शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

अपघाताचा धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:34 IST

.... लॉकडाऊनच्या नियमांना तिलांजली वडवणी : शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे, तर कधी वाढ होत ...

....

लॉकडाऊनच्या नियमांना तिलांजली

वडवणी : शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे, तर कधी वाढ होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लादले असून, सकाळी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांना मुभा दिली जात आहे, परंतु ११ नंतरही शहरातील रस्त्यांवर नागरिकांची भाजीपाला, फळ विक्रेते यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. यामुळे रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

....

लॉकडाऊनचा टरबूज उत्पादकांना फटका

वडवणी : यंदा मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी टरबुजाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले, शिवाय उत्पादनही भरपूर मिळाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने विक्रीअभावी उत्पादकांना फटका बसला आहे. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या टरबुजाला ज्यूस सेंटर, सार्वजनिक मोठे कार्यक्रम, लग्नकार्य या ठिकाणी मोठी मागणी असते, परंतु लॉकडाऊन असल्याने बाजारपेठ, ज्यूस सेंटर, विविध कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे मागणी घटली आहे. त्यामुळे मामला चिचोटी साळीबा, देवडी, लिमगाव काडीवडगाव परिसरातील शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.

....

दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी

वडवणी : शहराला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणचे दिशादर्शक, सूचना फलक गायब झाले आहेत. त्यामुळे चालकांची गैरसोय होत आहे. वळण, नदी, पूल, अपघात प्रणव क्षेत्रातील रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन, प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक फलक बसविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

....

कमी दाबाने वीजपुरवठा

वडवणी : शहरासह ग्रामीण भागात कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. यामुळे सातत्याने वीजपुरवठा खंडित होतो. खंडित वीजपुरवठ्यामुळे वीज ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे, शिवाय शेतकऱ्यांनाही फळपिकांना पाणी देताना विजेची वाट पाहावी लागते. तरी शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.