शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

साबलखेड-आष्टी-चिंचपूर रस्ता वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:38 IST

नितीन कांबळे लोकमत न्यूज नेटवर्क कडा : अहमदनगर-आष्टी-जामखेड हा रस्ता अंत्यत खराब झाला होता. तो काही महिन्यापूर्वी नगर ...

नितीन कांबळे

लोकमत न्यूज नेटवर्क

कडा : अहमदनगर-आष्टी-जामखेड हा रस्ता अंत्यत खराब झाला होता. तो काही महिन्यापूर्वी नगर पासून साबलखेड पर्यंत पूर्ण झाला आहे. परंतु आष्टीपर्यंत या रस्त्याचे काम रखडले आहे. आष्टीपासून चिंचपूर पर्यंत काम पूर्ण झाले आहे. परंतु जामखेड पर्यंत मंजुरी नसल्याने काम झालेले नाही. त्याचा प्रस्ताव शासनदरबारी पडून आहे.

नगर - आष्टी- जामखेड हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. काही वर्षांपासून तो आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे वर्ग झाला. नगर ते साबलखेड असा रस्ता बनविण्यात आला. पण साबलखेड ते आष्टी व चिंचपूर ते जामखेड असा २० किलोमीटर अंतराचा रस्ता मध्येच अपूर्ण राहिला आहे. या रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. हा रस्ता अंत्यत खराब झाल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे रस्त्यावर अपघात वाढले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे हा रस्ता मंजूर नसल्याने काम रखडले असल्याचे बोलले जात आहे. मागील वर्षी प्रस्ताव पाठवून त्याला मंजुरी देखील मिळाली होती. त्याचे टेंडर देखील निघाले पण कुठे माशी शिंकली आणि ते टेंडर रद्द झाल्याने हा रस्ता रखडला.

....

लोकप्रतिनिधीनो, उघडा डोळे बघा नीट...

जामखेड ते साबलखेड रस्ता अंत्यत खराब झाला आहे. मोठ मोठी खड्डे चुकवताना अपघात घडत आहेत. अनेकांचा जीव गेला आहे. तर शेकडो लोकांना कायमचे अपंगत्व आले आहेत. रोजच अपघाताच्या मालिका घडत असताना लोकप्रतिनिधींकडून कसलीच दखल घेतली जात नाही, असा आरोप शिवसंग्राम तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी उपस्थित केला आहे.

...

मंजुरी मिळताच काम सुरू

वरिष्ठ पातळीवर आता नव्याने याचा पाठपुरावा सुरू आहे. साधारणतः १८ कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम प्रलंबित आहे. या कामाला मंजुरी मिळताच अर्धवट राहिलेले काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता दिलीप तारडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

...