शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

तीन गावांना उच्च दाबाची वीज नियमित मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:32 IST

माजलगाव : तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी , रामनगर , सुलतानपूर येथील जनता विजेअभावी पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीला पाण्यासाठी त्रस्त आहे, ...

माजलगाव : तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी , रामनगर , सुलतानपूर येथील जनता विजेअभावी पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीला पाण्यासाठी त्रस्त आहे, तर प्रशासन सुस्त आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच प्रशासनाने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

वरील गावांना ८ तास वीज सातत्याने व उच्च दाबाने मिळावी म्हणून भारतीय किसान संघाच्या वतीने ८ ते १२ नोव्हेंबर दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने देऊन २४ नोव्हेंबर रोजी आंदोलन केले होते. त्यावेळी १५ दिवसात वरील गावांना मालीपरगाव ३३ के. व्ही. उप केंद्रावरून विद्युत पुरवठा करू असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत वीज पुरवठ्यामध्ये काहीच सुधारणा झालेली नाही. सध्या जनतेला ,जनावरांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी देता येत नाही. म्हणून नागरिक व शेतकरी त्रस्त आहेत.

गुरूवारी भारतीय किसान संघाचे प्रांत अध्यक्ष व तीन गावचे प्रतिनिधी संबंधित कार्यालयास भेटण्यासाठी गेले असता त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले, त्यामुळे हा प्रश्न कायम आहे. आता जनतेने वीज नसल्यामुळे पिण्यासाठी व शेतीतील पिकाला पाणी देण्यासाठी कोणाकडे जावे, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. सर्व अधिकारी हात झटकून मोकळे झाले आहेत. शिवाय या कोरोनाच्या परीस्थितीत आंदोलनही करता येत नाही. जनतेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार बसत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेऊन जनतेचा प्रश्न तत्काळ सोडवावा. जनतेला रस्त्यावर येण्यास भाग पाडू नये असे निवेदन भारतीय किसान संघाचे प्रांताध्यक्ष बळीराम सोळंके यांनी केली आहे.

------

अशीही टोलवाटोलवी

वाघोरा येथील नागरिक या गावांना मालीपारगाव ३३ के. व्ही. उपकेंद्रावरून जोडू देत नाहीत. तेथे दोन दिवस काम करावे लागते. ते काम कामगारांना करू दिले जात नाहीत. त्यासाठी पोलीस यंत्रणा आवश्यक आहे. परंतु पोलीस अधिकारी पोलीस बंदोबस्त देत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे माजलगाव ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक,उपविभागीय पोलीस आधिकारी व तहसीलदारांना पत्र दिले. यावेळी तुम्ही गट विकास अधिकाऱ्यांकडे जा, यात आम्ही काय करणार ? असे उत्तर तहसीलदारांकडून मिळाले. तर पोलीस ठाण्यात आम्ही निवेदन घेऊ शकत नाहीत, साहेब आल्यावर त्यांना भेटून निवेदन देण्याचे सांगण्यात आले. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेले असता कार्यालयास कुलूप लावलेले होते.

-----------