शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

चितेची आग विझण्याआधीच मयताच्या मालमत्तेवर नोंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:35 IST

माजलगाव : माजलगाव नगर परिषदेत पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’ असा कारभार सुरू असून दवाखान्यात उपचारादरम्यान मयत झालेल्या व्यक्तीची चितेची ...

माजलगाव : माजलगाव नगर परिषदेत पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’ असा कारभार सुरू असून दवाखान्यात उपचारादरम्यान मयत झालेल्या व्यक्तीची चितेची आग विझण्यापूर्वी त्याची कोट्यवधी रुपये किमतीची मालमत्ता हडपण्याचा डाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना हाताशी धरून साधण्यात आला. मालमत्तेवर नाव लावण्याच्या फेर ओढण्यापूर्वी देण्यात येणाऱ्या जाहीर प्रगटनाची १५ दिवसांची मुदत पूर्ण होण्याआधीच अवघ्या १० दिवसांत मयताच्या व पुतण्याच्या नावावर मालमत्ता केल्याचा प्रताप येथील नगर परिषदेने केला असून मुदतीत घेण्यात आलेल्या आक्षेपावर कसलीही सुनावणी घेण्यात आली नाही.

येथील जुना मोंढा भागात राजाराम धोंडीराम जोगडे यांचा मालमत्ता क्र.१०-११८/६ नुसार पाच दुकाने असलेली कोट्यवधी रुपये किमतीची तर दुसरी मोंढ्यातील दूध डेअरीजवळ जागा आहे. जोगडे यांचे २४ मे रोजी निधन झाले. त्यांना पत्नी, मुलेबाळे कोणीच नसल्याने त्यांनी रजिस्टर्ड मृत्युपत्र भाऊ निवृत्ती जोगडे यांच्या नावावर केले होते. मात्र राजाराम यांच्या मृत्यूनंतर निवृत्ती यांचेदेखील अवघ्या पाच दिवसांनी २९ मे रोजी निधन झाले. निवृत्ती यांना पत्नी व विवाहित मुली आहेत.

राजाराम यांचे २४ मे रोजी निधन झाले. त्यांच्यावर रात्री १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर व मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यापूर्वीच २५ जून रोजी त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र मिळालेले नसतानाही मालमत्तेवर मृत्युपत्राधारे मयत झालेल्या निवृत्तींचे नाव लावण्यात यावे, असा अर्ज नगर परिषदेत दाखल करून घेण्यात आल्याचा आरोप विष्णू जोगडे यांनी केला आहे.

त्यानंतर ७ जुलै रोजी नगर परिषदेच्या वतीने वृत्तपत्रात जाहीर प्रगटन देऊन १५ दिवसांत हरकत मागवली. त्यावर बाळासाहेब उर्फ विष्णू जोगडे यांनी १४ जुलै रोजी हरकत दाखल केली. त्यावर नियमानुसार सुनावणी होणे अपेक्षित असताना त्यास नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी चक्क फाटा देण्याचे काम केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

या जागेबाबत तक्रार असताना व हरकतीचे १५ दिवस २१ जुलै रोजी पूर्ण होण्यापूर्वीच १२ जुलै रोजीच मालमत्तेवर मयत निवृत्ती जोगडे व दुसऱ्या मालमत्तेवर सुभाष आत्माराम जोगडे यांचे नाव लावण्यात आले असल्याचा आरोप विष्णू जोगडे यांनी केला आहे.

------

येथील नगर परिषदेत मयताचे मृत्यू प्रमाणपत्र नसताना अर्ज कसा दाखल करून घेण्यात आला, आक्षेप अर्जावर सुनावणी का घेतली नाही, प्रगटनाचे १५ दिवस पूर्ण होण्यापूर्वीच नाव कसे लावण्यात आले, हे मोठे गौडबंगाल असून ही प्रक्रिया त्वरित रद्द करून न्याय न दिल्यास आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करू. त्यास सर्वस्वी मुख्याधिकारी जबाबदार असतील. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार करणार आहे. - बाळासाहेब उर्फ विष्णू जोगडे, तक्रारदार

-----

नाव लावण्यासाठी अर्ज आला होता व रजिस्टर्ड मृत्युपत्र असल्याने नाव लावण्यात आले. विष्णू जोगडे यांनी याविरोधात तक्रार दिली होती. परंतु त्यांनी त्या तक्रारीसोबत कसल्याही प्रकारची कागदपत्रे न जोडल्याने आम्ही सुनावणी घेतली नाही.

- विशाल भोसले, मुख्याधिकारी, नगर परिषद, माजलगाव