शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

राज्यात तिघाडा, वॉर्डात बिघाडा; इच्छुक उमेदवारांची उडाली झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:36 IST

बीड : एक प्रभाग एक नगरसेवक अशी घोषणा झाल्यानंतर पुन्हा तो निर्णय बदलून एक प्रभाग दोन नगरसेवक असा करण्यात ...

बीड : एक प्रभाग एक नगरसेवक अशी घोषणा झाल्यानंतर पुन्हा तो निर्णय बदलून एक प्रभाग दोन नगरसेवक असा करण्यात आला आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असा तिघाडा आहे. आता वॉर्डातही पहिल्यासारखेच दोन नगरसेवक देऊन बिघाडा होणार आहे. आपण कामे केले, हे दाखविण्यासाठी चढाओढ लागण्यासह पुढेही आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी आतापासूनच ‘फिल्डिंग’ लावणे सुरू झाले आहे. चार भिंतीतील चर्चाही वाढल्या असून अनेकांची झोपही उडाली आहे. सत्तांतर झाले की जो तो आपल्या फायद्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करतो. नगर पंचायत, नगरपालिका आणि महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरूनच पुढील समीकरणे अनेकदा ठरविले जातात. त्यामुळे प्रत्येक जण यात आपली ताकद वापरतो. आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रभाग रचना आणि नगरसेवकांवरून खल सुरू झाला. अखेर दोन नगरसेवक पद्धतीला मान्यता मिळाली. या निर्णयाचे काही ठिकाणी स्वागत होते तर काहींना गम असल्याचेही सांगण्यात येते. असे असले तरी इच्छुक उमेदवार आतापासून आघाडीच्या प्रमुखांकडे हजेरी लावत आहेत. दिवसरात्र संपर्कात राहण्यासह आपले काम किती चांगले आहे, हे दाखविण्यासाठी धडपड करत आहेत. आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही, या भीतीने अनेकांची झोपही उडाली आहे.

---

बीड पालिकेत काय घडले?

बीड पालिकेत काका-पुतण्यात रंगत झाली होती. यात आ. संदीप क्षीरसागर यांच्या काकू-नाना विकास आघाडीचे २० नगरसेवक निवडून आले होते तर डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे स्वत: नगराध्यक्ष आणि आपल्या गटाचे १८ नगरसेवक निवडून आणण्यात यशस्वी झाले होते. एमआयएमनेही ९ जागांवर यश मिळविले होते. भाजप १ आणि शिवसेनेचे दोन तसेच स्वीकृत ५ सदस्य असे ५५ नगरसेवक पालिकेत आहेत. एमआयएमने सुरुवातील आ. क्षीरसागरांना मदत केल्याने नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर असले तरी सत्ता आ. क्षीरसागरांची होती. परंतु वर्षभरातच एमआयएमने आ. क्षीरसागरांची साथ सोडत नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर यांच्या गटात प्रवेश केला. त्यामुळे बाजू पलटून डॉ. क्षीरसागरांकडे आली. आजही त्यांचेच पारडे जड आहे.

--

फायदा काय अन् तोटा काय?

एक प्रभाग दोन नगरसेवक असल्याचा फायदा अन् तोटाही आहे. एकाच प्रभागात दोन वेगळ्या आघाडीचे नगरसेवक निवडून आल्यास विकासाला खीळ बसू शकते. आपली सत्ता नाही तर काम का करायचे, असाही विचार डाेक्यात येऊ शकतो, अशी काही तोटे आहेत. तर दोघांनी मिळून काम केल्यास प्रभाग आदर्श व विकासमय बनू शकतो. तसेच चढाओढीने कामे केले जाऊ शकतात. परंतु हे सर्व नगरसेवकांच्या मानसिकतेवर अवलंबून आहे, हेही तितकेच खरे आहे.

--