शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

सोयाबीन पिकाला मोठ्या पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:38 IST

फेरीवाले मदतीच्या प्रतीक्षेत अंबाजोगाई : फेरीवाल्यांना १० हजार रुपये कर्ज स्वरूपात देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र अद्यापही अनेक ...

फेरीवाले मदतीच्या प्रतीक्षेत

अंबाजोगाई : फेरीवाल्यांना १० हजार रुपये कर्ज स्वरूपात देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र अद्यापही अनेक फेरीवाल्यांना मदत मिळाली नाही. प्रशासन, बँक व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे अनेक फेरीवाल्यांना मदत मिळाली नाही. तसेच कोरोना निर्बंधाच्या काळात रिक्षाचालकांना शासनाने जाहीर केलेली मदतही मिळाली नसल्याने अंबाजोगाई शहरातील फेरीवाले मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

माहिती दिलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार विमा

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात पाटोदा सर्कल परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली राहिली. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतील पिके वाहून गेल्याने या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासकीय यंत्रणांनी केलेल्या पंचनाम्याच्या आधारे शेतकऱ्यांना विमा देण्याबाबत कृषी आयुक्तांनी आदेश दिले होते. दरम्यान, या आदेशाला विमा कंपनीने अखेर केराची टोपली दाखविली आहे. आता नुकसानीची माहिती दिलेल्या शेतकऱ्यांनाच विमा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती नाही अथवा अनेक शेतकरी मोबाइल निरक्षर आहेत अशा शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई व विमा मिळावा, अशी मागणी भाजपचे कार्यकर्ते शिरीशकुमार मुकडे यांनी केली आहे.

पिकांवर वाढला रोगांचा प्रादुर्भाव

अंबाजोगाई : गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे शेतकरी वर्ग चिंतित असून, त्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सोयाबीन हे नगदी पीक असल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे. यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्याने खरीप हंगामातील पिकांची पेरणी उशिराच झाली आहे. अधूनमधून पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली. त्यानंतर रिमझिम पाऊस पडल्याने पिके जोमात होती. सोयाबीन मूग, उडीद, कापूस पिकांची वाढ योग्य प्रमाणात झाली आहे.

बाजारात अस्वच्छता वाढली

अंबाजोगाई : येथील आठवडी बाजार बंद असल्याने सध्या मुख्य रस्त्यावरच बाजार भरू लागला आहे. भाजीपाला विक्रीसाठी आलेले अनेक जण उरलेला भाजीपाला तसाच रस्त्यावर फेकून जातात. अजूबाजूला अनेक व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. त्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढत चालली आहे. त्यामुळे विक्रेते व ग्राहक या दोघांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या बाजाराची त्वरित स्वच्छता करण्यात यावी व भाजी विक्रेत्यांना शिस्त लावावी, अशी मागणी होत आहे.