शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी सुसाट; मुक्कामी गाड्या कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:12 IST

माजलगाव : तालुक्यात मागील साडेतीन महिने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ग्रामीण भागातील बससेवा बंद करण्यात आली होती. कोरोनाची लाट ओसरू ...

माजलगाव : तालुक्यात मागील साडेतीन महिने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ग्रामीण भागातील बससेवा बंद करण्यात आली होती. कोरोनाची लाट ओसरू लागल्यावर येथील आगारातून ग्रामीण भागासाठी लालपरी सुसाट धावत असली, लालपरी मुक्कामाला कधी जाणार, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.

गतवर्षी मार्चमध्ये कोरोनामुळे ग्रामीण भागात अनेक महिने बससेवा बंद करण्यात आली होती. नंतर ऑगस्टमध्ये सुरू झालेली बससेवा फेब्रुवारीपर्यंत सुरळीत सुरू झाली होती. त्यानंतर, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात होताच मार्चमध्ये ही बससेवा पुन्हा पूर्णपणे बंद करण्यात आली. ७ जूनपासून केवळ शहरी भागात बससेवा सुरू करण्यात आली होती, परंतु ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या सुरुवातीपासून जास्त असल्याने बससेवा सुरू करण्यात आली नव्हती. बीड जिल्ह्यासह माजलगाव तालुक्यात कोरोनाची लाट ओसरू लागल्याने, येथील तालुक्यातील अनेक गावात हळूहळू बससेवा सुरू झाली. सध्या तालुक्यातील कवडगाव व जवळा ही गावे वगळता ग्रामीण भागातील सर्वच गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे ७०-८० गावच्या प्रवाशांचा इतर शहरांशी संपर्क जोडला जात असला, तरी मुक्कामी गाड्या सुरू झालेल्या नाहीत.

-----

१) शहरी भागात जाणाऱ्या गाड्या फुल्ल

माजलगाव आगारातून जवळपास सर्वच तालुका व जिल्ह्याशी जोडणाऱ्या बस सुरू करण्यात आल्या आहेत. इतर शहरांच्या मानाने लातुर व कोल्हापूर बस एकदम फुल्ल जात असून, या शहराला जाणाऱ्या गाड्यांचे उत्पन्नही सर्वात जास्त आहे.

--------

२) ग्रामीण भागातील बसेसमध्ये जागा मिळेना

इतर शहराप्रमाणे ग्रामीण भागातील सर्वच ठिकाणच्या बस सध्या सुरू करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील इतर गावांच्या तुलनेत पुरुषोतमपुरी, गुंजथडी व आबेगाव मार्गावरील बसमध्ये जागा मिळत नसल्यची स्थिती आहे. यामुळे आगारास या गावापासून चांगलाच फायदा होताना दिसत आहे. प्रत्येक गावाला २-२ फेऱ्या सध्या सुरू आहेत.

--------

मुक्कामी जाणाऱ्या गाड्यांचे काय?

माजलगाव आगाराकडून यापूर्वी सहा ठिकाणी मुक्कामाला बस जात असे, परंतु आता केवळ कोयाळ व पुंगणी याच गावांना मुक्कामाला बस जात आहे. सतर मुक्कामी बसेस सुरू होण्याची प्रवाशांना प्रतीक्षा आहे.

-------

मुक्कामी गाड्या नसल्याने त्रास

यापूर्वी आमच्या गावात बस अनेक फेऱ्या करत असल्याने आम्हाला इतर गावांना जाण्यासाठी अडचण येत नसे, परंतु आता केवळ दोनच फेऱ्या सुरू असल्याने इतर ठिकाणी जाण्यासाठी अडचणी येत आहेत.

- वैजनाथ कटके, रामगाव.

-----------

सध्या आमच्या गावात बसच्या केवळ दोनच फेऱ्या होत असून, त्याही वेळेवर येत नसल्याने आम्हाला इतर गावाला जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. मला अर्धे तिकीट असतानाही अवैध प्रवासी वाहतूक गाड्यांमध्ये जाण्याची वेळ येत आहे, यामुळे मला आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.

- रामभाऊ खाडे, मोठेवाडी.

----------

बसच्या दोन फेऱ्या सुरू

सध्या माजलगाव आगारातून केवळ २-३ गावे वगळता इतर ठिकाणी बसच्या २-२ फेऱ्या सुरू करण्यात आल्या व इतर शहरांच्या ठिकाणच्या सर्वच फेऱ्या सुरू करण्यात आल्याने उत्पन्नही ७० ते ८० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

- दत्तात्रय काळम पाटील, आगार प्रमुख, माजलगाव.

-------------