शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
3
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
4
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
5
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
6
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
7
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
8
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
9
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
10
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
11
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
12
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
13
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
14
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
15
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
16
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
17
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
18
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
19
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
20
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
Daily Top 2Weekly Top 5

२० विद्यार्थी असतील तरच हंगामी वसतिगृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 00:04 IST

साखर कारखान्यांवर ऊस तोडणीसाठी जिल्ह्यातून स्थलांतर करणाऱ्या मजुरांच्या पाल्यांसाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने ५५० हंगामी वसतगिृहांना मंजुरी दिली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ३६ हजार ५९५ विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्याचा प्रयत्न राहणार आहे.

ठळक मुद्दे५५० हंगामी वसतिगृहांना मंजुरी : ३६ हजार विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखणार

बीड : साखर कारखान्यांवर ऊस तोडणीसाठी जिल्ह्यातून स्थलांतर करणाऱ्या मजुरांच्या पाल्यांसाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने ५५० हंगामी वसतगिृहांना मंजुरी दिली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ३६ हजार ५९५ विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्याचा प्रयत्न राहणार आहे. मात्र, नव्या नियमानुसार वसतिगृहासाठी किमान २० विद्यार्थी आवश्यक आहे.यंदा कारखान्यांचा गळीत हंगाम उशिरा सुरु झाल्याने दिवाळी साजरी करुन मजूर कारखान्यावर तोडणीसाठी गेले आहेत. दिवाळी सुटी संपल्यानंतर द्वितीय शैक्षणिक सत्र सुरु झाले. बहुतांश ऊस तोडणी मजुरांसोबत त्यांचे पाल्यही गेले आहेत. तर अनेक पाल्य गावातच आजी, आजोबा, नातेवाईकांकडे राहात आहेत. स्थलांतर करणाºया ऊस तोडणी मजुरांचे पाल्य शिक्षणाच्या प्रवाहात राहावेत यासाठी शासनाच्या वतीने हंगामी वसतिगृहाची योजना आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत चालू वर्षात हंगामी वसतिगृह सुरु करण्यासाठी तालुका पातळीवरुन माहिती व प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार जिल्ह्यातून ४५ हजार विद्यार्थ्यांचे स्थलांतर होईल असा कयास होता.दरम्यान, नोव्हेंबरपर्यंत प्राप्त अहवालानुसार ३६ हजार ५९५ मुला- मुलींचे स्थलांतर होऊ शकते, असे अनुमान निघाले. त्यानुसार पडताळणीनंतर ३ डिसेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यात ५५० वसतिगृहांना प्रशासकीय मान्यता दिली. या वसतिगृहांमध्ये ३६ हजार ५९५ मुला- मुलींची सोय होणार आहे. मात्र वसतिगृह सुरु करण्यासाठी काही अटी घातल्या आहेत, त्याचे पालन करणे चालकांना बंधनकारक आहे.बीड तालुक्यातून ५०९४ मुले- मुली, अंबाजोगाई १६९९, आष्टी १४२१, धारुर ८००२, गेवराई ४५९८, केज २६१६, माजलगाव ३०८९, परळी १८०८, पाटोदा १४७५, शिरुर ३८८८ तर वडवणी तालुक्यातून १४२३ विद्यार्थ्यांची या हंगामी वसतिगृहात सोय होणार आहे.बायोमेट्रिक हजेरी आवश्यकज्या हंगामी वसतिगृहांना मंजुरी दिली आहे, तेथील स्थलांतरीत मजुरांच्या पाल्यांची संख्या २० पेक्षा कमी नसावी. विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी, तसेच वसतिगृहातील लाभार्थ्याच्या पालकांनी जिल्ह्याबाहेर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी स्थलांतर केलेले असावे. मंजुरीनंतर सुरु झालेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसह सर्व पातळीवर खात्री केल्यानंतरच किती स्थलांतर रोखले हे स्पष्ट होणार आहे.जवळच्या वसतिगृहाचा पर्यायज्या गावातील स्थलांतरीत पालकांच्या पाल्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे, तेथील पाल्यांना जवळच्या वसतिगृहांशी संलग्न करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.मात्र, या विद्यार्थ्यांना नियमित मिळणाºया सुविधांकडे यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे. तर २० पटसंख्येची अट रद्द करुन कमी पटसंख्येच्या ठिकाणीही वसतिगृह सुरु करावेत अशी मागणी पुढे आली आहे.तालुकानिहाय हंगामी वसतिगृहेबीड - ८५, अंबाजोगाई २०, आष्टी २०, धारुर ९६, गेवराई ७७, केज ४१, माजलगाव ४५, परळी ३१, पाटोदा ३०, शिरुर ७२, वडवणी ३३

टॅग्स :BeedबीडEducation Sectorशिक्षण क्षेत्र