शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नछत्राचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:33 IST

मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी कोविड महामारीचे संकट अधिकच गडद होत आहे. संसर्ग व मृत्यूचे प्रमाण दररोजच वाढत आहे.या वर्षी ...

मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी कोविड महामारीचे संकट अधिकच गडद होत आहे. संसर्ग व मृत्यूचे प्रमाण दररोजच वाढत आहे.या वर्षी कोविडचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामध्ये कोविड रूग्ण,नातेवाईक,सामान्य कष्टकरी लोकांना दोन वेळचे जेवण मिळणेही दुरापास्त झाले आहे.अशा परिस्थितीत श्रीराम जन्मोत्सव समितीचे अन्नछत्र आशेचे किरण ठरले आहे. याद्वारे रूग्ण,नातेवाईक व गरजूंना दिलासा मिळत आहे.

मागील पंधरा दिवसांपासून रीब,गरजू लोक, रूग्ण व नातेवाईकांना दररोज पोळी,भाजी, पुलाव,लोणचे तर कधी गोड पदार्थ असे पौष्टिक व स्वादिष्ट जेवण देण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे आज अनेक गावे,खेडी व शहरे ही शांत आहेत.पण,रूग्णालये मात्र रूग्णांनी मोठ्या प्रमाणावर भरलेली दिसून येत आहेत. अंबाजोगाई येथील स्वाराती ग्रामीण शासकीय वैद्यकीय रूग्णालय आणि लोखंडी सावरगावचे कोविड रूग्णालयात भरपूर संख्येने रूग्ण व त्यांचे नातेवाईक,गरजू लोक हे उपचारासाठी येत आहेत.या गरजू लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय श्रीराम जन्मोत्सव समिती, अंबाजोगाईचे अमित जाजू,योगेश कडबाने, बाळा गायके,शुभम लखेरा,विजय रामावत,शुभम डिडवाणी,सतिश केंद्रे,शुभम चौधरी, सौरभ नारायणकर, नवनाथ अप्रूपपल्ले, योगेश म्हेञजकर, सिध्दू सातपुते, गजानन सुरवसे, बालाजी मारवाळ या तरूण कार्यकर्त्यांनी घेतला. २३ एप्रिल रामनवमी पासून स्वत:च्या पैशातून शासन निर्देशानुसार सर्व नियमांचे पालन करीत अन्नछत्र सुरू करून मागील एक महिन्यापासून अव्याहतपणे सुरू ठेवले आहे. समितीच्या तरूण कार्यकर्त्यांचे प्रामाणिक प्रयत्न व तळमळ पहाता आता अनेक दानशूर व्यक्ती आपली नांवे जाहीर करू नका या अटीवर मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. आता पुढील १५ दिवस समितीच्यासोबत ज्ञान प्रबोधिनीदेखील अन्नछत्राच्या माध्यमातून जेवण देण्याच्या या मोहीमेत सक्रिय सहभाग घेणार असल्याचे सांगण्यात येते.

दात्यांनी पुढे यावे

कोरोना या महामारीचे आलेले संकट लवकर दूर होईल,यासाठी प्रत्येकाने नियमित मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा,गर्दीत जाणे टाळावे,या त्रिसूत्रीचे पालन करावे. दररोज किमान ५०० गरजू लोकांना अन्नदान करण्याचा आमचा संकल्प आहे.या कामात समाजातील जे दानशूर व्यक्ती,संस्था आणि संघटना ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव समितीचे अमित जाजू यांनी केले आहे.

===Photopath===

220521\avinash mudegaonkar_img-20210522-wa0091_14.jpg