस झाला. त्यामुळे जलसाठा मुबलक आहे. नगरपालिकेचे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन ढासळल्यामुळे आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येतो. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. बुधवारी येथील समर्थनगर परिसरात दहा दिवसांनंतर एक तास पाणी सोडण्यात आले. पाणीटंचाईमुळे नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दहा दिवसांनी एक तास म्हणजे सरासरी दररोज सहा मिनिटे पाणी सोडण्यात आले. सहा मिनिटांत केवळ दोन घागरी भरतात. आता दोन घागरी पाणी दिवसभर पुरवायचे कसे? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. चार दिवसांनी एक वेळा पाणीपुरवठा करण्याची मागणी अनेक दिवसांपासून नागरिक करीत आहेत; परंतु नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात.

नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी जाऊन नवीन मुख्याधिकारी साबळे यांनी पदभार स्वीकारला असून, नवीन मुख्याधिकारी नागरिकांची तहान भागवून मुबलक पाणी पुरवण्याची सोय करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.