शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

उन्हाळी हंगामाने धारण केले खरिपाचे रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:34 IST

शिरूर कासार : तालुक्यात गत वर्षी पाऊस मुबलक झाल्याने उन्हाळी हंगामाला पाणी राहिले. परिणामी शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांवर चांगलाच भर ...

शिरूर कासार : तालुक्यात गत वर्षी पाऊस मुबलक झाल्याने उन्हाळी हंगामाला पाणी राहिले. परिणामी शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांवर चांगलाच भर दिला. गतवर्षी खरिपात झालेली तूट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरी, भुईमूग,मूग,उडीद ,तीळ आदी पिके घेतली. ही पिके चांगली येतील असे चित्र सध्या दिसून येत आहे.

तालुक्यात तालुका कृषी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार तीन परिमंडळात सुमारे ४५१६ हेक्टरवर उन्हाळी पिकाचा पेरा आहे त्यात सर्वाधिक पेरा हा तिंतरवणी मंडळात १९५९ हेक्टर तर रायमोहा येथे १२९२ आणि शिरूर मंडळांतर्गत १२९२ हेक्टर असा पेरा आहे. सर्वाधिक बाजरीला पसंती जास्त असून २४३९ हेक्टरवर बाजरी ,त्यापाठोपाठ भुईमूग १३३४ हेक्टर, मूग ३१८ हेक्टर, उडीद २८७ हेक्टर तर तीळ १३८ हेक्टवर पेरा झाला आहे. कडक उन्हाळ्यात घामाच्या धारा वाहतांना आणि विजेचा लपंडाव सुरू असतांना देखील शेतकऱ्यांनी जिवापाड मेहनत करून पिकांची जोपासना केली. त्याचीच परिणीती म्हणून उन्हाळ्यातही शेतशिवाराने खरिपाचे स्वरूप धारण केलेले चित्र अल्हाददाई ठरत आहे. शेतकऱ्यांनी योग्य वाणांची निवड करून त्याची मेहनत करून पाहिजे त्या वेळेला पाणी देण्याचे परिश्रम घेतल्यानेच पीक जोमदार दिसत आहेत. निसर्गाने साथ दिल्यास शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल, असे तालुका कृषी मंडळ अधिकारी दिलीप तिडके यांनी सांगितले.

हिरवाईने कोरोनाचा विसर

बाजरीला कुठे दाणे चमकत आहेत तर कुठे फुलोरा बहरात आहे. मुगाला शेंगा ,तीळाला बोंड ,भगरीला तुरे असे आनंददायी हिरवीगार शेती कोरोनाचा विसर पाडत आहे. दोन वेळा आलेल्या निसर्गाचा कोप टळला आहे. आता आणखी काही दिवस अशीच मेहरबानी केल्यास कष्टाचे चीज होईल, अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.

===Photopath===

190421\19bed_3_19042021_14.jpg~190421\19bed_2_19042021_14.jpg