शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
3
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
4
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
5
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
6
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
8
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
9
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
10
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
11
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
12
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
13
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
14
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
15
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
16
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
17
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
18
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
19
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
20
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!

एकाच वर्षात १२२ मुली सैराट, ९३ मुलींचा लागला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:45 IST

बीड : प्रेमप्रकरण असो अथवा फूस लावून पळवून नेणे वर्षभरात जिल्ह्यातून १२२ मुली सैराट झाल्या आहेत तसेच विविध पोलीस ...

बीड : प्रेमप्रकरण असो अथवा फूस लावून पळवून नेणे वर्षभरात जिल्ह्यातून १२२ मुली सैराट झाल्या आहेत तसेच विविध पोलीस ठाण्यांत १५ मुलेदेखील पळून गेल्याच्या तक्रारी पालकांनी नोंदविल्या आहेत. यात प्रामुख्याने १८ वर्षांपर्यंतच्या मुलींचा समावेश आहे. असे असले तरी ९३ मुली व १५ मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

मागील तीन वर्षांत ३०९ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल केलेले आहेत. १८ वर्षांखालील मुलगी पळून गेली असेल, हरवलेली असेल तर, अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. तर, १८ वर्षांच्या पुढील मुली अथवा महिलाच्या गुन्ह्यात मसिंग दाखल करण्यात येते. बहुतांश प्रकरणांत मुली किंवा महिला या त्यांच्या मर्जीनेच प्रियकरासोबत लग्न करण्याच्या उद्देशाने किंवा सोबत राहण्यासाठी फरार झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे अपहरण झालेला आकडा मात्र मोठा दिसून येतो. तर अनेक प्रकरणांत सहमतीने पळून गेल्यामुळे या प्रकरणात १८ वर्षे पूर्ण नसले तर, त्या मुला-मुलींना पालकांच्या ताब्यात दिले जाते. दरम्यान, अनेकजण अल्पवयीन असताना फरार झाले असतील तर, १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वत:हून पोलीस ठाण्यातदेखील हजर झालेले आहेत. पोलीस प्रशासनाकडून मात्र, सातत्याने अशा मुला-मुलींचा तपास विविध ठिकाणी घेतला जातो. त्यामुळे वर्षाअखेर जेवढे गुन्हे दाखल झालेले असतात, त्यापैकी बहुतांश गुन्हे निकाली निघतात, हे पोलीस प्रशासनाचे यश आहे.

कोणत्या महिन्यात किती मुली सैराट

जानेवारी ०९

फेब्रुवारी २६

मार्च १०

एप्रिल २

मे ५

जुलै ८

ऑगस्ट ९

सप्टेंबर १७

ऑक्टोबर ११

नोव्हेंबर ८

डिसेंबर १०

कोणत्या वर्षात किती ?

२०१८- ९३

२०१९-११९

२०२० -१०७

तपासात पोलीस सक्रिय

२०२० साली १८ वर्षे व त्याखालील जवळपास १०७ मुली सैराट झाल्याप्रकरणी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले होते. दरम्यान, यापैकी जवळपास ९३ ते ९७ मुली शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. तर १८ वर्षांवरील मुलींनादेखील पोलिसांनी शोधले आहे. यापैकी अनेकांनी पालकांसोबत जाण्यास नकार दिला आहे.

३ वर्षांत ७५ मुले बेपत्ता

अल्पवयीन मुलींप्रमाणेच मागील तीन वर्षांत जवळपास ७५ मुलेदेखील सैराट झाल्याचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल करण्यात आलेले आहेत. याप्रकरणात देखील पोलिसांनी जवळपास ७४ जणांना शोधून पालकांच्या स्वाधीन केले आहे.

प्रतिक्रिया

विद्यालय तसेच महाविद्यालयातील मुले- मुली यांचे पलायन हा चिंतेचा विषय आहे. हे प्रकार टाळण्यासाठी पालकांनीदेखील सतर्क राहून पाल्यावर लक्ष दिले पाहिजे तसेच त्यांची दिशा भरकटत असल्याचे लक्षात आल्यानंतर समजावून सांगणे गरजेचे आहे. दरम्यान, अशा तक्रारींमध्ये पोलीस प्रशासनाकडून गंभीर दखल घेऊन कार्यवाही केली जाते. त्यामुळे, गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण जास्त आहे.