शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन पिकाचा पेरा वाढला; सूर्यफूल-करडी नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:47 IST

बीड : जिल्ह्यात मुख्य व नगदी पीक म्हणून कापूस या पिकाकडे शेतकरी वळले होते. मात्र, मागील काही वर्षांत कापूस ...

बीड : जिल्ह्यात मुख्य व नगदी पीक म्हणून कापूस या पिकाकडे शेतकरी वळले होते. मात्र, मागील काही वर्षांत कापूस पिकाचे होणारे उत्पादन व खर्च याचा ताळमेळ बसत नसल्यामुळे सोयाबीन या तेल पिकाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला असून, मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचा पेरा केला जात आहे. याच दरम्यान मात्र पारंपरिक तेलबिया म्हणून ओळखले जाणारे सूर्यफूल-करडी-जवस यासह इतर तेलबियांचा पेरा अतिशय कमी क्षेत्रावर होत असल्याचे चित्र आहे, तर यापैकी काही पिके तर जिल्ह्यांतून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

बीड जिल्ह्यात खरीप हंगामात सूर्यफूल हे मुख्य पीक होते. मात्र, त्यानंतर कापूस पिकामुळे चांगला फायदा शेतकऱ्यांना मिळू लागला, त्यानंतर मागील दशकात सोयाबीन या पिकाचा पेरा करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली. सोयाबीन पिकास मिळणारा चांगला भाव, कापसाच्या तुलनेत करावे लागणारे कमी कष्ट व सोयाबीन निघाल्यानंतर रबी हंगामातील पिकाच्या लागवडीसाठी मिळणारे क्षेत्र यामुळे सोयाबीन पिकाकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी वळले आहेत. त्यामुळेचे २०२० खरीप हंगामात कापूस पिकाच्या बरोबरीने म्हणजेच २ लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचा पेरा करण्यात आला आहे. पुढील हंगामात सोयाबीन पिकाचे क्षेत्र कापूस पिकापेक्षा जास्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तेलपीक पेरणी क्षेत्रफळ

पीक २०१८-१९ २०१९-२० घट वाढ (हेक्टरमध्ये)

सोयाबीन २१७७९१ २४२००० ०० २४२०९

सूर्यफूल ४९ ३० १९ ००

करडी ६२१ २१० ४११ ००

जवस १२९ ४२ ८७ ००

इतर तेलबिया ५७६ ३७९ ०० १९७

करडी सूर्यफूल हद्दपार

करडीचे तेल घाण्यावर गाळून नैर्सर्गिकरीत्या निघालेले तेल ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी वापरले जात होते. मात्र, मागील काही वर्षांत करडीचा पेरा कमी झाला आहे, तर सूर्यफूल या पिकाचीदेखील तीच परिस्थिती आहे. त्यामुळे सूर्यफूल व करडी हे पीक जिल्ह्यातून हद्दपार झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नगदी पिकांचे वाढलेले क्षेत्र व सूर्यफूल या पिकावर झालेला रोगाचा प्रादुर्भाव यामुळे सूर्यफूल-करडी यासह इतर तेलपिकांचा पेरा घटला आहे. सोयाबीन पिकाचे चांगले उत्पादन होत असल्यामुळे त्याचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.

सुभाष साळवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (प्रभारी)

शेतकऱ्यांना जे परवडते तो बदल शेतात करणे गरजेचे आहे. त्यामुळे सूर्यफूल व करडीसारखी पिके नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी आहारात वापरण्यासाठी असलेले तेल हे करडीचा घाणा गाळून वापरावे, जेणेकरून बाजारातील भेसळयुक्त तेलापासून बचाव होईल व करडीचे क्षेत्रदेखील वाढेल.

शिवराज जगताप शेतकरी