शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

चितेची आग विझण्याआधीच मयताच्या मालमत्तेवर नोंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:35 IST

माजलगाव : माजलगाव नगर परिषदेत पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’ असा कारभार सुरू असून दवाखान्यात उपचारादरम्यान मयत झालेल्या व्यक्तीची चितेची ...

माजलगाव : माजलगाव नगर परिषदेत पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’ असा कारभार सुरू असून दवाखान्यात उपचारादरम्यान मयत झालेल्या व्यक्तीची चितेची आग विझण्यापूर्वी त्याची कोट्यवधी रुपये किमतीची मालमत्ता हडपण्याचा डाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना हाताशी धरून साधण्यात आला. मालमत्तेवर नाव लावण्याच्या फेर ओढण्यापूर्वी देण्यात येणाऱ्या जाहीर प्रगटनाची १५ दिवसांची मुदत पूर्ण होण्याआधीच अवघ्या १० दिवसांत मयताच्या व पुतण्याच्या नावावर मालमत्ता केल्याचा प्रताप येथील नगर परिषदेने केला असून मुदतीत घेण्यात आलेल्या आक्षेपावर कसलीही सुनावणी घेण्यात आली नाही.

येथील जुना मोंढा भागात राजाराम धोंडीराम जोगडे यांचा मालमत्ता क्र.१०-११८/६ नुसार पाच दुकाने असलेली कोट्यवधी रुपये किमतीची तर दुसरी मोंढ्यातील दूध डेअरीजवळ जागा आहे. जोगडे यांचे २४ मे रोजी निधन झाले. त्यांना पत्नी, मुलेबाळे कोणीच नसल्याने त्यांनी रजिस्टर्ड मृत्युपत्र भाऊ निवृत्ती जोगडे यांच्या नावावर केले होते. मात्र राजाराम यांच्या मृत्यूनंतर निवृत्ती यांचेदेखील अवघ्या पाच दिवसांनी २९ मे रोजी निधन झाले. निवृत्ती यांना पत्नी व विवाहित मुली आहेत.

राजाराम यांचे २४ मे रोजी निधन झाले. त्यांच्यावर रात्री १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर व मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यापूर्वीच २५ जून रोजी त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र मिळालेले नसतानाही मालमत्तेवर मृत्युपत्राधारे मयत झालेल्या निवृत्तींचे नाव लावण्यात यावे, असा अर्ज नगर परिषदेत दाखल करून घेण्यात आल्याचा आरोप विष्णू जोगडे यांनी केला आहे.

त्यानंतर ७ जुलै रोजी नगर परिषदेच्या वतीने वृत्तपत्रात जाहीर प्रगटन देऊन १५ दिवसांत हरकत मागवली. त्यावर बाळासाहेब उर्फ विष्णू जोगडे यांनी १४ जुलै रोजी हरकत दाखल केली. त्यावर नियमानुसार सुनावणी होणे अपेक्षित असताना त्यास नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी चक्क फाटा देण्याचे काम केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

या जागेबाबत तक्रार असताना व हरकतीचे १५ दिवस २१ जुलै रोजी पूर्ण होण्यापूर्वीच १२ जुलै रोजीच मालमत्तेवर मयत निवृत्ती जोगडे व दुसऱ्या मालमत्तेवर सुभाष आत्माराम जोगडे यांचे नाव लावण्यात आले असल्याचा आरोप विष्णू जोगडे यांनी केला आहे.

------

येथील नगर परिषदेत मयताचे मृत्यू प्रमाणपत्र नसताना अर्ज कसा दाखल करून घेण्यात आला, आक्षेप अर्जावर सुनावणी का घेतली नाही, प्रगटनाचे १५ दिवस पूर्ण होण्यापूर्वीच नाव कसे लावण्यात आले, हे मोठे गौडबंगाल असून ही प्रक्रिया त्वरित रद्द करून न्याय न दिल्यास आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करू. त्यास सर्वस्वी मुख्याधिकारी जबाबदार असतील. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार करणार आहे. - बाळासाहेब उर्फ विष्णू जोगडे, तक्रारदार

-----

नाव लावण्यासाठी अर्ज आला होता व रजिस्टर्ड मृत्युपत्र असल्याने नाव लावण्यात आले. विष्णू जोगडे यांनी याविरोधात तक्रार दिली होती. परंतु त्यांनी त्या तक्रारीसोबत कसल्याही प्रकारची कागदपत्रे न जोडल्याने आम्ही सुनावणी घेतली नाही.

- विशाल भोसले, मुख्याधिकारी, नगर परिषद, माजलगाव