शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

वॉटर कपनंतरच्या परिवर्तनात सुबत्ता; पण पाण्याचा बेहिशेबी वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:26 IST

भाजीपाला, फळबागांत वाढ : मानवलोक, पाणी फाउंडेशनकडून आढावा केज (जि. बीड) : सत्यमेव जयते वॉटरकपनंतर ...

भाजीपाला, फळबागांत वाढ : मानवलोक, पाणी फाउंडेशनकडून आढावा

केज (जि. बीड) : सत्यमेव जयते वॉटरकपनंतर झालेले परिवर्तन पाहण्यासाठी मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी बनसारोळा, आवसगाव, सावळेश्वर, पाथरा गावांना भेटी दिल्या. पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांनी केलेल्या क्रांतीमध्ये भाजीपाला लागवड, फळबाग लागवड वाढत असून, ही आनंदाची बाब असल्याचे मत लोहिया यांनी व्यक्त केले.

त्याचबरोबर दुसरीकडे उपलब्ध झालेल्या पाणी वापराबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. लोहिया म्हणाले की, फळबागांची मूल्य साखळी निर्माण व्हावी यासाठी मानवलोकच्या सहकार्यातून येणाऱ्या काळात प्रयत्न केले जाणार आहेत. समृद्ध गाव स्पर्धेत काम करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसह गावातील विकासात हातभार लावावा.

माती, गवत, झाडे, जलसंधारण कामे व जलव्यवस्थापन करून शेतकऱ्यांनी आर्थिक उत्पन्न वाढवावे, असे आवाहन पाणी फाउंडेशन समन्वयक संतोष शिनगारे यांनी केले. यावेळी लोहिया व शिनगारे यांनी सावळेश्वर येथे सुरू असणाऱ्या विहीर पाणी पातळी मोजमापाच्या ठिकाणी भेट देऊन प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. पाणी फाउंडेशनच्या वतीने प्रवीण काथवटे व शिवलेश्वर मेदने यांनी आभार मानले.

उसाच्या आहे त्या क्षेत्रावर उतारा वाढवा

उसाचे क्षेत्र वाढताना दिसून आले. उसाचे क्षेत्र वाढवण्यापेक्षा आहे त्या क्षेत्रावर उसाचा शंभर टनांपेक्षा जास्त उतारा एकरी काढावा, असा सल्ला अनिकेत लोहिया यांनी दिला. शेतकऱ्यांनी फळबाग व भाजीपाला क्षेत्र वाढवावे, असे आवाहनही त्यांनी केले.