शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

दुकानदारांनो, अन्नपदार्थ विकल्यास पावतीवर लिहा परवाना क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:36 IST

बीड : आता यापुढे अन्नपदार्थ विकल्यास त्याच्या पावतीवर नोंदणी अथवा परवाना क्रमांक लिहिणे दुकानदारांना बंधनकारक करण्यात आले आहे. याची ...

बीड : आता यापुढे अन्नपदार्थ विकल्यास त्याच्या पावतीवर नोंदणी अथवा परवाना क्रमांक लिहिणे दुकानदारांना बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून होणार असून, सध्या अन्न व औषध प्रशासनाकडून वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.

अन्न सुरक्षेच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना आणि नियोजन केले जात आहे. खाद्यतेलाच्या पुनर्वापराबाबत कारवाईची मोहीम राबविण्याची संकल्पना असतानाच आता अन्नपदार्थ विक्री करताना दिलेल्या पावतीवर नोंदणी व परवाना क्रमांक लिहिणे अनिवार्य केले आहे. दि. १ ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे अन्न किती सुरक्षित आहे, खाण्यास योग्य आहे की नाही, आदींची माहिती समजणार आहे. पावती मागणे आणि देणे याबाबतही अन्न प्रशासनाकडे नियम असून, पावती देणे-घेणेही नियमाने बंधनकारक आहे. असे झाले तरच ग्राहकांना तक्रार करता येऊ शकते. जे पावती देत नाहीत, त्यांच्याविरोधातही अन्न प्रशासनाकडे तक्रार देण्याचा नियम आहे.

--

अन्नपदार्थ विकल्यास त्याच्या पावतीवर नोंदणी अथवा परवाना क्रमांक लिहिणे दुकानदारांना बंधनकारक करण्यात आले आहे. सध्या जनजागृती सुरू असून, १ ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे.

- इम्रान हाश्मी, सहाय्यक आयुक्त, अन्न प्रशासन, बीड