शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

एकाच वर्षात १२२ मुली सैराट, ९३ मुलींचा लागला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:45 IST

बीड : प्रेमप्रकरण असो अथवा फूस लावून पळवून नेणे वर्षभरात जिल्ह्यातून १२२ मुली सैराट झाल्या आहेत तसेच विविध पोलीस ...

बीड : प्रेमप्रकरण असो अथवा फूस लावून पळवून नेणे वर्षभरात जिल्ह्यातून १२२ मुली सैराट झाल्या आहेत तसेच विविध पोलीस ठाण्यांत १५ मुलेदेखील पळून गेल्याच्या तक्रारी पालकांनी नोंदविल्या आहेत. यात प्रामुख्याने १८ वर्षांपर्यंतच्या मुलींचा समावेश आहे. असे असले तरी ९३ मुली व १५ मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

मागील तीन वर्षांत ३०९ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल केलेले आहेत. १८ वर्षांखालील मुलगी पळून गेली असेल, हरवलेली असेल तर, अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. तर, १८ वर्षांच्या पुढील मुली अथवा महिलाच्या गुन्ह्यात मसिंग दाखल करण्यात येते. बहुतांश प्रकरणांत मुली किंवा महिला या त्यांच्या मर्जीनेच प्रियकरासोबत लग्न करण्याच्या उद्देशाने किंवा सोबत राहण्यासाठी फरार झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे अपहरण झालेला आकडा मात्र मोठा दिसून येतो. तर अनेक प्रकरणांत सहमतीने पळून गेल्यामुळे या प्रकरणात १८ वर्षे पूर्ण नसले तर, त्या मुला-मुलींना पालकांच्या ताब्यात दिले जाते. दरम्यान, अनेकजण अल्पवयीन असताना फरार झाले असतील तर, १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वत:हून पोलीस ठाण्यातदेखील हजर झालेले आहेत. पोलीस प्रशासनाकडून मात्र, सातत्याने अशा मुला-मुलींचा तपास विविध ठिकाणी घेतला जातो. त्यामुळे वर्षाअखेर जेवढे गुन्हे दाखल झालेले असतात, त्यापैकी बहुतांश गुन्हे निकाली निघतात, हे पोलीस प्रशासनाचे यश आहे.

कोणत्या महिन्यात किती मुली सैराट

जानेवारी ०९

फेब्रुवारी २६

मार्च १०

एप्रिल २

मे ५

जुलै ८

ऑगस्ट ९

सप्टेंबर १७

ऑक्टोबर ११

नोव्हेंबर ८

डिसेंबर १०

कोणत्या वर्षात किती ?

२०१८- ९३

२०१९-११९

२०२० -१०७

तपासात पोलीस सक्रिय

२०२० साली १८ वर्षे व त्याखालील जवळपास १०७ मुली सैराट झाल्याप्रकरणी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले होते. दरम्यान, यापैकी जवळपास ९३ ते ९७ मुली शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. तर १८ वर्षांवरील मुलींनादेखील पोलिसांनी शोधले आहे. यापैकी अनेकांनी पालकांसोबत जाण्यास नकार दिला आहे.

३ वर्षांत ७५ मुले बेपत्ता

अल्पवयीन मुलींप्रमाणेच मागील तीन वर्षांत जवळपास ७५ मुलेदेखील सैराट झाल्याचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल करण्यात आलेले आहेत. याप्रकरणात देखील पोलिसांनी जवळपास ७४ जणांना शोधून पालकांच्या स्वाधीन केले आहे.

प्रतिक्रिया

विद्यालय तसेच महाविद्यालयातील मुले- मुली यांचे पलायन हा चिंतेचा विषय आहे. हे प्रकार टाळण्यासाठी पालकांनीदेखील सतर्क राहून पाल्यावर लक्ष दिले पाहिजे तसेच त्यांची दिशा भरकटत असल्याचे लक्षात आल्यानंतर समजावून सांगणे गरजेचे आहे. दरम्यान, अशा तक्रारींमध्ये पोलीस प्रशासनाकडून गंभीर दखल घेऊन कार्यवाही केली जाते. त्यामुळे, गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण जास्त आहे.