शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

गायरान जमिनीबाबत न्यायालयाचा अवमान थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:33 IST

आष्टी : गायरान जमिनीवरील अतिक्रमणे गुपचूप काढून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाने सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचा अवमान तत्काळ थांबवावा. ...

आष्टी : गायरान जमिनीवरील अतिक्रमणे गुपचूप काढून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाने सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचा अवमान तत्काळ थांबवावा.

अन्यथा अवमान याचिका दाखल करुन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वाल्मिक निकाळजे यांनी सरकारला दिला आहे.

सरकारी गायरान जमिनीवर बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्व तालुक्यांत १९९० पूर्वी व नंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त, ओबीसी व सर्व जातीधर्माच्या भूमिहीन गरीब लोकांनी अतिक्रमणे केलेली आहेत. त्या जमिनी ते दरवर्षी नियमित कसून खात आहेत. त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. अत्यंत नापीक डोंगराळ, खडकाळ गायरान जमिनीची अतिक्रमणधारक कुटुंबांनी प्रचंड काबाडकष्ट करून खूप मोठी सुधारणा करून बागायती केल्या आहेत. आज ना उद्या त्या जमिनी सरकार किंवा सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय आमच्या नावे करेल, अशी त्यांना आशा, विश्वास व खात्री आहे. असे असताना सध्या कोणताही शासकीय आदेश नसताना २०११ च्या एका शासननिर्णयाचा आधार घेऊन सर्व मंडल अधिकारी, गावकामगार तलाठी आणि महसूल प्रशासन गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. हे कृत्य सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्णयाविरुद्ध आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती व भूमिहीन मजूर यांच्या सरकारी जमिनींवरील अतिक्रमणास संरक्षण दिलेले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गायरान जमिनीवरील सर्व अतिक्रमणधारकांची अतिक्रमणे काढून टाकता येणार नाहीत, असे आदेश एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान दिलेले आहेत. त्यामुळे महसूल प्रशासनाने अतिक्रमणे काढून टाकण्याचे तत्काळ थांबवावे. नसता संबंधितांविरुद्ध उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करू, असा इशाराही निकाळजे यांनी दिला आहे.