शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

फेरविचार करा, दाढी , कटिंगला परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:34 IST

गेवराई : राज्य सरकारकडून राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये बहुतांश व्यावसायिकांना नियम व अटींचे पालन ...

गेवराई : राज्य सरकारकडून राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये बहुतांश व्यावसायिकांना नियम व अटींचे पालन करून व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. फक्त नाभिक समाजाच्या सलून व्यवसायाला परवानगी नाकारण्यात आली. हा या समाजावर सपशेल अन्याय आहे. यामुळे राज्य सरकारने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या गेवराई तालुका अध्यक्ष नागेश पंडित यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.

मागील वर्षी आलेल्या कोरोना महामारीपासून नाभिक समाजाला अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी राज्यासाठी व सर्वसामान्य जनतेसाठी २ महिन्यांचा कडक लॉकडाऊन होता; परंतु नाभिक समाजाने लॉकडाऊनची परिस्थिती कित्येक महिने अनुभवली होती. अगदी दुकानाचे भाडे देण्यासाठी देखील पैसे कित्येकांकडे नव्हते. त्यावेळी देखील सरकारने कसल्याही प्रकारची आर्थिक मदत या समाजास केली नाही. समाजाचा हा महत्त्वाचा घटक असूनही कायम दुर्लक्षित राहिला आहे. निराशेच्या गर्तेत सापडलेल्या समाजातील १४ जणांनी मागील वर्षी आत्महत्या केल्या होत्या. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून अजून हा समाज सावरला देखील नव्हता. अशातच शासनाने आता लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध असा शाब्दिक खेळ करून बहुतांश गोष्टी सुरू ठेवल्या आहेत. मग सलून व्यवसायावरच निर्बंध कशामुळे ? हा प्रश्न सामान्यांना पडला आहे. हातावर पोट असणारा समाज आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सततच झगडत असतो. या निर्णयामुळे तो कोलमडून जाऊ शकतो.

त्यामुळे सरकारने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करून अटी व नियम घालून का होईना परवानगी द्यावी नसता संपूर्ण समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे गेवराई तालुका अध्यक्ष नागेश पंडित यांनी दिला आहे.