शहरं
Join us  
Trending Stories
1
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
4
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
6
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
7
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
8
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
9
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
10
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
11
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
12
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
13
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
14
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
15
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
16
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
17
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
18
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
19
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
20
Khushbu Saroj : अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान

सोयाबीन पिकाचा पेरा वाढला; सूर्यफूल-करडी नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:47 IST

बीड : जिल्ह्यात मुख्य व नगदी पीक म्हणून कापूस या पिकाकडे शेतकरी वळले होते. मात्र, मागील काही वर्षांत कापूस ...

बीड : जिल्ह्यात मुख्य व नगदी पीक म्हणून कापूस या पिकाकडे शेतकरी वळले होते. मात्र, मागील काही वर्षांत कापूस पिकाचे होणारे उत्पादन व खर्च याचा ताळमेळ बसत नसल्यामुळे सोयाबीन या तेल पिकाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला असून, मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचा पेरा केला जात आहे. याच दरम्यान मात्र पारंपरिक तेलबिया म्हणून ओळखले जाणारे सूर्यफूल-करडी-जवस यासह इतर तेलबियांचा पेरा अतिशय कमी क्षेत्रावर होत असल्याचे चित्र आहे, तर यापैकी काही पिके तर जिल्ह्यांतून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

बीड जिल्ह्यात खरीप हंगामात सूर्यफूल हे मुख्य पीक होते. मात्र, त्यानंतर कापूस पिकामुळे चांगला फायदा शेतकऱ्यांना मिळू लागला, त्यानंतर मागील दशकात सोयाबीन या पिकाचा पेरा करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली. सोयाबीन पिकास मिळणारा चांगला भाव, कापसाच्या तुलनेत करावे लागणारे कमी कष्ट व सोयाबीन निघाल्यानंतर रबी हंगामातील पिकाच्या लागवडीसाठी मिळणारे क्षेत्र यामुळे सोयाबीन पिकाकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी वळले आहेत. त्यामुळेचे २०२० खरीप हंगामात कापूस पिकाच्या बरोबरीने म्हणजेच २ लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचा पेरा करण्यात आला आहे. पुढील हंगामात सोयाबीन पिकाचे क्षेत्र कापूस पिकापेक्षा जास्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तेलपीक पेरणी क्षेत्रफळ

पीक २०१८-१९ २०१९-२० घट वाढ (हेक्टरमध्ये)

सोयाबीन २१७७९१ २४२००० ०० २४२०९

सूर्यफूल ४९ ३० १९ ००

करडी ६२१ २१० ४११ ००

जवस १२९ ४२ ८७ ००

इतर तेलबिया ५७६ ३७९ ०० १९७

करडी सूर्यफूल हद्दपार

करडीचे तेल घाण्यावर गाळून नैर्सर्गिकरीत्या निघालेले तेल ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी वापरले जात होते. मात्र, मागील काही वर्षांत करडीचा पेरा कमी झाला आहे, तर सूर्यफूल या पिकाचीदेखील तीच परिस्थिती आहे. त्यामुळे सूर्यफूल व करडी हे पीक जिल्ह्यातून हद्दपार झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नगदी पिकांचे वाढलेले क्षेत्र व सूर्यफूल या पिकावर झालेला रोगाचा प्रादुर्भाव यामुळे सूर्यफूल-करडी यासह इतर तेलपिकांचा पेरा घटला आहे. सोयाबीन पिकाचे चांगले उत्पादन होत असल्यामुळे त्याचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.

सुभाष साळवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (प्रभारी)

शेतकऱ्यांना जे परवडते तो बदल शेतात करणे गरजेचे आहे. त्यामुळे सूर्यफूल व करडीसारखी पिके नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी आहारात वापरण्यासाठी असलेले तेल हे करडीचा घाणा गाळून वापरावे, जेणेकरून बाजारातील भेसळयुक्त तेलापासून बचाव होईल व करडीचे क्षेत्रदेखील वाढेल.

शिवराज जगताप शेतकरी