शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

फेरविचार करा, दाढी , कटिंगला परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:34 IST

गेवराई : राज्य सरकारकडून राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये बहुतांश व्यावसायिकांना नियम व अटींचे पालन ...

गेवराई : राज्य सरकारकडून राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये बहुतांश व्यावसायिकांना नियम व अटींचे पालन करून व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. फक्त नाभिक समाजाच्या सलून व्यवसायाला परवानगी नाकारण्यात आली. हा या समाजावर सपशेल अन्याय आहे. यामुळे राज्य सरकारने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या गेवराई तालुका अध्यक्ष नागेश पंडित यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.

मागील वर्षी आलेल्या कोरोना महामारीपासून नाभिक समाजाला अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी राज्यासाठी व सर्वसामान्य जनतेसाठी २ महिन्यांचा कडक लॉकडाऊन होता; परंतु नाभिक समाजाने लॉकडाऊनची परिस्थिती कित्येक महिने अनुभवली होती. अगदी दुकानाचे भाडे देण्यासाठी देखील पैसे कित्येकांकडे नव्हते. त्यावेळी देखील सरकारने कसल्याही प्रकारची आर्थिक मदत या समाजास केली नाही. समाजाचा हा महत्त्वाचा घटक असूनही कायम दुर्लक्षित राहिला आहे. निराशेच्या गर्तेत सापडलेल्या समाजातील १४ जणांनी मागील वर्षी आत्महत्या केल्या होत्या. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून अजून हा समाज सावरला देखील नव्हता. अशातच शासनाने आता लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध असा शाब्दिक खेळ करून बहुतांश गोष्टी सुरू ठेवल्या आहेत. मग सलून व्यवसायावरच निर्बंध कशामुळे ? हा प्रश्न सामान्यांना पडला आहे. हातावर पोट असणारा समाज आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सततच झगडत असतो. या निर्णयामुळे तो कोलमडून जाऊ शकतो.

त्यामुळे सरकारने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करून अटी व नियम घालून का होईना परवानगी द्यावी नसता संपूर्ण समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे गेवराई तालुका अध्यक्ष नागेश पंडित यांनी दिला आहे.