शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

तीन गावांना उच्च दाबाची वीज नियमित मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:32 IST

माजलगाव : तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी , रामनगर , सुलतानपूर येथील जनता विजेअभावी पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीला पाण्यासाठी त्रस्त आहे, ...

माजलगाव : तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी , रामनगर , सुलतानपूर येथील जनता विजेअभावी पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीला पाण्यासाठी त्रस्त आहे, तर प्रशासन सुस्त आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच प्रशासनाने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

वरील गावांना ८ तास वीज सातत्याने व उच्च दाबाने मिळावी म्हणून भारतीय किसान संघाच्या वतीने ८ ते १२ नोव्हेंबर दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने देऊन २४ नोव्हेंबर रोजी आंदोलन केले होते. त्यावेळी १५ दिवसात वरील गावांना मालीपरगाव ३३ के. व्ही. उप केंद्रावरून विद्युत पुरवठा करू असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत वीज पुरवठ्यामध्ये काहीच सुधारणा झालेली नाही. सध्या जनतेला ,जनावरांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी देता येत नाही. म्हणून नागरिक व शेतकरी त्रस्त आहेत.

गुरूवारी भारतीय किसान संघाचे प्रांत अध्यक्ष व तीन गावचे प्रतिनिधी संबंधित कार्यालयास भेटण्यासाठी गेले असता त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले, त्यामुळे हा प्रश्न कायम आहे. आता जनतेने वीज नसल्यामुळे पिण्यासाठी व शेतीतील पिकाला पाणी देण्यासाठी कोणाकडे जावे, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. सर्व अधिकारी हात झटकून मोकळे झाले आहेत. शिवाय या कोरोनाच्या परीस्थितीत आंदोलनही करता येत नाही. जनतेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार बसत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेऊन जनतेचा प्रश्न तत्काळ सोडवावा. जनतेला रस्त्यावर येण्यास भाग पाडू नये असे निवेदन भारतीय किसान संघाचे प्रांताध्यक्ष बळीराम सोळंके यांनी केली आहे.

------

अशीही टोलवाटोलवी

वाघोरा येथील नागरिक या गावांना मालीपारगाव ३३ के. व्ही. उपकेंद्रावरून जोडू देत नाहीत. तेथे दोन दिवस काम करावे लागते. ते काम कामगारांना करू दिले जात नाहीत. त्यासाठी पोलीस यंत्रणा आवश्यक आहे. परंतु पोलीस अधिकारी पोलीस बंदोबस्त देत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे माजलगाव ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक,उपविभागीय पोलीस आधिकारी व तहसीलदारांना पत्र दिले. यावेळी तुम्ही गट विकास अधिकाऱ्यांकडे जा, यात आम्ही काय करणार ? असे उत्तर तहसीलदारांकडून मिळाले. तर पोलीस ठाण्यात आम्ही निवेदन घेऊ शकत नाहीत, साहेब आल्यावर त्यांना भेटून निवेदन देण्याचे सांगण्यात आले. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेले असता कार्यालयास कुलूप लावलेले होते.

-----------