शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

शेत रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तहसीलदारांचा बैलगाडीतून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:34 IST

गंगामसला : बांधावरून शेतरस्ता खुला करुन देण्याच्या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथील शेतकऱ्यांनी शेतात गुरूवार पासून कुटुंबासह उपोषणाला ...

गंगामसला : बांधावरून शेतरस्ता खुला करुन देण्याच्या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथील शेतकऱ्यांनी शेतात गुरूवार पासून कुटुंबासह उपोषणाला सुरुवात केली होती. हा प्रश्न‌ सोडवण्यासाठी खुद्द तहसीलदार वैशाली पाटील ह्या बैलगाडीतून प्रवास करून‌ उपोषणस्थळी पोहोचल्या आणि रस्त्याचा प्रश्न‌ सोडवला.

गंगामसला शिवारातील जमीन गट नंबर ८३ व ८४ बांधावरून हक्कांत रस्ता खुला करून देण्याचा आदेश तहसीलदारांनी दिला होता. या निकालाची अंमलबजावणी करण्याचा आदेश असतानाही प्रश्न‌ सुटत नव्हता. २६ जुलै रोजी सर्व अर्जदार, मंडळ अधिकारी, तलाठी हे पोलीस बंदोबस्तात हजर झाले होते. परंतु संबंधित मंडळ अधिकाऱ्यांनी हद्द बंदीच्या नसून शेतकऱ्यांनी केलेल्या खुणा आहेत. त्यामुळे अडचण असून, जेथे रस्ता करायचा आहे, तेथे पाणी असल्यामुळे रस्ता देण्याची अंमलबजावणी करता येणार नाही , असा पंचनामा केला व अर्जदाराच्या स्वतंत्र जबाबास नकार दिला होता. रस्त्याअभावी शेती वहिती करणे कठीण झाल्याने व हाेणाऱ्या अतोनात नुकसानीमुळे गुरुवारपासून गोपीनाथ खेत्री, दत्तात्रय खेत्री आपल्या कुटुंबासह उपोषणाला बसले होते. तत्काळ रस्ता उपलब्ध करून देण्याची त्यांची मागणी होती. ही बाब लक्षात घेऊन तहसीलदार वैशाली पाटील यांनी स्वतः या शेत रस्त्यावर बैलगाडीतून प्रवास करून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला. यावेळी ‌मंडळ अधिकारी पदमाकर मुळाटे, व्ही.एस.टाखणखार, अ. कारकुन एम.एन. साबने, तलाठी सुभाष गोरे, पोलीस बिट अंमलदार अतिशकुमार देशमुख, हे.काॅ. वाघमारे, कोतवाल गणेश खेत्री, बाळू खेत्री दाखल झाले होते. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागताच उपोषण सोडले. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

300721\save_20210730_190223_14.jpg~300721\img_20210730_163952_14.jpg