शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

२० विद्यार्थी असतील तरच हंगामी वसतिगृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 00:04 IST

साखर कारखान्यांवर ऊस तोडणीसाठी जिल्ह्यातून स्थलांतर करणाऱ्या मजुरांच्या पाल्यांसाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने ५५० हंगामी वसतगिृहांना मंजुरी दिली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ३६ हजार ५९५ विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्याचा प्रयत्न राहणार आहे.

ठळक मुद्दे५५० हंगामी वसतिगृहांना मंजुरी : ३६ हजार विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखणार

बीड : साखर कारखान्यांवर ऊस तोडणीसाठी जिल्ह्यातून स्थलांतर करणाऱ्या मजुरांच्या पाल्यांसाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने ५५० हंगामी वसतगिृहांना मंजुरी दिली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ३६ हजार ५९५ विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्याचा प्रयत्न राहणार आहे. मात्र, नव्या नियमानुसार वसतिगृहासाठी किमान २० विद्यार्थी आवश्यक आहे.यंदा कारखान्यांचा गळीत हंगाम उशिरा सुरु झाल्याने दिवाळी साजरी करुन मजूर कारखान्यावर तोडणीसाठी गेले आहेत. दिवाळी सुटी संपल्यानंतर द्वितीय शैक्षणिक सत्र सुरु झाले. बहुतांश ऊस तोडणी मजुरांसोबत त्यांचे पाल्यही गेले आहेत. तर अनेक पाल्य गावातच आजी, आजोबा, नातेवाईकांकडे राहात आहेत. स्थलांतर करणाºया ऊस तोडणी मजुरांचे पाल्य शिक्षणाच्या प्रवाहात राहावेत यासाठी शासनाच्या वतीने हंगामी वसतिगृहाची योजना आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत चालू वर्षात हंगामी वसतिगृह सुरु करण्यासाठी तालुका पातळीवरुन माहिती व प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार जिल्ह्यातून ४५ हजार विद्यार्थ्यांचे स्थलांतर होईल असा कयास होता.दरम्यान, नोव्हेंबरपर्यंत प्राप्त अहवालानुसार ३६ हजार ५९५ मुला- मुलींचे स्थलांतर होऊ शकते, असे अनुमान निघाले. त्यानुसार पडताळणीनंतर ३ डिसेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यात ५५० वसतिगृहांना प्रशासकीय मान्यता दिली. या वसतिगृहांमध्ये ३६ हजार ५९५ मुला- मुलींची सोय होणार आहे. मात्र वसतिगृह सुरु करण्यासाठी काही अटी घातल्या आहेत, त्याचे पालन करणे चालकांना बंधनकारक आहे.बीड तालुक्यातून ५०९४ मुले- मुली, अंबाजोगाई १६९९, आष्टी १४२१, धारुर ८००२, गेवराई ४५९८, केज २६१६, माजलगाव ३०८९, परळी १८०८, पाटोदा १४७५, शिरुर ३८८८ तर वडवणी तालुक्यातून १४२३ विद्यार्थ्यांची या हंगामी वसतिगृहात सोय होणार आहे.बायोमेट्रिक हजेरी आवश्यकज्या हंगामी वसतिगृहांना मंजुरी दिली आहे, तेथील स्थलांतरीत मजुरांच्या पाल्यांची संख्या २० पेक्षा कमी नसावी. विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी, तसेच वसतिगृहातील लाभार्थ्याच्या पालकांनी जिल्ह्याबाहेर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी स्थलांतर केलेले असावे. मंजुरीनंतर सुरु झालेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसह सर्व पातळीवर खात्री केल्यानंतरच किती स्थलांतर रोखले हे स्पष्ट होणार आहे.जवळच्या वसतिगृहाचा पर्यायज्या गावातील स्थलांतरीत पालकांच्या पाल्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे, तेथील पाल्यांना जवळच्या वसतिगृहांशी संलग्न करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.मात्र, या विद्यार्थ्यांना नियमित मिळणाºया सुविधांकडे यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे. तर २० पटसंख्येची अट रद्द करुन कमी पटसंख्येच्या ठिकाणीही वसतिगृह सुरु करावेत अशी मागणी पुढे आली आहे.तालुकानिहाय हंगामी वसतिगृहेबीड - ८५, अंबाजोगाई २०, आष्टी २०, धारुर ९६, गेवराई ७७, केज ४१, माजलगाव ४५, परळी ३१, पाटोदा ३०, शिरुर ७२, वडवणी ३३

टॅग्स :BeedबीडEducation Sectorशिक्षण क्षेत्र