शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
2
भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ...
3
कुठे EVM मशिन बंद, कुठे बोगस मतदार, तर कुठे लांबच लांब रांग; नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू
4
HCL Tech-एअरटेलसह 'या' ५ कंपन्या देणार मोठा परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस
5
जग हादरलं! भीषण पाणी टंचाईमुळे 'या' देशाची राजधानी रिकामी करावी लागणार? दीड कोटी जनतेवर होणार परिणाम!
6
आमदार संतोष बांगरांनी नियम बसवले धाब्यावर; महिलेला बटन दाबण्यास सांगितले, मोबाईल घेऊन केंद्रात गेले
7
चंद्रपूर: EVMचे बटण दाबूनही लाईट लागेना, तांत्रिक कारणामुळे काही केंद्रांवर प्रक्रिया थांबली
8
"मला iPhone 17 Pro Max हवाय"; तरुणाचा भाजपा खासदाराला फोन, मजेदार ऑडिओ व्हायरल
9
Bus Fire: ट्रकला धडकल्यानंतर बस पेटली; ३ जणांचा होरपळून मृत्यू, २३ जण जखमी
10
Mumbai Hit And Run: मैत्रिणीला ढकलून वाचवला जीव; पोलिस व्हॅनच्या धडकेत आयटीआय विद्यार्थी जखमी
11
SMAT 2025 : अर्जुन तेंडुलकरनं IPL इतिहासातील महागड्या गड्याला स्वस्तात तंबूत धाडलं; पण...
12
Video - संतापजनक! "म्हातारे, मी तुझं बुटाने तोंड फोडेन, तू..."; वृद्ध महिलेला पोलिसाची धमकी
13
तात्पुरत्या शिक्षकांना पेन्शन, अन्य सेवा लाभ नाकारू नयेत; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
14
महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू; Whatsapp स्टेटसमुळे घटना उघडकीस, हत्येचा दावा
15
दिल्ली बॉम्बस्फोटाचं हमास कनेक्शन! हल्ल्यासाठी ड्रोन वापरायचा कट; दहशतवादी दानिशच्या फोनमधून मोठा खुलासा
16
IPL 2026: ग्लेन मॅक्सवेलची कारकीर्द धोक्यात? पंजाबने सोडलं, आता लिलावातून बाहेर, कारण काय?
17
"सरकार-बँका मला आणि जनतेला किती काळ फसवत राहणार?" विजय माल्ल्याचे सरकारला पुन्हा सवाल
18
"धनूभाऊ, तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता, पण भय्यूजी महाराजांनी वाचवलेलं"; रत्नाकर गुट्टेंचा मोठा गौप्यस्फोट
19
पाकिस्तानात आज अचानक काय घडतंय?, राष्ट्रपतींनी बोलावली संसदेची बैठक; शहबाज परदेशातून परतले
20
अरे देवा! "...म्हणूनच तो हनिमूनच्या रात्री पळून गेला", ५ दिवसांनी सापडला गायब झालेला नवरदेव
Daily Top 2Weekly Top 5

कडा बाजार समितीची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:22 IST

कडा : दरवर्षी एक दोन ठिकाणी व्यापाऱ्यां आडतीवर येणारा कापूस ट्रकमध्ये भरला जातो. या दरम्यान विद्युत वाहिनीच्या तारा लागुनच ...

कडा : दरवर्षी एक दोन ठिकाणी व्यापाऱ्यां आडतीवर येणारा कापूस ट्रकमध्ये भरला जातो. या दरम्यान विद्युत वाहिनीच्या तारा लागुनच असल्याने आगीच्या घटना घडुन लाखोंचे नुकसान होत आहे. पण याकडे बाजार समितीचे दुर्लक्ष असुन व्यापाऱ्यांसह बाजार समितीची सुरक्षा वाऱ्यार असल्याचे दिसून येत आहे. अनेक वेळा आगीच्या घटना घडुनही अग्निशमन बंब मिळत नसल्याने भविष्यात मोठी दुर्दैवी घटना घडली तर जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आष्टी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून कडा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिले जाते. या बाजार समिती मध्ये परजिल्हातूनही आवक असते. तसेच परदेशातही मालाची विक्री होते. याठिकाणी ग्रामीण भागातील शेतकरी आपला पिकवलेला कापूस आणतात व्यापारी याच्या आडतीवर घालतात. पण जेव्हा हेच व्यापारी ट्रक भरतात तेव्हा तेथे विद्युत वाहिनीच्या तारा गेल्याने याची स्पार्किंग होऊन आगीची दुर्घटना घडते. यात व्यापारी लोकांचे लाखोचे नुकसान होत आहे. दरवर्षी एक दोन घटना येथे घडतात. अशा घटनांतून बाजार समितीने धडा घ्यायला पाहिजे. पण व्यापारी लोंकाकडून ठरलेले भाडे करारावर मोबदला घेणारी बाजार समिती सुविधा देण्यात अपुरी पडत असल्याचे दिसत आहे. येथे महिन्याकाठी लाखोंची उलाढाल होते. मग गरजेचे असलेली अग्निशमन बंबाची व्यवस्था का उपलब्ध केली जात नाही? असा सवाल व्यापारी, शेतकरी तसेच नागरीक करीत आहेत. बाजार समितीने शेतमाल, व्यापारी मालाच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाय करण्याची मागणी शिवसंग्रामचे आष्टी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.

विद्युत वाहिनीच्या तारा झाडाझुडपात आणि ठिक ठिकाणी संरक्षण पाईप नसल्याने अचानक स्पार्किंग होऊन आग लागते. भविष्यात हमालांसह संबंधितांच्या जिवाला काही बरेवाईट झाले तर जबाबदारी कोणाची असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत कडा कृ.उ.बा समितीचे सभापती दत्तात्रय जेवे यांना विचारणा केली असता मागचे काही माहित नाही. आ. सुरेश धस यांच्याशी बोलून संचालक मंडळाची बैठक घेऊन लवकरच प्रस्ताव पाठवला जाईल असे त्यांनी लोकमतला सांगितले.