शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू; थांबलेल्या उपचारासह पुन्हा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:23 IST

बीड : कोरोनामुळे थांबलेल्या शस्त्रक्रियांना आता सुरुवात झाली आहे. मागील दोन महिन्यांत जिल्हा रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या दोन व इतर १३५ ...

बीड : कोरोनामुळे थांबलेल्या शस्त्रक्रियांना आता सुरुवात झाली आहे. मागील दोन महिन्यांत जिल्हा रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या दोन व इतर १३५ गंभीर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तसेच छोट्या शस्त्रक्रियांचा आकडाही २०५ आहे. नियोजनबद्ध काम केले जात असल्याने सरकारी यंत्रणेवरील विश्वास वाढून रुग्णसंख्याही वाढत असल्याचे दिसत आहे.

जिल्हा रुग्णालयाचा कारभार दिवसेंदिवस सुधारत असल्याचे दिसत आहे. सीझर, अपेंडिक्स, हर्निया अशा प्रकारच्या जवळपास १३७ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तसेच प्रसूती, गर्भपात अशा प्रकारच्या २०० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया झाल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला बीड जिल्हा रुग्णालयात आणि आता उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांत शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, डॉ. सुखदेव राठोड, मेट्रन रमा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा सामान्यांसाठी सक्षमपणे काम करीत असल्याचे दिसत आहे.

बीडसह नेकनूर, धारूर, माजलगाव, आष्टीत सुरू

जिल्हा रुग्णालयात सर्वांत अगोदर शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली. जवळपास दीड वर्षापासून शस्त्रक्रिया बंद होत्या. बीडपाठोपाठ नेकनूर, आष्टी, धारूर आणि माजलगावातही शस्त्रक्रिया करण्यास आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे. अगोदर केवळ प्रसूती व इतर अत्यावश्यक शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. आता हळूहळू सर्वच सुरू होत आहेत.

ओपीडीत येणाऱ्यांची संख्याही वाढली

n कोरोनाकाळात ओपीडीची संख्या रोज साधारण ५० होती. आता ती वाढून ३०० ते ४०० होत असल्याचे सांगण्यात आले.

n कोरोनामुळे विस्कळीत झालेली यंत्रणा आता कामाला लागल्याचे दिसून येत आहे.

n ओपीडीत न बसणारे डॉक्टरही आता वेळेवर बसून रुग्णसेवा करीत असल्याने समाधान व्यक्त होते आहे.

तालुका, वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुचना देतो

मागील दीड वर्षापासून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यामध्ये आरोग्य यंत्रणा व्यस्त होती; परंतु आता कोरोना नियंत्रणात येत आहे. इतर आजारांचे रुग्णही शोधले जात आहेत. शस्त्रक्रियांची गरज असणाऱ्यांना, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयात पाठविण्याबाबत सर्वांना आदेश देतो.

- डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्याधिकारी

सामान्यांचा विश्वास जिंकण्यात यश

सरकारी यंत्रणेवर सामान्यांचा विश्वास बसविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कोरोनामुळे थांबलेल्या शस्त्रक्रिया आणि इतर सुविधा दिल्या जात आहेत. रुग्णांची संख्या वाढल्याचे पाहून समाधान वाटते. सर्वांचा विश्वास सार्थकी ठरवत आहे. कोरोनाची काळजी घेण्यासह थोडाही त्रास जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड