शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एकाच वर्षात १२२ मुली सैराट, ९३ मुलींचा लागला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:45 IST

बीड : प्रेमप्रकरण असो अथवा फूस लावून पळवून नेणे वर्षभरात जिल्ह्यातून १२२ मुली सैराट झाल्या आहेत तसेच विविध पोलीस ...

बीड : प्रेमप्रकरण असो अथवा फूस लावून पळवून नेणे वर्षभरात जिल्ह्यातून १२२ मुली सैराट झाल्या आहेत तसेच विविध पोलीस ठाण्यांत १५ मुलेदेखील पळून गेल्याच्या तक्रारी पालकांनी नोंदविल्या आहेत. यात प्रामुख्याने १८ वर्षांपर्यंतच्या मुलींचा समावेश आहे. असे असले तरी ९३ मुली व १५ मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

मागील तीन वर्षांत ३०९ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल केलेले आहेत. १८ वर्षांखालील मुलगी पळून गेली असेल, हरवलेली असेल तर, अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. तर, १८ वर्षांच्या पुढील मुली अथवा महिलाच्या गुन्ह्यात मसिंग दाखल करण्यात येते. बहुतांश प्रकरणांत मुली किंवा महिला या त्यांच्या मर्जीनेच प्रियकरासोबत लग्न करण्याच्या उद्देशाने किंवा सोबत राहण्यासाठी फरार झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे अपहरण झालेला आकडा मात्र मोठा दिसून येतो. तर अनेक प्रकरणांत सहमतीने पळून गेल्यामुळे या प्रकरणात १८ वर्षे पूर्ण नसले तर, त्या मुला-मुलींना पालकांच्या ताब्यात दिले जाते. दरम्यान, अनेकजण अल्पवयीन असताना फरार झाले असतील तर, १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वत:हून पोलीस ठाण्यातदेखील हजर झालेले आहेत. पोलीस प्रशासनाकडून मात्र, सातत्याने अशा मुला-मुलींचा तपास विविध ठिकाणी घेतला जातो. त्यामुळे वर्षाअखेर जेवढे गुन्हे दाखल झालेले असतात, त्यापैकी बहुतांश गुन्हे निकाली निघतात, हे पोलीस प्रशासनाचे यश आहे.

कोणत्या महिन्यात किती मुली सैराट

जानेवारी ०९

फेब्रुवारी २६

मार्च १०

एप्रिल २

मे ५

जुलै ८

ऑगस्ट ९

सप्टेंबर १७

ऑक्टोबर ११

नोव्हेंबर ८

डिसेंबर १०

कोणत्या वर्षात किती ?

२०१८- ९३

२०१९-११९

२०२० -१०७

तपासात पोलीस सक्रिय

२०२० साली १८ वर्षे व त्याखालील जवळपास १०७ मुली सैराट झाल्याप्रकरणी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले होते. दरम्यान, यापैकी जवळपास ९३ ते ९७ मुली शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. तर १८ वर्षांवरील मुलींनादेखील पोलिसांनी शोधले आहे. यापैकी अनेकांनी पालकांसोबत जाण्यास नकार दिला आहे.

३ वर्षांत ७५ मुले बेपत्ता

अल्पवयीन मुलींप्रमाणेच मागील तीन वर्षांत जवळपास ७५ मुलेदेखील सैराट झाल्याचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल करण्यात आलेले आहेत. याप्रकरणात देखील पोलिसांनी जवळपास ७४ जणांना शोधून पालकांच्या स्वाधीन केले आहे.

प्रतिक्रिया

विद्यालय तसेच महाविद्यालयातील मुले- मुली यांचे पलायन हा चिंतेचा विषय आहे. हे प्रकार टाळण्यासाठी पालकांनीदेखील सतर्क राहून पाल्यावर लक्ष दिले पाहिजे तसेच त्यांची दिशा भरकटत असल्याचे लक्षात आल्यानंतर समजावून सांगणे गरजेचे आहे. दरम्यान, अशा तक्रारींमध्ये पोलीस प्रशासनाकडून गंभीर दखल घेऊन कार्यवाही केली जाते. त्यामुळे, गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण जास्त आहे.