शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

तीन गावांना उच्च दाबाची वीज नियमित मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:32 IST

माजलगाव : तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी , रामनगर , सुलतानपूर येथील जनता विजेअभावी पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीला पाण्यासाठी त्रस्त आहे, ...

माजलगाव : तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी , रामनगर , सुलतानपूर येथील जनता विजेअभावी पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीला पाण्यासाठी त्रस्त आहे, तर प्रशासन सुस्त आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच प्रशासनाने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

वरील गावांना ८ तास वीज सातत्याने व उच्च दाबाने मिळावी म्हणून भारतीय किसान संघाच्या वतीने ८ ते १२ नोव्हेंबर दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने देऊन २४ नोव्हेंबर रोजी आंदोलन केले होते. त्यावेळी १५ दिवसात वरील गावांना मालीपरगाव ३३ के. व्ही. उप केंद्रावरून विद्युत पुरवठा करू असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत वीज पुरवठ्यामध्ये काहीच सुधारणा झालेली नाही. सध्या जनतेला ,जनावरांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी देता येत नाही. म्हणून नागरिक व शेतकरी त्रस्त आहेत.

गुरूवारी भारतीय किसान संघाचे प्रांत अध्यक्ष व तीन गावचे प्रतिनिधी संबंधित कार्यालयास भेटण्यासाठी गेले असता त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले, त्यामुळे हा प्रश्न कायम आहे. आता जनतेने वीज नसल्यामुळे पिण्यासाठी व शेतीतील पिकाला पाणी देण्यासाठी कोणाकडे जावे, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. सर्व अधिकारी हात झटकून मोकळे झाले आहेत. शिवाय या कोरोनाच्या परीस्थितीत आंदोलनही करता येत नाही. जनतेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार बसत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेऊन जनतेचा प्रश्न तत्काळ सोडवावा. जनतेला रस्त्यावर येण्यास भाग पाडू नये असे निवेदन भारतीय किसान संघाचे प्रांताध्यक्ष बळीराम सोळंके यांनी केली आहे.

------

अशीही टोलवाटोलवी

वाघोरा येथील नागरिक या गावांना मालीपारगाव ३३ के. व्ही. उपकेंद्रावरून जोडू देत नाहीत. तेथे दोन दिवस काम करावे लागते. ते काम कामगारांना करू दिले जात नाहीत. त्यासाठी पोलीस यंत्रणा आवश्यक आहे. परंतु पोलीस अधिकारी पोलीस बंदोबस्त देत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे माजलगाव ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक,उपविभागीय पोलीस आधिकारी व तहसीलदारांना पत्र दिले. यावेळी तुम्ही गट विकास अधिकाऱ्यांकडे जा, यात आम्ही काय करणार ? असे उत्तर तहसीलदारांकडून मिळाले. तर पोलीस ठाण्यात आम्ही निवेदन घेऊ शकत नाहीत, साहेब आल्यावर त्यांना भेटून निवेदन देण्याचे सांगण्यात आले. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेले असता कार्यालयास कुलूप लावलेले होते.

-----------