शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

परळीच्या मोंढा मार्केट परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:30 IST

परळी : शहरातील मोंढा मार्केट परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या वाहतूक कोंडीवर तोडगा ...

परळी : शहरातील मोंढा मार्केट परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यास प्रशासनाला सपशेल अपयश आले आहे, असा आरोप मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी केला आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या परिसरात नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने दुचाकीस्वारांना वाहन चालविणे तारेवरची कसरत झाली आहे. जड वाहने ही या ठिकाणाहून जात असल्याने व रस्त्यातच विविध गाडे लागत असल्याने व दुकानांचे सामान रस्त्यावर मांडण्यात येत असल्याने शहरात वाहतुकीची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे. याकडे ना नगरपरिषद लक्ष देते, ना पोलीस प्रशासन लक्ष देते. लोकप्रतिनिधीही याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे परळीकरांची डोकेदुखी वाढली आहेे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत असायला हवी. परंतु,गेल्या अनेक वर्षांपासून सुरळीत वाहतूक नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत, असा आरोप पाथरकर यांनी शुक्रवारी केला आहे. आपण या प्रश्नी आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

या ठिकाणी पोलीस प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या जटिल बनत चालली आहे. मध्यंतरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गोविंदराव फड यांनी बाजार समिती परिसरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु पुन्हा पहिले पाढे पंचावन्न याप्रमाणे पुन्हा वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. मुख्य रस्त्यावरच फळांची गाडी लागत आहे. तसेच काही कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार काही दुकानदार आपले सामान रस्त्यावर लावत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना ही रस्त्यावरून चालणे मुश्कील झाले आहे.

काही व्यापाऱ्यानी पादचारी मार्गावर अतिक्रमण केलेले आहे. ५ फुटांची जागा ही लाखो रुपयांची आहे. तसेच काही गाड्यावाले कुठेही गाडा लावतात. याकडे नगर परिषद व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे, असा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.

‘शहरात फूटपाथ आणि नाल्यावर नगरपरिषदेच्या संगनमताने अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतूक समस्या निर्माण झाली असून त्याचा परळीकरांना त्रास होत आहे’ - बालाजी गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते परळी

शहरातील काही दुकानदार दुकानातील अर्धा माल दुकानासमोर रस्त्यावर लावतात. मग दुचाकी लावायच्या कुठे? त्याला पोलीस यंत्रणा काय करणार? बातमी आली की ते दुचाकी गाडीवाल्यांना दंड ठोठावतात. ज्यांच्यामुळे ही समस्या निर्माण होत आहे ते दुकानदार बाजूलाच राहतात.

- नवीन मराठे, परळी