शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

दुसऱ्या वर्षीही गजानन महाराजांच्या पालखी दर्शनाला भाविक मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:45 IST

अविनाश मुडेगावकर लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या ...

अविनाश मुडेगावकर

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या दर्शनाला भक्त मुकणार आहेत. यामुळे भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. गेल्या सात वर्षांपासून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा अश्व रिंगण सोहळा ही गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे.

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे दैवत असलेल्या शेगावचे संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा पायी पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जात असतो. गण गणात बोते, विठुनामाचा गजर करीत पालखी पंढरपूरच्या दिशेने जून महिन्यात मार्गस्थ होत असते. ही पालखी जून महिन्यात असलेल्या एकादशीला दरवर्षी अंबाजोगाईला येते. कोरोनामुळे मार्च २०२० पासून मोठ्या कार्यक्रम सोहळ्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षीही श्रींचा पालखी सोहळा पूर्वीप्रमाणे काढण्यात आला नाही. यावर्षी राज्य शासनाने मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत एस.टी. बसमधून पालख्या नेण्यास राज्यातील केवळ १० देवस्थानच्या आषाढीवारीला परवानगी दिली आहे. यामध्ये शेगावचा संत गजानन महाराज संस्थानचा समावेश नाही. आषाढीवारीला जाणाऱ्या संत गजानन महाराजांच्या पालखीचा अंबाजोगाई येथे एक दिवसीय मुक्काम असतो. श्रींचा पालखी सोहळा पाहण्यासाठी, दर्शनासाठी तथा स्वागतासाठी अंबाजोगाई परिसरातील हजारो भक्तगण आतुर असतात. पण गेल्या दोन वर्षांपासून भाविक या आनंदाला मुकले आहेत.

अंबाजोगाई शहरातून आषाढी एकादशीला जाणाऱ्या शेकडो दिंड्या अंबाजोगाई मार्गेच जातात. शहरात छोट्या मोठ्या दिंड्यांची व्यवस्था पिढ्या न पिढ्या अनेक कुटुंबांकडे आहे. या दिंड्यांचा पाहुणचार मोठ्या उत्साहाने होतो. अंबाजोगाई शहरात गेल्या सात वर्षांपासून योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मैदानावर अश्व रिंगण सोहळा उत्साहात साजरा होतो.

.....

अटी, शर्तीवर परवानगी द्या

सलग दुसऱ्यावर्षी श्रींच्या पालखी दर्शनाला मुकावे लागत आहे. हळूहळू सर्वत्र अनलॉक होत असताना सरकारने काही अटी, शर्तीवर आषाढीवारीच्या पालखी सोहळ्यास परवानगी द्यायला हवी होती, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त केली जात आहे. श्रींचा पालखीचा प्रत्येकी गावी एका रात्रीचा मुक्काम असतो. त्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण असते. हा पालखी सोहळा भाविकांना वर्षभराची ऊर्जा देऊन जातो.

-अंबादास महाराज चिक्षे.