शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी सुसाट; मुक्कामी गाड्या कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:12 IST

माजलगाव : तालुक्यात मागील साडेतीन महिने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ग्रामीण भागातील बससेवा बंद करण्यात आली होती. कोरोनाची लाट ओसरू ...

माजलगाव : तालुक्यात मागील साडेतीन महिने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ग्रामीण भागातील बससेवा बंद करण्यात आली होती. कोरोनाची लाट ओसरू लागल्यावर येथील आगारातून ग्रामीण भागासाठी लालपरी सुसाट धावत असली, लालपरी मुक्कामाला कधी जाणार, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.

गतवर्षी मार्चमध्ये कोरोनामुळे ग्रामीण भागात अनेक महिने बससेवा बंद करण्यात आली होती. नंतर ऑगस्टमध्ये सुरू झालेली बससेवा फेब्रुवारीपर्यंत सुरळीत सुरू झाली होती. त्यानंतर, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात होताच मार्चमध्ये ही बससेवा पुन्हा पूर्णपणे बंद करण्यात आली. ७ जूनपासून केवळ शहरी भागात बससेवा सुरू करण्यात आली होती, परंतु ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या सुरुवातीपासून जास्त असल्याने बससेवा सुरू करण्यात आली नव्हती. बीड जिल्ह्यासह माजलगाव तालुक्यात कोरोनाची लाट ओसरू लागल्याने, येथील तालुक्यातील अनेक गावात हळूहळू बससेवा सुरू झाली. सध्या तालुक्यातील कवडगाव व जवळा ही गावे वगळता ग्रामीण भागातील सर्वच गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे ७०-८० गावच्या प्रवाशांचा इतर शहरांशी संपर्क जोडला जात असला, तरी मुक्कामी गाड्या सुरू झालेल्या नाहीत.

-----

१) शहरी भागात जाणाऱ्या गाड्या फुल्ल

माजलगाव आगारातून जवळपास सर्वच तालुका व जिल्ह्याशी जोडणाऱ्या बस सुरू करण्यात आल्या आहेत. इतर शहरांच्या मानाने लातुर व कोल्हापूर बस एकदम फुल्ल जात असून, या शहराला जाणाऱ्या गाड्यांचे उत्पन्नही सर्वात जास्त आहे.

--------

२) ग्रामीण भागातील बसेसमध्ये जागा मिळेना

इतर शहराप्रमाणे ग्रामीण भागातील सर्वच ठिकाणच्या बस सध्या सुरू करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील इतर गावांच्या तुलनेत पुरुषोतमपुरी, गुंजथडी व आबेगाव मार्गावरील बसमध्ये जागा मिळत नसल्यची स्थिती आहे. यामुळे आगारास या गावापासून चांगलाच फायदा होताना दिसत आहे. प्रत्येक गावाला २-२ फेऱ्या सध्या सुरू आहेत.

--------

मुक्कामी जाणाऱ्या गाड्यांचे काय?

माजलगाव आगाराकडून यापूर्वी सहा ठिकाणी मुक्कामाला बस जात असे, परंतु आता केवळ कोयाळ व पुंगणी याच गावांना मुक्कामाला बस जात आहे. सतर मुक्कामी बसेस सुरू होण्याची प्रवाशांना प्रतीक्षा आहे.

-------

मुक्कामी गाड्या नसल्याने त्रास

यापूर्वी आमच्या गावात बस अनेक फेऱ्या करत असल्याने आम्हाला इतर गावांना जाण्यासाठी अडचण येत नसे, परंतु आता केवळ दोनच फेऱ्या सुरू असल्याने इतर ठिकाणी जाण्यासाठी अडचणी येत आहेत.

- वैजनाथ कटके, रामगाव.

-----------

सध्या आमच्या गावात बसच्या केवळ दोनच फेऱ्या होत असून, त्याही वेळेवर येत नसल्याने आम्हाला इतर गावाला जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. मला अर्धे तिकीट असतानाही अवैध प्रवासी वाहतूक गाड्यांमध्ये जाण्याची वेळ येत आहे, यामुळे मला आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.

- रामभाऊ खाडे, मोठेवाडी.

----------

बसच्या दोन फेऱ्या सुरू

सध्या माजलगाव आगारातून केवळ २-३ गावे वगळता इतर ठिकाणी बसच्या २-२ फेऱ्या सुरू करण्यात आल्या व इतर शहरांच्या ठिकाणच्या सर्वच फेऱ्या सुरू करण्यात आल्याने उत्पन्नही ७० ते ८० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

- दत्तात्रय काळम पाटील, आगार प्रमुख, माजलगाव.

-------------