शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

२० विद्यार्थी असतील तरच हंगामी वसतिगृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 00:04 IST

साखर कारखान्यांवर ऊस तोडणीसाठी जिल्ह्यातून स्थलांतर करणाऱ्या मजुरांच्या पाल्यांसाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने ५५० हंगामी वसतगिृहांना मंजुरी दिली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ३६ हजार ५९५ विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्याचा प्रयत्न राहणार आहे.

ठळक मुद्दे५५० हंगामी वसतिगृहांना मंजुरी : ३६ हजार विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखणार

बीड : साखर कारखान्यांवर ऊस तोडणीसाठी जिल्ह्यातून स्थलांतर करणाऱ्या मजुरांच्या पाल्यांसाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने ५५० हंगामी वसतगिृहांना मंजुरी दिली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ३६ हजार ५९५ विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्याचा प्रयत्न राहणार आहे. मात्र, नव्या नियमानुसार वसतिगृहासाठी किमान २० विद्यार्थी आवश्यक आहे.यंदा कारखान्यांचा गळीत हंगाम उशिरा सुरु झाल्याने दिवाळी साजरी करुन मजूर कारखान्यावर तोडणीसाठी गेले आहेत. दिवाळी सुटी संपल्यानंतर द्वितीय शैक्षणिक सत्र सुरु झाले. बहुतांश ऊस तोडणी मजुरांसोबत त्यांचे पाल्यही गेले आहेत. तर अनेक पाल्य गावातच आजी, आजोबा, नातेवाईकांकडे राहात आहेत. स्थलांतर करणाºया ऊस तोडणी मजुरांचे पाल्य शिक्षणाच्या प्रवाहात राहावेत यासाठी शासनाच्या वतीने हंगामी वसतिगृहाची योजना आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत चालू वर्षात हंगामी वसतिगृह सुरु करण्यासाठी तालुका पातळीवरुन माहिती व प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार जिल्ह्यातून ४५ हजार विद्यार्थ्यांचे स्थलांतर होईल असा कयास होता.दरम्यान, नोव्हेंबरपर्यंत प्राप्त अहवालानुसार ३६ हजार ५९५ मुला- मुलींचे स्थलांतर होऊ शकते, असे अनुमान निघाले. त्यानुसार पडताळणीनंतर ३ डिसेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यात ५५० वसतिगृहांना प्रशासकीय मान्यता दिली. या वसतिगृहांमध्ये ३६ हजार ५९५ मुला- मुलींची सोय होणार आहे. मात्र वसतिगृह सुरु करण्यासाठी काही अटी घातल्या आहेत, त्याचे पालन करणे चालकांना बंधनकारक आहे.बीड तालुक्यातून ५०९४ मुले- मुली, अंबाजोगाई १६९९, आष्टी १४२१, धारुर ८००२, गेवराई ४५९८, केज २६१६, माजलगाव ३०८९, परळी १८०८, पाटोदा १४७५, शिरुर ३८८८ तर वडवणी तालुक्यातून १४२३ विद्यार्थ्यांची या हंगामी वसतिगृहात सोय होणार आहे.बायोमेट्रिक हजेरी आवश्यकज्या हंगामी वसतिगृहांना मंजुरी दिली आहे, तेथील स्थलांतरीत मजुरांच्या पाल्यांची संख्या २० पेक्षा कमी नसावी. विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी, तसेच वसतिगृहातील लाभार्थ्याच्या पालकांनी जिल्ह्याबाहेर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी स्थलांतर केलेले असावे. मंजुरीनंतर सुरु झालेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसह सर्व पातळीवर खात्री केल्यानंतरच किती स्थलांतर रोखले हे स्पष्ट होणार आहे.जवळच्या वसतिगृहाचा पर्यायज्या गावातील स्थलांतरीत पालकांच्या पाल्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे, तेथील पाल्यांना जवळच्या वसतिगृहांशी संलग्न करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.मात्र, या विद्यार्थ्यांना नियमित मिळणाºया सुविधांकडे यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे. तर २० पटसंख्येची अट रद्द करुन कमी पटसंख्येच्या ठिकाणीही वसतिगृह सुरु करावेत अशी मागणी पुढे आली आहे.तालुकानिहाय हंगामी वसतिगृहेबीड - ८५, अंबाजोगाई २०, आष्टी २०, धारुर ९६, गेवराई ७७, केज ४१, माजलगाव ४५, परळी ३१, पाटोदा ३०, शिरुर ७२, वडवणी ३३

टॅग्स :BeedबीडEducation Sectorशिक्षण क्षेत्र