शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

सोयाबीन पिकाचा पेरा वाढला; सूर्यफूल-करडी नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:47 IST

बीड : जिल्ह्यात मुख्य व नगदी पीक म्हणून कापूस या पिकाकडे शेतकरी वळले होते. मात्र, मागील काही वर्षांत कापूस ...

बीड : जिल्ह्यात मुख्य व नगदी पीक म्हणून कापूस या पिकाकडे शेतकरी वळले होते. मात्र, मागील काही वर्षांत कापूस पिकाचे होणारे उत्पादन व खर्च याचा ताळमेळ बसत नसल्यामुळे सोयाबीन या तेल पिकाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला असून, मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचा पेरा केला जात आहे. याच दरम्यान मात्र पारंपरिक तेलबिया म्हणून ओळखले जाणारे सूर्यफूल-करडी-जवस यासह इतर तेलबियांचा पेरा अतिशय कमी क्षेत्रावर होत असल्याचे चित्र आहे, तर यापैकी काही पिके तर जिल्ह्यांतून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

बीड जिल्ह्यात खरीप हंगामात सूर्यफूल हे मुख्य पीक होते. मात्र, त्यानंतर कापूस पिकामुळे चांगला फायदा शेतकऱ्यांना मिळू लागला, त्यानंतर मागील दशकात सोयाबीन या पिकाचा पेरा करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली. सोयाबीन पिकास मिळणारा चांगला भाव, कापसाच्या तुलनेत करावे लागणारे कमी कष्ट व सोयाबीन निघाल्यानंतर रबी हंगामातील पिकाच्या लागवडीसाठी मिळणारे क्षेत्र यामुळे सोयाबीन पिकाकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी वळले आहेत. त्यामुळेचे २०२० खरीप हंगामात कापूस पिकाच्या बरोबरीने म्हणजेच २ लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचा पेरा करण्यात आला आहे. पुढील हंगामात सोयाबीन पिकाचे क्षेत्र कापूस पिकापेक्षा जास्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तेलपीक पेरणी क्षेत्रफळ

पीक २०१८-१९ २०१९-२० घट वाढ (हेक्टरमध्ये)

सोयाबीन २१७७९१ २४२००० ०० २४२०९

सूर्यफूल ४९ ३० १९ ००

करडी ६२१ २१० ४११ ००

जवस १२९ ४२ ८७ ००

इतर तेलबिया ५७६ ३७९ ०० १९७

करडी सूर्यफूल हद्दपार

करडीचे तेल घाण्यावर गाळून नैर्सर्गिकरीत्या निघालेले तेल ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी वापरले जात होते. मात्र, मागील काही वर्षांत करडीचा पेरा कमी झाला आहे, तर सूर्यफूल या पिकाचीदेखील तीच परिस्थिती आहे. त्यामुळे सूर्यफूल व करडी हे पीक जिल्ह्यातून हद्दपार झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नगदी पिकांचे वाढलेले क्षेत्र व सूर्यफूल या पिकावर झालेला रोगाचा प्रादुर्भाव यामुळे सूर्यफूल-करडी यासह इतर तेलपिकांचा पेरा घटला आहे. सोयाबीन पिकाचे चांगले उत्पादन होत असल्यामुळे त्याचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.

सुभाष साळवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (प्रभारी)

शेतकऱ्यांना जे परवडते तो बदल शेतात करणे गरजेचे आहे. त्यामुळे सूर्यफूल व करडीसारखी पिके नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी आहारात वापरण्यासाठी असलेले तेल हे करडीचा घाणा गाळून वापरावे, जेणेकरून बाजारातील भेसळयुक्त तेलापासून बचाव होईल व करडीचे क्षेत्रदेखील वाढेल.

शिवराज जगताप शेतकरी