शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:35 IST

तोकमत न्यूज नेटवर्क घाटनांदूर : कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प ...

तोकमत न्यूज नेटवर्क

घाटनांदूर : कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प असल्यामुळे शेतकरी पेरणीपूर्वी अडचणीत आले आहेत. तरी सर्व बाजार समितीचे व्यवहार सुरू करावेत, अशी मागणी अंबाजोगाई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोविंद देशमुख यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.

बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्याच्या शेतीमालाची मापे घेणे, शेतीमाल विक्री करणे असे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. शेतकरी मान्सून पूर्व मशागतीचे सर्व शेती कामे संपवून पेरणीच्या तयारीत आहेत. पेरणीकरिता शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे खरेदी करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचा शेतीमाल विक्रीस परवानगी मिळणे गरजेचे आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी किमान चार ते पाच तासाचा वेळ लॉकडाऊनमधून देणे गरजेचे आहे. तरच शेतकरी खत बी बियाणे खरेदी करू शकणार आहेत. यापूर्वी पणन संचालक यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करण्याबाबत आदेश काढलेले आहेत, असेही देशमुख निवेदनात म्हटले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना निवेदन दिले आहे.

....

शेतकऱ्याच्या हितासाठी बाजार समिती खुली करण्याची परवानगी आल्यानंतर बाजार समितीकडून कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन व वेळेचे बंधन पाळले जाईल. कर्मचारी, व्यापारी, शेतकरी, हमालमापाडी यांना मास्क व सॅनिटायझर बंधनकारक करुन परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येईल.

-गोविंद देशमुख, सभापती, अंबाजोगाई बाजार समिती.