शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

गायरान जमिनीबाबत न्यायालयाचा अवमान थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:33 IST

आष्टी : गायरान जमिनीवरील अतिक्रमणे गुपचूप काढून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाने सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचा अवमान तत्काळ थांबवावा. ...

आष्टी : गायरान जमिनीवरील अतिक्रमणे गुपचूप काढून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाने सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचा अवमान तत्काळ थांबवावा.

अन्यथा अवमान याचिका दाखल करुन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वाल्मिक निकाळजे यांनी सरकारला दिला आहे.

सरकारी गायरान जमिनीवर बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्व तालुक्यांत १९९० पूर्वी व नंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त, ओबीसी व सर्व जातीधर्माच्या भूमिहीन गरीब लोकांनी अतिक्रमणे केलेली आहेत. त्या जमिनी ते दरवर्षी नियमित कसून खात आहेत. त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. अत्यंत नापीक डोंगराळ, खडकाळ गायरान जमिनीची अतिक्रमणधारक कुटुंबांनी प्रचंड काबाडकष्ट करून खूप मोठी सुधारणा करून बागायती केल्या आहेत. आज ना उद्या त्या जमिनी सरकार किंवा सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय आमच्या नावे करेल, अशी त्यांना आशा, विश्वास व खात्री आहे. असे असताना सध्या कोणताही शासकीय आदेश नसताना २०११ च्या एका शासननिर्णयाचा आधार घेऊन सर्व मंडल अधिकारी, गावकामगार तलाठी आणि महसूल प्रशासन गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. हे कृत्य सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्णयाविरुद्ध आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती व भूमिहीन मजूर यांच्या सरकारी जमिनींवरील अतिक्रमणास संरक्षण दिलेले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गायरान जमिनीवरील सर्व अतिक्रमणधारकांची अतिक्रमणे काढून टाकता येणार नाहीत, असे आदेश एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान दिलेले आहेत. त्यामुळे महसूल प्रशासनाने अतिक्रमणे काढून टाकण्याचे तत्काळ थांबवावे. नसता संबंधितांविरुद्ध उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करू, असा इशाराही निकाळजे यांनी दिला आहे.