शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

म्हणून बीडमध्ये सीईओंच्या दालनात फोडल्या बांगड्या....

By admin | Updated: August 4, 2016 14:34 IST

तीन पाणी योजना राबवूनही पाण्यासाठी पायपीट कायम आहे. त्यामुळे योजनांची चौकशी करावी, या मागणीसाठी जि.प. सीईओ नामदेव ननावरे यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या महिलांनी

ऑनलाइन लोकमतबीड, दि. ४ : तीन पाणी योजना राबवूनही पाण्यासाठी पायपीट कायम आहे. त्यामुळे योजनांची चौकशी करावी, या मागणीसाठी जि.प. सीईओ नामदेव ननावरे यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या महिलांनी गुरुवारी दालनात बांगड्या फोडून तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी प्रचंड गोंधळ उडाला. पोलिसांनी ५० जणांना अटक  केली असून सीईओंच्या दालनाला पोलीस बंदोबस्त दिला आहे. जिल्हा परिषदेत गुरुवारी सीईओ ननावरे हे आपले नियमित कामकाज करत होते. यावेळी भवानवाडी (ता. बीड) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच उर्मिला हनुमंत जगताप, त्यांचे पती हनुमंत जगताप यांच्यासह ६० ते ७० ग्रामस्थ जि.प. मध्ये दाखल झाले. शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, जि.प. सदस्य किशोर जगताप हेही गावकऱ्यांचा प्रश्न सीईओंसमोर मांडण्यासाठी आले होते. हनुमंत जगताप यांनी सीईओंसमोर निवेदन वाचून दाखवले व त्यांच्याकडे निवेदन सुपूर्द केले. यावेळी सीईओंनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. गावातील पाणीपुरवठा व स्वच्छता समितीवर तुम्ही कायदेशीर कारवाई करा... असा सल्लाही सीईओंनी दिला. मात्र, त्यावर महिलांचे समाधान झाले नाही.

यावेळी सरपंच उर्मिला जगताप व त्यांच्यासोबत आलेल्या काही महिलांनी आपल्याकडील पिशवीत आणलेल्या बांगड्यांचा हार काढून तो सीईओंच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला; परंतु शिवसेना जिल्हाप्रमुख जगताप यांनी त्यांना रोखले. मयावेळी आक्रमक झालेल्या महिलांनी सीईओंच्या टेबलवरील पाण्याचा ग्लास फोडला. शिवाय टेबलवरच बांगड्या फोडल्या. यावेळी बांगड्यांच्या काचा अंगावर उडून आल्याने ननावरे यांच्या तळहाताला व बोटाला किंचीत जखम झाली. त्यांनी खुर्ची सोडून सुरक्षारक्षकाला आवाज दिला. यावेळी एकच गोंधळ उडाला.

सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ धनवंतकुमार माळी हे दालनात पोहोचले. त्यांनीही महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक उमेश कस्तुरे हे तेथे पोहाचले. दालनात बांगड्यांच्या काचांचा खच पडलेला होता. सीईओंचे दालन तात्पुरते बंद ठेवण्यात आले. दालनाबाहेर बंदोबस्त वाढविण्यात आला. या प्रकारानंतर सरपंच उर्मिला जगताप, आशा आवाड, गंगू आवाड, इंदू साळुंके, गंगू गिराम, चिंगू सानप व इतर महिला दालनाबाहेर ठाण मांडून होत्या.उपअधीक्षक गणेश गावडे यांनीही जि.प. मध्ये धाव घेऊन सीईओंच्या दालनाची पाहणी केली. सीईओंनी कायदेशीर कारवाईचा पवित्रा घेतला. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या वाहनातून सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत शिवाजीनगर ठाण्यात नेले. एकूण ४५ ते ५० जणांना अटक करण्यात आली. गाडीत चढताना सरपंच उर्मिला जगताप, हनुमंत जगताप यांच्यासह महिलांनी सीईओंच्या विरोधात घोषणाबाजी केली. याबाबत सीईओ ननावरे यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.नेमके प्रकरण काय?भवानवाडी (ता. बीड) हे तीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावात भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल व घटक योजना ७ ते ७ वर्षांपूर्वी राबविण्यात आल्या होत्या. मात्र, यात लाखोंचा अपहार झाल्यसची तक्रार सरपंच उर्मिला जगताप यांनी सीईओंकडे केली होती. जगताप या शिवसेनेच्या असून ग्रामपंचायत पूर्वी  राष्ट्रवादीच्या ताब्यात होती.

पाणीपुरवठा व स्वच्छता समिती पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेलीच आहे. या समितीविरुद्ध जगताप यांची तक्रार आहे. गावात उन्हाळाभर टँकर सुरु होते; परंतु पाऊस पडल्यानंतर महिन्यापूर्वी ते बंद झाले. गावातील एक सार्वजनिक विहीर पाणीपुरवठा व स्वच्छता समितीने बुजविली असून त्यामुळे गावकऱ्यांना पावसाळ्यातही रानोमाळ भटकावे लागत आहे. याबाबत सीईओंकडे तक्रार करुनही चौकशी होत नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.- आम्ही दहा वेळेस सीईओंना निवेदन दिले होते. त्यांनी दखल घेतली नाही. आज आम्ही निवेदन देण्यास गेलो असता तुम्हीच पाणीपुरवठा समितीवर गुन्हा नोंद करा असे उत्तर सीईओंनी दिले. ते कारवाई करणार नसतील तर ते सीईओपदाच्या खुर्चीत का बसले आहेत? जिल्हा परिषद, पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. त्यामुळे चौकशी होत नाही. भवानवाडीतील ग्रामस्थांना पाणी देऊन योजनेत अपहार करणाऱ्यांवर कारवाई करा, एवढीच आमची मागणी आहे.   - उर्मिला जगताप, सरपंच, भवानवाडी ता. बीड.