शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

कडा बाजार समितीची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:22 IST

कडा : दरवर्षी एक दोन ठिकाणी व्यापाऱ्यां आडतीवर येणारा कापूस ट्रकमध्ये भरला जातो. या दरम्यान विद्युत वाहिनीच्या तारा लागुनच ...

कडा : दरवर्षी एक दोन ठिकाणी व्यापाऱ्यां आडतीवर येणारा कापूस ट्रकमध्ये भरला जातो. या दरम्यान विद्युत वाहिनीच्या तारा लागुनच असल्याने आगीच्या घटना घडुन लाखोंचे नुकसान होत आहे. पण याकडे बाजार समितीचे दुर्लक्ष असुन व्यापाऱ्यांसह बाजार समितीची सुरक्षा वाऱ्यार असल्याचे दिसून येत आहे. अनेक वेळा आगीच्या घटना घडुनही अग्निशमन बंब मिळत नसल्याने भविष्यात मोठी दुर्दैवी घटना घडली तर जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आष्टी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून कडा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिले जाते. या बाजार समिती मध्ये परजिल्हातूनही आवक असते. तसेच परदेशातही मालाची विक्री होते. याठिकाणी ग्रामीण भागातील शेतकरी आपला पिकवलेला कापूस आणतात व्यापारी याच्या आडतीवर घालतात. पण जेव्हा हेच व्यापारी ट्रक भरतात तेव्हा तेथे विद्युत वाहिनीच्या तारा गेल्याने याची स्पार्किंग होऊन आगीची दुर्घटना घडते. यात व्यापारी लोकांचे लाखोचे नुकसान होत आहे. दरवर्षी एक दोन घटना येथे घडतात. अशा घटनांतून बाजार समितीने धडा घ्यायला पाहिजे. पण व्यापारी लोंकाकडून ठरलेले भाडे करारावर मोबदला घेणारी बाजार समिती सुविधा देण्यात अपुरी पडत असल्याचे दिसत आहे. येथे महिन्याकाठी लाखोंची उलाढाल होते. मग गरजेचे असलेली अग्निशमन बंबाची व्यवस्था का उपलब्ध केली जात नाही? असा सवाल व्यापारी, शेतकरी तसेच नागरीक करीत आहेत. बाजार समितीने शेतमाल, व्यापारी मालाच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाय करण्याची मागणी शिवसंग्रामचे आष्टी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.

विद्युत वाहिनीच्या तारा झाडाझुडपात आणि ठिक ठिकाणी संरक्षण पाईप नसल्याने अचानक स्पार्किंग होऊन आग लागते. भविष्यात हमालांसह संबंधितांच्या जिवाला काही बरेवाईट झाले तर जबाबदारी कोणाची असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत कडा कृ.उ.बा समितीचे सभापती दत्तात्रय जेवे यांना विचारणा केली असता मागचे काही माहित नाही. आ. सुरेश धस यांच्याशी बोलून संचालक मंडळाची बैठक घेऊन लवकरच प्रस्ताव पाठवला जाईल असे त्यांनी लोकमतला सांगितले.