शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चितेची आग विझण्याआधीच मयताच्या मालमत्तेवर नोंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:35 IST

माजलगाव : माजलगाव नगर परिषदेत पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’ असा कारभार सुरू असून दवाखान्यात उपचारादरम्यान मयत झालेल्या व्यक्तीची चितेची ...

माजलगाव : माजलगाव नगर परिषदेत पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’ असा कारभार सुरू असून दवाखान्यात उपचारादरम्यान मयत झालेल्या व्यक्तीची चितेची आग विझण्यापूर्वी त्याची कोट्यवधी रुपये किमतीची मालमत्ता हडपण्याचा डाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना हाताशी धरून साधण्यात आला. मालमत्तेवर नाव लावण्याच्या फेर ओढण्यापूर्वी देण्यात येणाऱ्या जाहीर प्रगटनाची १५ दिवसांची मुदत पूर्ण होण्याआधीच अवघ्या १० दिवसांत मयताच्या व पुतण्याच्या नावावर मालमत्ता केल्याचा प्रताप येथील नगर परिषदेने केला असून मुदतीत घेण्यात आलेल्या आक्षेपावर कसलीही सुनावणी घेण्यात आली नाही.

येथील जुना मोंढा भागात राजाराम धोंडीराम जोगडे यांचा मालमत्ता क्र.१०-११८/६ नुसार पाच दुकाने असलेली कोट्यवधी रुपये किमतीची तर दुसरी मोंढ्यातील दूध डेअरीजवळ जागा आहे. जोगडे यांचे २४ मे रोजी निधन झाले. त्यांना पत्नी, मुलेबाळे कोणीच नसल्याने त्यांनी रजिस्टर्ड मृत्युपत्र भाऊ निवृत्ती जोगडे यांच्या नावावर केले होते. मात्र राजाराम यांच्या मृत्यूनंतर निवृत्ती यांचेदेखील अवघ्या पाच दिवसांनी २९ मे रोजी निधन झाले. निवृत्ती यांना पत्नी व विवाहित मुली आहेत.

राजाराम यांचे २४ मे रोजी निधन झाले. त्यांच्यावर रात्री १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर व मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यापूर्वीच २५ जून रोजी त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र मिळालेले नसतानाही मालमत्तेवर मृत्युपत्राधारे मयत झालेल्या निवृत्तींचे नाव लावण्यात यावे, असा अर्ज नगर परिषदेत दाखल करून घेण्यात आल्याचा आरोप विष्णू जोगडे यांनी केला आहे.

त्यानंतर ७ जुलै रोजी नगर परिषदेच्या वतीने वृत्तपत्रात जाहीर प्रगटन देऊन १५ दिवसांत हरकत मागवली. त्यावर बाळासाहेब उर्फ विष्णू जोगडे यांनी १४ जुलै रोजी हरकत दाखल केली. त्यावर नियमानुसार सुनावणी होणे अपेक्षित असताना त्यास नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी चक्क फाटा देण्याचे काम केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

या जागेबाबत तक्रार असताना व हरकतीचे १५ दिवस २१ जुलै रोजी पूर्ण होण्यापूर्वीच १२ जुलै रोजीच मालमत्तेवर मयत निवृत्ती जोगडे व दुसऱ्या मालमत्तेवर सुभाष आत्माराम जोगडे यांचे नाव लावण्यात आले असल्याचा आरोप विष्णू जोगडे यांनी केला आहे.

------

येथील नगर परिषदेत मयताचे मृत्यू प्रमाणपत्र नसताना अर्ज कसा दाखल करून घेण्यात आला, आक्षेप अर्जावर सुनावणी का घेतली नाही, प्रगटनाचे १५ दिवस पूर्ण होण्यापूर्वीच नाव कसे लावण्यात आले, हे मोठे गौडबंगाल असून ही प्रक्रिया त्वरित रद्द करून न्याय न दिल्यास आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करू. त्यास सर्वस्वी मुख्याधिकारी जबाबदार असतील. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार करणार आहे. - बाळासाहेब उर्फ विष्णू जोगडे, तक्रारदार

-----

नाव लावण्यासाठी अर्ज आला होता व रजिस्टर्ड मृत्युपत्र असल्याने नाव लावण्यात आले. विष्णू जोगडे यांनी याविरोधात तक्रार दिली होती. परंतु त्यांनी त्या तक्रारीसोबत कसल्याही प्रकारची कागदपत्रे न जोडल्याने आम्ही सुनावणी घेतली नाही.

- विशाल भोसले, मुख्याधिकारी, नगर परिषद, माजलगाव